शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Coronavirus in Yawatmal; यवतमाळात आयसीयू बेडअभावी होणाऱ्या मृत्यूची नोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 19:32 IST

Yawatmal news वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात त्रिस्तरीय उपचार पद्धतीची व्यवस्था केली आहे. मध्यम, गंभीर व अतिगंभीर अशा रुग्णांची त्या-त्या वाॅर्डांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. आयसीयू व्यतिरिक्त सारी व आयसोलेशन वाॅर्डातील मृत्यूची स्वतंत्र नोंद घेण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देशासकीय कोविड रुग्णालयातील मृत्यूचे एकत्रितच आकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात त्रिस्तरीय उपचार पद्धतीची व्यवस्था केली आहे. मध्यम, गंभीर व अतिगंभीर अशा रुग्णांची त्या-त्या वाॅर्डांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. आयसीयू व्यतिरिक्त सारी व आयसोलेशन वाॅर्डातील मृत्यूची स्वतंत्र नोंद घेण्यात आलेली नाही. संपूर्ण कोविड रुग्णालयातील एकूण डाटा ठेवला जात आहे. त्यामुळे आयसीयू सुविधेअभावी किती जणांचा मृत्यू झाला हे भयाण वास्तव पुढे येताना दिसत नाही.

शासकीय कोविड रुग्णालयात १ मार्च ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ४०३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये १६ जणांना मृतावस्थेतच रुग्णालयात आणण्यात आले होते. नंतर मृत्यूचे तांडव सुरू झाले. १ मार्च ते ४ मे या ६५ दिवसांच्या कालावधीत तब्बल ७२४ जणांचा मृत्यू झाला. यात ४३ जण मृतावस्थेत आले होते. त्यांना कुठेही उपचार सुविधा मिळाली नसल्याने जीव गमवावा लागला.

बेडच्या प्रतीक्षेत मृत्यू

फिवर ओपीडीसमोर बेड उपलब्ध होईल या प्रतीक्षेत असलेल्या गंभीर रुग्णांचा कित्येकदा मृत्यू होतो. तरी त्याला दाखल करून घेण्यास असमर्थता असते. रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याच्या घटनाही येथील कोविड रुग्णालयात घडल्या आहेत.

कॅज्युअटीमधील मृत्यूला जबाबदार कोण

शासकीय कोविड रुग्णालयातील ५७७ खाटा गेल्या अनेक महिन्यांपासून फुल्ल आहेत. रुग्णाला सुटी झाली किंवा एखाद्याचा मृत्यू झाला तरच नव्या रुग्णाला दाखल करून घेतले जाते. रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या रुग्णाची फिवर ओपीडीमध्ये तपासणी होते. त्याला ऑक्सिजनची गरज भासल्यास तात्पुरत्या स्वरूपात अपघात कक्षात भरती केले जाते. मात्र, येथे त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याच्यावर आयसीयू उपचाराची सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे अपघात कक्षात होणाऱ्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सातत्याने गंभीर रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. १७ वाॅर्डमध्ये केवळ कोविड व कोविडसदृश रुग्णांवर उपचार सुरू आहेत. व्हेंटिलेटर्स व इतर साधनेसुद्धा कमी पडत आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर निश्चितच ताण आला आहे. नागरिकांनी वेळेत येणे गरजेचे आहे.

- डाॅ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस