शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

Coronavirus in Yawatmal; यवतमाळात आयसीयू बेडअभावी होणाऱ्या मृत्यूची नोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 19:32 IST

Yawatmal news वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात त्रिस्तरीय उपचार पद्धतीची व्यवस्था केली आहे. मध्यम, गंभीर व अतिगंभीर अशा रुग्णांची त्या-त्या वाॅर्डांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. आयसीयू व्यतिरिक्त सारी व आयसोलेशन वाॅर्डातील मृत्यूची स्वतंत्र नोंद घेण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देशासकीय कोविड रुग्णालयातील मृत्यूचे एकत्रितच आकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात त्रिस्तरीय उपचार पद्धतीची व्यवस्था केली आहे. मध्यम, गंभीर व अतिगंभीर अशा रुग्णांची त्या-त्या वाॅर्डांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. आयसीयू व्यतिरिक्त सारी व आयसोलेशन वाॅर्डातील मृत्यूची स्वतंत्र नोंद घेण्यात आलेली नाही. संपूर्ण कोविड रुग्णालयातील एकूण डाटा ठेवला जात आहे. त्यामुळे आयसीयू सुविधेअभावी किती जणांचा मृत्यू झाला हे भयाण वास्तव पुढे येताना दिसत नाही.

शासकीय कोविड रुग्णालयात १ मार्च ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ४०३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये १६ जणांना मृतावस्थेतच रुग्णालयात आणण्यात आले होते. नंतर मृत्यूचे तांडव सुरू झाले. १ मार्च ते ४ मे या ६५ दिवसांच्या कालावधीत तब्बल ७२४ जणांचा मृत्यू झाला. यात ४३ जण मृतावस्थेत आले होते. त्यांना कुठेही उपचार सुविधा मिळाली नसल्याने जीव गमवावा लागला.

बेडच्या प्रतीक्षेत मृत्यू

फिवर ओपीडीसमोर बेड उपलब्ध होईल या प्रतीक्षेत असलेल्या गंभीर रुग्णांचा कित्येकदा मृत्यू होतो. तरी त्याला दाखल करून घेण्यास असमर्थता असते. रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याच्या घटनाही येथील कोविड रुग्णालयात घडल्या आहेत.

कॅज्युअटीमधील मृत्यूला जबाबदार कोण

शासकीय कोविड रुग्णालयातील ५७७ खाटा गेल्या अनेक महिन्यांपासून फुल्ल आहेत. रुग्णाला सुटी झाली किंवा एखाद्याचा मृत्यू झाला तरच नव्या रुग्णाला दाखल करून घेतले जाते. रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या रुग्णाची फिवर ओपीडीमध्ये तपासणी होते. त्याला ऑक्सिजनची गरज भासल्यास तात्पुरत्या स्वरूपात अपघात कक्षात भरती केले जाते. मात्र, येथे त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याच्यावर आयसीयू उपचाराची सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे अपघात कक्षात होणाऱ्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सातत्याने गंभीर रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. १७ वाॅर्डमध्ये केवळ कोविड व कोविडसदृश रुग्णांवर उपचार सुरू आहेत. व्हेंटिलेटर्स व इतर साधनेसुद्धा कमी पडत आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर निश्चितच ताण आला आहे. नागरिकांनी वेळेत येणे गरजेचे आहे.

- डाॅ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस