शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नरमला... जिल्हा यापुढेही राहणार बंधनमुक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

जिल्ह्यात निर्बंध हटविण्यासाठी जिल्ह्यांच्या पाच श्रेणी निश्चित केल्या. त्यासाठी ऑक्सिजन बेडची उपलब्धता २० टक्के पेक्षा अधिक असणे आणि पाॅझिटिव्हिटी रेट ५ टक्केपेक्षा कमी असणे हे दोन महत्त्वाचे निकष ठरविण्यात आले. त्यानुसार यवतमाळ जिल्हा श्रेणी एकमध्ये समाविष्ट होता. त्यावेळी जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी दर हा १.२६ इतका होता. तर २२७९ बेडपैकी २०६३ बेड उपलब्ध होते. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ७ जूनपासून जिल्हा अनलाॅक केला.

ठळक मुद्देआठवड्यानंतरही पहिल्या श्रेणीतच : अनलाॅकनंतर संसर्ग दर पाच टक्क्यांच्या खाली ठेवण्यात यवतमाळला यश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचे रुग्ण घटल्याने जिल्हा ७ जूनपासून अनलाॅक करण्यात आला होता. मात्र अनलाॅक काळात गर्दी वाढून संसर्ग वाढल्यास पुन्हा निर्बंध घातले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र ४ ते १० जून या आठवडाभरात संपूर्ण बाजारपेठ खुली असूनही जिल्ह्यात संसर्ग दर आटोक्यातच म्हणजे २.९१ टक्के राहिला. त्यामुळे पुढचा आठवडाही जिल्ह्यात कोणतेही निर्बंध घातले जाणार नाही.गेल्या सव्वा वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने बस्तान मांडले आहे. त्यामुळे बाजारपेठे सतत बंद ठेवावी लागली होती. नागरिकांच्या फिरण्यावर बंधने आली होती. लाॅकडाऊनचा जाच सोसल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात कशीबशी नियंत्रणात येत आहे. सात हजारांवर पोहोचलेला ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता सहाशेपर्यंत खाली आला आहे. याच दरम्यान राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीने विविध जिल्ह्यात निर्बंध हटविण्यासाठी जिल्ह्यांच्या पाच श्रेणी निश्चित केल्या. त्यासाठी ऑक्सिजन बेडची उपलब्धता २० टक्के पेक्षा अधिक असणे आणि पाॅझिटिव्हिटी रेट ५ टक्केपेक्षा कमी असणे हे दोन महत्त्वाचे निकष ठरविण्यात आले. त्यानुसार यवतमाळ जिल्हा श्रेणी एकमध्ये समाविष्ट होता. त्यावेळी जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी दर हा १.२६ इतका होता. तर २२७९ बेडपैकी २०६३ बेड उपलब्ध होते. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ७ जूनपासून जिल्हा अनलाॅक केला. जिल्ह्यातील बाजारपेठेवरील सर्व बंधने हटविण्यात आली. तसेच संचारबंदी व जमावबंदीचा आदेशही मागे घेण्यात आला. परंतु, निर्बंध हटविले तरी प्रत्येकासाठी मास्कचा वापर अजूनही बंधनकारकच आहे. अनलाॅक काळात दर आठवड्याला जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला जाणार आणि परिस्थिती पाहून गरज भासल्यास पुन्हा निर्बंध घातले जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या ६ जूनच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले होते.विशेष म्हणजे, राज्यात विविध जिल्हे अनलाॅक झाल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने आता ४ ते १० जून या कालावधीतील विविध जिल्ह्यांच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. या आढव्यात ज्या जिल्ह्यांचा पाॅझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा वाढला आहे, तेथे पुन्हा एकदा निर्बंध घातले जाणार आहेत. सुदैवाने यवतमाळ जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी दर १० जून रोजीही २.९१ इतका आहे. तर ऑक्सिजन बेडची उपलब्धताही २० टक्केपेक्षा जास्त आहे. 

  अशी आहे जिल्ह्यातील सध्यस्थिती - ४ ते १० जून या काळात जिल्ह्यात ४४ हजार २३८ जणांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी केवळ १२८६ नागरिक पाॅझिटिव्ह आढळले. हा संसर्ग दर २.९१ टक्के होता. हा दर पाच टक्क्यांच्या खालीच असल्याने यापुढेही निर्बंध घातले जाणार नाही. शिवाय, जिल्ह्यातील एकंदर बेडपैकी केवळ ५.२८ टक्के बेडवरच रुग्ण आहेत. तर अन्य बेड रिकामे आहेत. ३७ ऑक्सिजन बेडवर रुग्ण असून ८३७ बेड रिक्त आहेत. तर फक्त १६ व्हेंटीलेशन बेडवर रुग्ण असून ११३ बेड रिक्त आहेत. 

शासनाच्या यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे आपला जिल्हा लेव्हल वनमध्ये होता. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात शंभर टक्के अनलाॅक झाले. तर आता आठवडाभराच्या आढाव्यानंतरही आपण लेव्हल वनमध्येच आहो. त्यामुळे जिल्ह्यात कोणतेही बंधने घातली जाणार नाहीत. दुर्दैवाने जर पुढच्या आठवड्यात संसर्ग दर वाढला तर पुन्हा बंधने घालावेच लागतील.      

- अमोल येडगे, जिल्हाधिकारी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या