शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची बळीसंख्या सातशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:41 IST

मंगळवारी सात मृत्यू : यवतमाळचे तीन, महागाव दोन तर पांढरकवडा व वणीचा एक यवतमाळ : जिल्ह्यात घुसलेल्या कोरोनाने अवघ्या ...

मंगळवारी सात मृत्यू : यवतमाळचे तीन, महागाव दोन तर पांढरकवडा व वणीचा एक

यवतमाळ : जिल्ह्यात घुसलेल्या कोरोनाने अवघ्या साडेतीनशे दिवसात ७०१ माणसांचा बळी घेतला. गेल्या दीड महिन्यापासून दररोज सुरू असलेली मृत्यूमालिका मंगळवारीही कायम राहिली. मंगळवारी कोरोनाने आणखी सात रुग्ण मारले. तर दिवसभरात ३२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अजूनही ३१०२ रुग्णांची कोरोनाशी झुंज सुरूच असून गेल्या १५ दिवसांपासून कायम असलेला २.२४ हा मृत्यूदर कमी होताना दिसत नाही.

मंगळवारी दगावलेल्या सात जणांपैकी तिघे यवतमाळातील आहेत. त्यात एक ६२ व एक ७२ वर्षीय पुरुष आहे. तसेच एका ५८ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. याशिवाय महागावमधील ६१ व ८२ वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील ८० वर्षीय पुरुष, वणी येथील ७८ वर्षीय पुरुषाचाही मंगळवारी मृत्यू नोंदविला गेला.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या अहवालानुसार मंगळवारी दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या ३५७ जणांपैकी २०७ पुरुष तर १२० महिला आहेत. यात १०६ पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या यवतमाळात आढळले हे विशेष. तसेच उमरखेड ८१, महागाव २९, पुसद २३, कळंब १४, नेर १४, झरी जामणी १४, घाटंजी ११, आर्णी ११, वणी १०, दारव्हा ९, दिग्रस ८, पांढरकवडा ५, बाभूळगाव ४ तर अन्य शहरातील आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

मंगळवारी एकूण ३३९३ अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यापैकी ३२७ पॉझिटिव्ह तर ३०६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१०२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी १५९६ रुग्ण रुग्णालयात भरती असून १५०६ रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या तब्बल ३१ हजार २७९ आहे. गेल्या २४ तासात ३३७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या २७ हजार ४७६ इतकी आहे. या दरम्यानच्या काळात ७०१ नागरिकांचा मृत्यू नोंदविला गेला. सद्यस्थितीत जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर १०.७१ असून मृत्यूदर २.२४ इतका आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत दोन लाख ९१ हजार ९८१ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी दोन लाख ८९ हजार ९५ अहवाल प्राप्त झाले. तर दोन हजार ८८६ अहवालांची प्रतीक्षा आहे. तसेच दोन लाख ५७ हजार ८१६ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले.

बॉक्स

संक्रमणाची गती थांबता थांबेना

जिल्ह्यात कोरोना पसरण्याचा वेग गेल्या महिनाभरापासून कायम आहे. दररोज सुमारे ४०० नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर गेल्या १५ दिवसांपासून दहापेक्षा जास्त आहे. विभागीय आयुक्तांनी आढावा घेऊन हा दर कमी करण्याचे नुकतेच निर्देशही दिले. मात्र प्रशासनाने जंगजंग पछाडल्यानंतरही पॉझिटिव्हिटी दर मंगळवारपर्यंत १०.७१ इतकाच कायम होता. त्याहून गंभीर म्हणजे दररोज ८ ते १२ रुग्णांचा मृत्यू नोंदविला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदरही १५ दिवसांपासून २.२४ इतकाच कायम आहे. पॉझिटिव्हिटी आणि डेथ रेट हे दोन्ही आकडे कमी करण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.