शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कोरोनाने सलग तिसऱ्या दिवशी घेतला दोन तरुणांसह १५ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

विशेष म्हणजे रविवारी आणि सोमवारीही कोरोनाने प्रत्येकी १५ बळी घेतले. मंगळवारी दगावलेल्या १५ जणांमध्ये ३४ व ४२ वर्षीय दोन तरुणांसह १३ वृद्धांचा समावेश आहे. त्यापैकी मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील ८४, ६५ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ५० वर्षीय महिला, तालुक्यातील ५७, ९० वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ६२ वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

ठळक मुद्देसंसर्ग मात्र थंडावला : ७२७ पाॅझिटिव्ह तर ८२४ जणांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना संसर्गाचा वेग मंदावला. त्यामुळे दरदिवशी आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा सतत हजाराच्या खाली येत आहे. मंगळवारीही दिवसभरात ७२७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. तर तब्बल ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र मंगळवारी आणखी १५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यूही झाला. विशेष म्हणजे रविवारी आणि सोमवारीही कोरोनाने प्रत्येकी १५ बळी घेतले. मंगळवारी दगावलेल्या १५ जणांमध्ये ३४ व ४२ वर्षीय दोन तरुणांसह १३ वृद्धांचा समावेश आहे. त्यापैकी मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील ८४, ६५ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ५० वर्षीय महिला, तालुक्यातील ५७, ९० वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ६२ वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये पुसद येथील ६७ वर्षीय पुरुष तर खासगी रुग्णालयात यवतमाळ येथील ३४, ७८ वर्षीय पुरुष, पुसद येथील ६३ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ६५ वर्षीय महिला आणि चंद्रपूर येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. पाॅझिटिव्ह आलेल्या ७२७ जणामध्ये ४५८ पुरुष आणि २६९ महिला आहे. त्यात यवतमाळ १५५, वणी ८४, दिग्रस ८३, दारव्हा ८१, पुसद ७०, झरी जामणी ५४, पांढरकवडा ३१, बाभूळगाव २९, राळेगाव २५, नेर २४, मारेगाव २३, महागाव २१, घाटंजी २०, उमरखेड १९, कळंब ११, आर्णी ६ आणि अन्य शहरातील ११ रुग्णांचा समावेश आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत पाच लाख ४४ हजार ८४६ नमुने तपासण्यात आले. यापैकी पाच लाख ४२ हजार ९७७ अहवाल आले असून १८३९ अप्राप्त आहे. 

६८५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह - मंगळवारी ७५१८ अहवालांपैकी ६८५१ निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत ४३३६ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह आहेत. त्यापैकी २०७१ रुग्णालयात तर २२६५ गृहविलगीकरणात आहे. आतापर्यंत एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८ हजार ९४८ तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६२ हजार ९६२ आहे. दरम्यान १६५० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट १२.६६ इतका असून कोरोनाचा मृत्यूदर २.४९ इतका आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू