शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

कोरोनाची बळीसंख्या सातशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:41 IST

मंगळवारी सात मृत्यू : यवतमाळचे तीन, महागाव दोन तर पांढरकवडा व वणीचा एक यवतमाळ : जिल्ह्यात घुसलेल्या कोरोनाने अवघ्या ...

मंगळवारी सात मृत्यू : यवतमाळचे तीन, महागाव दोन तर पांढरकवडा व वणीचा एक

यवतमाळ : जिल्ह्यात घुसलेल्या कोरोनाने अवघ्या साडेतीनशे दिवसात ७०१ माणसांचा बळी घेतला. गेल्या दीड महिन्यापासून दररोज सुरू असलेली मृत्यूमालिका मंगळवारीही कायम राहिली. मंगळवारी कोरोनाने आणखी सात रुग्ण मारले. तर दिवसभरात ३२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अजूनही ३१०२ रुग्णांची कोरोनाशी झुंज सुरूच असून गेल्या १५ दिवसांपासून कायम असलेला २.२४ हा मृत्यूदर कमी होताना दिसत नाही.

मंगळवारी दगावलेल्या सात जणांपैकी तिघे यवतमाळातील आहेत. त्यात एक ६२ व एक ७२ वर्षीय पुरुष आहे. तसेच एका ५८ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. याशिवाय महागावमधील ६१ व ८२ वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील ८० वर्षीय पुरुष, वणी येथील ७८ वर्षीय पुरुषाचाही मंगळवारी मृत्यू नोंदविला गेला.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या अहवालानुसार मंगळवारी दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या ३५७ जणांपैकी २०७ पुरुष तर १२० महिला आहेत. यात १०६ पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या यवतमाळात आढळले हे विशेष. तसेच उमरखेड ८१, महागाव २९, पुसद २३, कळंब १४, नेर १४, झरी जामणी १४, घाटंजी ११, आर्णी ११, वणी १०, दारव्हा ९, दिग्रस ८, पांढरकवडा ५, बाभूळगाव ४ तर अन्य शहरातील आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

मंगळवारी एकूण ३३९३ अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यापैकी ३२७ पॉझिटिव्ह तर ३०६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१०२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी १५९६ रुग्ण रुग्णालयात भरती असून १५०६ रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या तब्बल ३१ हजार २७९ आहे. गेल्या २४ तासात ३३७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या २७ हजार ४७६ इतकी आहे. या दरम्यानच्या काळात ७०१ नागरिकांचा मृत्यू नोंदविला गेला. सद्यस्थितीत जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर १०.७१ असून मृत्यूदर २.२४ इतका आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत दोन लाख ९१ हजार ९८१ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी दोन लाख ८९ हजार ९५ अहवाल प्राप्त झाले. तर दोन हजार ८८६ अहवालांची प्रतीक्षा आहे. तसेच दोन लाख ५७ हजार ८१६ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले.

बॉक्स

संक्रमणाची गती थांबता थांबेना

जिल्ह्यात कोरोना पसरण्याचा वेग गेल्या महिनाभरापासून कायम आहे. दररोज सुमारे ४०० नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर गेल्या १५ दिवसांपासून दहापेक्षा जास्त आहे. विभागीय आयुक्तांनी आढावा घेऊन हा दर कमी करण्याचे नुकतेच निर्देशही दिले. मात्र प्रशासनाने जंगजंग पछाडल्यानंतरही पॉझिटिव्हिटी दर मंगळवारपर्यंत १०.७१ इतकाच कायम होता. त्याहून गंभीर म्हणजे दररोज ८ ते १२ रुग्णांचा मृत्यू नोंदविला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदरही १५ दिवसांपासून २.२४ इतकाच कायम आहे. पॉझिटिव्हिटी आणि डेथ रेट हे दोन्ही आकडे कमी करण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.