शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

कोरोनाची बळीसंख्या सातशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:41 IST

मंगळवारी सात मृत्यू : यवतमाळचे तीन, महागाव दोन तर पांढरकवडा व वणीचा एक यवतमाळ : जिल्ह्यात घुसलेल्या कोरोनाने अवघ्या ...

मंगळवारी सात मृत्यू : यवतमाळचे तीन, महागाव दोन तर पांढरकवडा व वणीचा एक

यवतमाळ : जिल्ह्यात घुसलेल्या कोरोनाने अवघ्या साडेतीनशे दिवसात ७०१ माणसांचा बळी घेतला. गेल्या दीड महिन्यापासून दररोज सुरू असलेली मृत्यूमालिका मंगळवारीही कायम राहिली. मंगळवारी कोरोनाने आणखी सात रुग्ण मारले. तर दिवसभरात ३२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अजूनही ३१०२ रुग्णांची कोरोनाशी झुंज सुरूच असून गेल्या १५ दिवसांपासून कायम असलेला २.२४ हा मृत्यूदर कमी होताना दिसत नाही.

मंगळवारी दगावलेल्या सात जणांपैकी तिघे यवतमाळातील आहेत. त्यात एक ६२ व एक ७२ वर्षीय पुरुष आहे. तसेच एका ५८ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. याशिवाय महागावमधील ६१ व ८२ वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील ८० वर्षीय पुरुष, वणी येथील ७८ वर्षीय पुरुषाचाही मंगळवारी मृत्यू नोंदविला गेला.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या अहवालानुसार मंगळवारी दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या ३५७ जणांपैकी २०७ पुरुष तर १२० महिला आहेत. यात १०६ पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या यवतमाळात आढळले हे विशेष. तसेच उमरखेड ८१, महागाव २९, पुसद २३, कळंब १४, नेर १४, झरी जामणी १४, घाटंजी ११, आर्णी ११, वणी १०, दारव्हा ९, दिग्रस ८, पांढरकवडा ५, बाभूळगाव ४ तर अन्य शहरातील आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

मंगळवारी एकूण ३३९३ अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यापैकी ३२७ पॉझिटिव्ह तर ३०६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३१०२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी १५९६ रुग्ण रुग्णालयात भरती असून १५०६ रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या तब्बल ३१ हजार २७९ आहे. गेल्या २४ तासात ३३७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या २७ हजार ४७६ इतकी आहे. या दरम्यानच्या काळात ७०१ नागरिकांचा मृत्यू नोंदविला गेला. सद्यस्थितीत जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर १०.७१ असून मृत्यूदर २.२४ इतका आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत दोन लाख ९१ हजार ९८१ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी दोन लाख ८९ हजार ९५ अहवाल प्राप्त झाले. तर दोन हजार ८८६ अहवालांची प्रतीक्षा आहे. तसेच दोन लाख ५७ हजार ८१६ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले.

बॉक्स

संक्रमणाची गती थांबता थांबेना

जिल्ह्यात कोरोना पसरण्याचा वेग गेल्या महिनाभरापासून कायम आहे. दररोज सुमारे ४०० नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर गेल्या १५ दिवसांपासून दहापेक्षा जास्त आहे. विभागीय आयुक्तांनी आढावा घेऊन हा दर कमी करण्याचे नुकतेच निर्देशही दिले. मात्र प्रशासनाने जंगजंग पछाडल्यानंतरही पॉझिटिव्हिटी दर मंगळवारपर्यंत १०.७१ इतकाच कायम होता. त्याहून गंभीर म्हणजे दररोज ८ ते १२ रुग्णांचा मृत्यू नोंदविला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदरही १५ दिवसांपासून २.२४ इतकाच कायम आहे. पॉझिटिव्हिटी आणि डेथ रेट हे दोन्ही आकडे कमी करण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.