शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या २७० कोटींवर कंत्राटदारांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

मार्च महिन्यापासूनच एक लाखावर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लागली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्च पेड इन एप्रिलमध्ये ५० टक्के, ७५ टक्के असे वेतन देण्यात आले. उर्वरित रक्कम लगेच देण्यात येईल, असे सांगितले गेले. उर्वरित रक्कम तर मिळालीच नाही, एप्रिल महिन्याचा पगार करण्याची तारीख जवळ आली.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचा पगार झालाच नाही : शासनाची थकबाकी देण्यास मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न प्रत्येक महिन्याला निर्माण होत आहे. सरकारने पैसे दिल्यानंतरच पगाराचा मार्ग मोकळा होतो. मे पेड इन जूनच्या वेतनाचीही हीच स्थिती आहे. सरकारने थकबाकी द्यावी यासाठी प्रयत्न झाले. अखेर २७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. हा पैसा आपल्याला मिळावा यासाठी कंत्राटदारांनी प्रयत्न सुरू केले आहे. मात्र या पैशातून पगार व्हावा, यासाठी कर्मचारी आग्रही आहेत.मार्च महिन्यापासूनच एक लाखावर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लागली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्च पेड इन एप्रिलमध्ये ५० टक्के, ७५ टक्के असे वेतन देण्यात आले. उर्वरित रक्कम लगेच देण्यात येईल, असे सांगितले गेले. उर्वरित रक्कम तर मिळालीच नाही, एप्रिल महिन्याचा पगार करण्याची तारीख जवळ आली.लॉकडाऊनमुळे बसेस बंद असल्याने उत्पन्नाचा मार्ग थांबला. एप्रिल महिन्याचे वेतन करण्यासाठी महामंडळाने सरकारकडे उधारी मागितली. १५ तारखेनंतर शासनाने पैसे दिले. यानंतर कुठे पगार झाले. आताही मे महिन्याचा पगार करण्यासाठी पैसा नव्हता. १५ तारीख लोटूनही हाती पगार आला नसल्याने कर्मचाऱ्यांपुढे दैनंदिन गरजा भागवायच्या कशा हा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारकडे विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीची थकबाकी आहे. ही रक्कम मिळावी यासाठी प्रयत्न झाले. अखेर १६ जून रोजी २७० कोटी रुपये रोखीने देण्यास मान्यता देण्यात आली. मात्र आता या रकमेची शकले पडतात की काय, अशी भीती कामगारांमध्ये निर्माण झाली आहे.महामंडळाने अनेक कामे कंत्राटदारांना दिली आहे. त्यांना मार्च महिन्यापासून एक पैसाही देण्यात आला नाही. महामंडळाला तोट्यात ढकलण्यास कारणीभूत ठरलेल्या आणि स्वच्छता ठेवण्याच्या बाबतीत बोंबाबोंब असलेल्या कंपन्यांनी पैशांची मागणी रेटून धरली आहे. या कंपन्यांना पैसा देण्याचा विचार झाल्यास कर्मचाºयांच्या पगाराला पुन्हा कात्री लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.आधी कर्मचाऱ्यांचा पगार द्याशासनाने दिलेल्या पैशातून आधी कर्मचाऱ्यांचा पगार झाला पाहिजे. एकाच टप्प्यात संपूर्ण वेतन त्यांना तात्काळ द्यावे. कंत्राटदार कंपन्यांना महामंडळाने कोट्यवधी रुपये दिले आहे. त्या तुलनेत त्यांनी महामंडळाला आपली सेवा उपलब्ध करून दिली नाही. महामंडळासोबत झालेल्या करारानुसार या कंत्राटदार कंपन्यांनी कामे केली नाही. त्यांना बिले देऊ नये, असे पत्र महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)ने परिवहनमंत्री तथा महामंडळाच्या अध्यक्षांना दिले आहे.

टॅग्स :state transportएसटी