शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

वऱ्हाडातील कापूस बेल्ट 'लाल्या'ने होरपळला; सात लाख हेक्टरचे नुकसान

By रूपेश उत्तरवार | Updated: November 12, 2022 12:47 IST

दोन वेचण्यांतच उलंगवाडी

यवतमाळ : संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा प्रांत कापूस उत्पादक प्रांत म्हणून ओळखला जातो. गतवर्षी कापसाला चांगला दर मिळाला. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी कापसाकडे वळले. मात्र शेतशिवारावर लाल्या रोगाचे आक्रमण झाले. दोन वेचण्यांतच कापसाची उलंगवाडी होईल, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यातून कापसाचे एकूण उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे यंदाचा कापूस हंगाम ६५ लाख गाठींवर थांबण्याचा धोका कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

परतीच्या पावसाने कापसाच्या पिकाचे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान केले. राज्यभरात झालेल्या कापूस लागवडीच्या क्षेत्रातील २७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १७ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भ आणि मराठवाड्यातील आहे. एकूण क्षेत्रापैकी ७ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाला लाल्या रोगाने भुईसपाट केले आहे. याठिकाणी पहिल्या ते दुसऱ्या वेचणीतच पन्हाटीची झाडे लाल पडली. कापसाचे बोंड फुटून कपाशी निर्जीव झाली आहे. येथे पुन्हा "कापसाचे उत्पादन येणार की नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, शेगाव, खामगाव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये कपाशीचे पीक लाल पडले आहे. संपूर्ण कापूस एकाचवेळी फुटला आहे. नव्याने पात्या, बोंड आणि हिरवी पालवीच पिकांना राहिलेली नाही. यामुळे शेतकरी अधिक चिंतेत सापडले आहेत. मुख्यतः याच भागातून कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. सध्या याठिकाणी जिनिंगमध्ये कापूसच विक्रीला येण्याचे प्रमाण घटले आहे. शेतकऱ्यांच्या घरात मोजकाच कापूस शिल्लक राहिला आहे.

दरवर्षी देशभरात ८५ ते ९० लाख कापूस गाठींचे उत्पादन कापूस प्रांतात होते. यावर्षी कापसाची स्थिती गंभीर असल्याने हे उत्पादन ६५ लाख गाठींपर्यंत खाली येण्याचा धोका वर्तविला जात आहे. यातून शेतीचे अर्थकारणच बदलण्याचा धोका आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागणार आहे.

तर रब्बीचे पीक घ्यावे लागेल 

लाल्यामुळे कापूस उत्पादक प्रांतातील शेतकरी तूट भरून "काढण्यासाठी गहू आणि हरभऱ्याची लागवड करण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यातून रब्बीचे क्षेत्र सर्वत्र अचानक वाढण्याची शक्यता आहे.

निसर्ग प्रकोपाने कापसाचे उत्पादन घटण्याचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी एक ते दोन वेचण्यांत कापसाची उलंगवाडी होणार आहे. अशा स्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अमेरिकेप्रमाणे सबसिडी द्यावी. कापसाचे भाव जाहीर करण्यापेक्षा रुईचे दर जाहीर करावे. कापूस आयातीवर कर लावावा आणि कापूस गाठींच्या वाहतुकीला सबसिडी द्यावी.

विजय जावंधिया, कृषी अभ्यासक

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसVidarbhaविदर्भ