शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या उत्पादनात घट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:02 IST

यावर्षी कापूस शेतकऱ्यांना दगा देण्याची चिन्हे आहेत. सलग दुसºया वर्षीही निसर्गाची अवकृपा झाल्याने कापसाचे उत्पादन यावर्षीही घटणार, अशी भीती शेतकºयांमध्ये आहे. झाडांची वाढ खुंटल्याने फळांची संख्या घटणार, यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देझाडांची वाढ खुंटली : कापूस उत्पादकांवर निसर्गाची अवकृपा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यावर्षी कापूस शेतकऱ्यांना दगा देण्याची चिन्हे आहेत. सलग दुसºया वर्षीही निसर्गाची अवकृपा झाल्याने कापसाचे उत्पादन यावर्षीही घटणार, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. झाडांची वाढ खुंटल्याने फळांची संख्या घटणार, यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे.मागील वर्षी बोंडअळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रडवून सोडले. शासनाने भरपाईची तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. शासकीय मदतीतून बि-बियाणांचा खर्च तरी भागला. मात्र शेती फायद्याची न ठरल्याने शेतकऱ्यांना कुटुंबाचा गाडा हाकताना प्रचंड कसरत करावी लागली. वणी विभागात कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. आता कापूस, सोयाबीन व तूर ही तीनच मुख्य पिके शेतकऱ्यांचा आधार ठरताहेत. या भागात सिंचनाच्या सुविधा नाही. केवळ आठ टक्के शेती सिंचनाखाली आहे. त्यामुळे इतर जोडपिके व रबी हंगाम हा शेतकऱ्यांच्या उपयोगाचा ठरत नाही. म्हणूनच वारंवार दगा देत असतानाही शेतकऱ्यांना कापूस या कोरडवाहू पिकाचीच पेरणी करावी लागते. यावर्षी कापूस पेरणी झाल्यानंतर पाऊस अधिक प्रमाणात आला. त्यामुळे कापसाच्या झाडांना वाढण्यास वाव मिळाला नाही. त्यानंतर यावर्षीसुद्धा बोंडअळीचा प्रादूर्भाव लवकर व मोठ्या प्रमाणात होईल, अशा बातम्या कानावर पडत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस झाडावर सुरूवातीपासून किटकनाशकांचा फवारा सपाट्याने सुरू केला. परिणामी किटकनाशकांच्या मात्रा अधिक झाल्याने झाडांची वाढ पुन्हा खुंटली. झाडांना फांद्या फुटून त्याचा विस्तार झालाच नाही. अजुनही शेतात कापसाची झाडे उभाट स्वरूपातच दिसून येते. झाडांचा पसारा न वाढल्याने बोंडाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी बोंडअळीचा प्रकोप नसूनही कापसाचे उत्पादन घटणार आहे. यंदा शेतकऱ्यांचा खते व किटकनाशके यावरील खर्च वाढल्याने मशागत खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी कापसाला किमान आठ हजार रूपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. कापसाचे भाव पाडल्यास शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरणे कठीण होणार आहे.कापसाला हवा आठ हजार रूपये भावकापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे नफा पाडायचा असेल तर शासनाने कापसाला प्रति क्विंटल आठ हजार रूपये भाव देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कृषी विद्यापीठांच्या तज्ज्ञ समितीने कापसाचा उत्पादन खर्च सात हजार २७२ रूपये काढला आहे. मात्र शासनाचा हमी भाव पाच हजार ४५० रूपये आहे. शेतकऱ्यांना एक हजार ८५२ रूपयांचा तोटा सहन करूनच कापूस विकावा लागतो, हे कापसाचे अर्थशास्त्र आहे. तर मग कापूस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होणार नाही काय, ‘शिमग्याला पीक अन् दिवाळीला भिक’ अशी शेतकऱ्यांची सदैव स्थिती असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत वाढत आहे. शासन मात्र ‘जखम शेंडीला अन् पट्टी मांडीला’ धोरण राबवित असल्याने शेतकरी देशोधडीला लागत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळcottonकापूस