शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी’ बंद केले अन् ‘शिकाऊ’ आणले! आरोग्य विभागात पदभरतीचा घोटाळा

By अविनाश साबापुरे | Updated: December 14, 2023 16:00 IST

तीन हजार नियमित पदांवर भरले अप्रेंटीस

यवतमाळ : कंत्राटी पदभरतीचा निर्णय मागे घेतल्याचा सरकारने नुकताच गाजावाजा केला. मात्र बाह्यस्त्रोतांद्वारे (आउटसोर्सिंग) कंत्राटी भरतीची पद्धती कायम ठेवली आहे. आता तर त्याही उप्पर शिकाऊ कर्मचारी नेमण्याचा नवीनच घोटाळा उघडकीस आला आहे. आरोग्य विभागात नियमित असलेली तीन हजार पदे प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून केवळ ११ महिन्यांसाठी भरण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानात ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ हे पद नियमित आहे. परंतु, ही ३ हजार २०३ पदे बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी २०२०-२१ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजुरीही देण्यात आली. पुण्याच्या कंपनीला काम देण्यात आले. परंतु, नंतर ही पदे कंत्राटी तत्वावर न भरता ‘शिकाऊ उमेदवार’ म्हणून भरण्यात आली. त्यासाठी ‘अप्रेंटिसशिप ॲक्ट १९६१’ या कायद्याचा सोईनुसार वापर करण्यात आला. 

- का केली ‘शिकाऊ’ भरती?कंत्राटी कर्मचारी भरण्यापेक्षा शिकाऊ उमेदवार नेमल्यास पैसा उरू शकतो, असा प्रस्ताव संबंधित एजन्सीने आरोग्य अभियान संचालकांना सादर केला. आरोग्य अभियानात डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता प्रतिमाह १८ हजार मानधन निश्चित आहे. परंतु हेच कर्मचारी शिकाऊ उमेदवार म्हणून भरल्यास त्यांना केवळ ९ हजार विद्यावेतन द्यावे लागेल. कंत्राटी कर्मचारी घेतल्यास कामगार कायद्यातील किमान वेतन नियमाचे पालन करावे लागते.

इपीएफ, इएसआयसी हे फायदे वेळेवर देणे बंधनकारक असते. परंतु, १९६१ च्या कायद्यानुसार शिकाऊ उमेदवार भरल्यास या बाबी आवश्यक राहणार नाहीत, असे या प्रस्तावात सांगण्यात आले. तसेच ३२०३ कंत्राटी कर्मचारी भरतीमुळे दरवर्षी ५१.८६ कोटी खर्च होतील. मात्र हेच कर्मचारी शिकाऊ म्हणून घेतल्यास प्रतिवर्षी केवळ ४०.३६ कोटींचा खर्च होईल. त्यामुळे दरवर्षी ११.५० कोटी रुपये उरतील, ही बाबही प्रस्तावात सांगण्यात आली. आरोग्य अभियानाने हा प्रस्ताव मान्य करत शिकाऊ भरती केली. त्यासाठी पुण्यातील मे. यशस्वी अकॅडमी फाॅर स्कील्स या एजंसीला ३१ मे २०२१ रोजी पुरवठा आदेश दिला. 

साडेपाच कोटींचा सेवाकर, तरी दीड हजार उकळले

केंद्राकडून डाटा एन्ट्री ऑपरेटरसाठी प्रतिमाह १८ हजारांचे अनुदान देण्यात आले. पण राज्यातील आरोग्य अभियानाने ९ हजारांच्या विद्यावेतनाप्रमाणे यशस्वी अकॅडमी या एजन्सीला शिकाऊ उमेदवार भरण्याचा ठेका दिला. कंपनीला सेवाकरापोटी पाच कोटी ७७ लाख रुपये देण्यात आले. तरीही कंपनीने प्रती डाटा एन्ट्री ऑपरेटर १५०० रूपये उकळले. त्यामुळे ‘शिकाऊ’ योजनेत पैशांची काटकसर नेमकी कोणत्या उद्देशाने करण्यात आली, असा प्रश्न कर्मचारी संघटनेकडून उपस्थित होत आहे.

दरवर्षी काढायचे अन् त्यालाच पुन्हा नेमायचे !

अप्रेन्टीसशिप ॲक्ट हा शिकाऊ उमेदवारांसाठी असताना आरोग्य अभियानात नियमित पदावर विद्यावेतनावर नियुक्ती दिली जात आहे. तीन वर्षापेक्षा जास्त काळ प्रशिक्षण देता येत नाही. त्यामुळे तीन वर्षानंतर उमेदवाराला काढून टाकले जाते. कायद्यानुसार, या उमेदवाराला दुसऱ्या वर्षी १० टक्के व तिसऱ्या वर्षी १५ टक्के विद्यावेतन वाढविण्याची तरतूद आहे. ते टाळण्यासाठी प्रत्येक वर्षी उमेदवाराला कमी करून पुन्हा तोच उमेदवार नव्याने नेमला जातो. नेमक्या याच कारणांमुळे सध्या हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत.

आरोग्य अभियानाकडे नियुक्तीकरिता यंत्रणा असताना यशस्वी कंपनीला नेमण्याचे कारण काय? डाटा एन्ट्री ऑपरेटर आऊटसोर्सिंगद्वारे नियुक्तीकरिता दोन वर्षे फाईल फिरली. मात्र मधातच नस्ती फिरवून शिकाऊ उमेदवारमध्ये परिवर्तीत करण्यात आली. ज्या तांत्रिक पदावर पूर्ण प्रशिक्षित कर्मचाऱ्याची गरज आहे, तेथे प्रशिक्षणार्थी उमेदवार कसे काम करतील? या संपूर्ण प्रकाराची समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.- अशोक जयसिंगपुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना

टॅग्स :YavatmalयवतमाळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHealthआरोग्य