शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पांढरकवडा तालुक्यात कपाशीचा पेरा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:18 IST

जिल्ह्यात सर्वाधिक पांढरे सोने पिकविणाऱ्या पांढरकवडा तालुक्यात यावर्षी कपाशीचा पेरा मागीलवर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात कपाशीचा पेरा पाच टक्क्याने कमी झाला होता. त्यात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम : सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांची लगबग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : जिल्ह्यात सर्वाधिक पांढरे सोने पिकविणाऱ्या पांढरकवडा तालुक्यात यावर्षी कपाशीचा पेरा मागीलवर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात कपाशीचा पेरा पाच टक्क्याने कमी झाला होता. त्यात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.तालुक्यात ५२ हजार ९११ हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. यापैकी ४० ते ४१ हजार हेक्टर जमिनीत यावर्षी कापाशीचा पेरा होणार असल्याची शक्यता आहे. आठ ते १० हजार हेक्टर जमिनीत सोयाबीन व उर्वरित जमिनीत तूर आणि इतर पिकांचा पेरा होणे अपेक्षित आहे. जमिनीच्या मशागतीची कामे संपत आली असून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. शेतकऱ्यांनी बि-बियाणांची जमवाजमव करणे सुरू केले आहे. बि-बियाणांची सोय करण्यासाठी शेतकरी सावकारांचे उंबरठे झिजविताना दिसत आहे. मागीलवर्षीचे बँकेचे कर्ज थकीत असल्यामुळे यावर्षी बि-बियाणे व खतांची सोय कशी करावी, या विवंचनेत शेतकºयांनी मागीलवर्षी कपाशीऐवजी दुसरा पर्याय शोधत सोयाबीन, हळद व इतर पिके घेण्याचा प्रयत्न केला. परंतु याचा काहीही फायदा झाला नाही. तालुक्यात कपाशीचे पीक हे मुख्य पीक असून या भागातील जमीन कपाशीच्या पिकासाठी अतिशय चांगली आहे. कपाशीच्या आलेल्या नवीन जातीच्या बियाणाची लागवड सर्वप्रथम या भागात केली जाते. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणारे शेतकरी या तालुक्यात आहे. परंतु उत्पादन वाढ होऊनही खर्चाएवढाही भाव शेतमालकाला मिळत नसल्याची शेतकऱ्यांची खंत आहे. यावर्षी मान्सून लांबणीवर पडल्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बियाणे व रासायनिक खताच्या काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नयेतालुक्यात काही भागात पाऊस यायच्या आधीच धुळ पेरणी केल्या जाते. यावर्षीदेखील काही शेतकऱ्यांनी कोरड्यातच पेरणी केली. शेतकऱ्यांनी शक्यतोवर पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरूवात करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोपाल शेरखाने यांनी केले आहे. शासनाची मान्यता असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे, इतर कोणतेही अप्रमाणित बियाणे वापरू नये, असेही ते म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस