शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

कापूस चुकाऱ्याचे साडेदहा कोटी अडले

By admin | Updated: November 25, 2015 06:21 IST

पणन महासंघाच्या माध्यमातून सीसीआयने खरेदी केलेल्या कापूस चुकाऱ्याचे तब्बल साडेदहा कोटी रुपये अडकले

यवतमाळ : पणन महासंघाच्या माध्यमातून सीसीआयने खरेदी केलेल्या कापूस चुकाऱ्याचे तब्बल साडेदहा कोटी रुपये अडकले असून गत २० दिवसात एकाही शेतकऱ्याला चुकारा मिळाला नाही. परिणामी रबी हंगामाच्या पेरणीची आशा लावून बसलेले शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहे. सोयाबीनने दगा दिल्यानंतर रबीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपल्या घरातील कापूस पणनच्या माध्यमातून सीसीआयला विकला. ९ नोव्हेंबरपासून आजपर्यंत सीसीआयने सुमारे २६ हजार २४० क्ंिवटल कापूस खरेदी केला आहे. खासगी व्यापारी कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सीसीआयने सुरू केलेल्या पणनच्या केंद्रावर कापसाची विक्री केली. मुहूर्ताला कापूस देणाऱ्या शेतकऱ्यांनाच केवळ आतापर्यंत मोबदला मिळाला. त्यानंतर गत २० दिवसात सीसीआयला विकलेल्या कापसापैकी एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही. विशेष म्हणजे कापूस विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी हमी सीसीआयकडून देण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील संपूर्ण केंद्रांवरील कापसाचे चुकारे थकले आहे.रबीच्या पेरणीसाठी शेतकरी कापूस विकत आहे. आता चुकारे थकल्याने शेतकऱ्यांना पुन्हा पैशाची तजवीज करावी लागत आहे. कापूस विकून आलेल्या पैशात गहू, हरभरा पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी केली जाणार होती. परंतु आता कापूस विकल्यानंतरही शेतकऱ्यांना चुकाऱ्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ९ नोव्हेंबर रोजी कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही चुकारा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले रहावे म्हणून शासन अभियान राबवित आहे. तर दुसरीकडे शासनाची यंत्रणा असलेल्या सीसीआयकडून शेतकऱ्यांना मन:स्ताप दिला जात आहे. या गंभीर प्रकरणाची स्थानिक प्रशासन अथवा राजकीय पुढाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)आॅनलाईन पद्धतीचा फटका सीसीआयने प्रथमच कापसाचे चुकारे देण्यासाठी आॅनलाईन पद्धतीचा अवलंब केला आहे. सात दिवसाच्या आत चुकारे व्हावे यासाठी थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात या यंत्रणेचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कापूस खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांचा बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड पणनच्या कार्यालयात पाठविला जातो. तेथे त्याची तपासणी करून आॅनलाईन अथवा फॅक्सद्वारे हा संदेश सीसीआयच्या नागपूर कार्यालयाला पाठविण्यात येतो. त्यानंतर सीसीआयकडून मोबदल्याची रक्कम बँकांकडे पाठविली जाते. आरटीजीएस द्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते दहा आकडी असणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांकडे बँकेचा आयएफएससी कोडच उपलब्ध नाही. शेतकऱ्यांची बँक खाती जुनी असल्याने त्यात पैसा जमा करता येत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे चुकारे अडकले आहे.