शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

दोन दिवसापूर्वी भरती झालेल्या वृद्धाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

कोरोनाने जिल्ह्यात आजवर मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी झाली आहे. कोरोना बळींची संख्या रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजनाही राबवित आहे. मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न होऊन त्यास वेळेस उपचार देण्यास मदत मिळत आहे. जिल्ह्यात आजवर ७२ हजार ८११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असले तरी त्यातील ७१ हजार ९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार जिल्ह्याने अनुभवला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात आजवर तब्बल १७८६ जणांचा बळी घेतलेला आहे. दोन महिन्यापूर्वी कोरोना मृत्यूचे हे थैमान काहीसे थांबले होते. मात्र तब्बल ५१ दिवसानंतर कोरोनाने जिल्ह्यात आणखी एकाचा बळी घेतला आहे. दोन दिवसापूर्वीच झरी तालुक्यातील मुकुटबन येथील ६७ वर्षीय वृद्ध उपचारासाठी वणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. उपचारादरम्यान या वृद्धाचा मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी आणखी दोन कोरोना बाधितही निष्पन्न झाल्याने कोरोनाचा धोका कायम असल्याचे पुन्हा पुढे आले.कोरोनाने जिल्ह्यात आजवर मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी झाली आहे. कोरोना बळींची संख्या रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजनाही राबवित आहे. मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न होऊन त्यास वेळेस उपचार देण्यास मदत मिळत आहे. जिल्ह्यात आजवर ७२ हजार ८११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असले तरी त्यातील ७१ हजार ९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र त्यानंतरही १७८६ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. १५ जून रोजी कोरोनामुळे एका ५० वर्षीय नेर येथील महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर मागील ५० दिवसापासून जिल्ह्यात एकाही कोरोना बळीची नोंद झालेली नाही. दुसरीकडे कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने ब्रेक दी चेन मोहिमेअंतर्गत निर्बंध शिथिल केले जात असतानाच शुक्रवारी वणी येथे उपचार सुरू असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २१६० बेड उपलब्ध- कोरोना रुग्ण घटल्यामुळे जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये तब्बल २१६० बेड रिकामे आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ७८७ बेडपैकी दहा बेड उपयोगात असून ७७७ बेड शिल्लक आहेत. ११ डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये ७५५ पैकी ७५२ खाटा तर १६ खासगी रुग्णालयातील ६३२ पैकी ६३१ खाटा रिकामे पडलेले आहेत.

घाबरु नका, मात्र दक्षता बाळगाजिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ८११ कोरोना रुग्णांपैकी ७१ हजार ९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन आरोग्य यंत्रणा अधिक भक्कम करण्यावर प्रशासनाचा भर आहे. प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नियमावली जाहीर केलेली आहे. काही निर्बंध हटविण्यात आले असले तरी कोरोनाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.- डॉ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू