शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

बांधकाम विभागाची दीड कोटीची कामे रखडणार

By admin | Updated: March 27, 2015 01:38 IST

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या चरणात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कामे निकाली काढण्यासाठी सवयीप्रमाणे बॅक डेटचा आधार घेतला जात आहे.

यवतमाळ : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या चरणात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कामे निकाली काढण्यासाठी सवयीप्रमाणे बॅक डेटचा आधार घेतला जात आहे. मात्र यातच मोठी अनियमीतता होत असल्याचा अनुभव असल्याने अर्थ विभागाने प्रस्ताव स्विकृतीस आल्यानंतर दिनांक नोंदविणे सुरू केले. नियमावर बोट ठेऊन कारवाई होत असल्यामुळे बांधकाम विभागाची गोची होत आहे. जिल्हा परिषदेतील दोन्ही बांधकाम विभाग नेहमीच चर्चेत राहतात. येथील कार्यशैलीमुळे विविध स्वरूपाचे वाद निर्माण होतात. याबाबत बांधकाम एक तर सदैवच अग्रेसर राहिला आहे. आता आर्थिक वर्षात निधी खर्च करण्यासाठी घिसाडघाई केली जात आहे. नियमांना फाटा देऊन तयार करण्यात आलेले प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी ही शक्कल अनेक वर्षांपासून वापरली जात आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षातील निधी खर्च करण्यासाठी आणखी एक वर्षांचा अवधी आहे. मात्र २०१४ पर्यंतचा निधी याच वर्षात खर्च करावा लागणार आहे. बांधकाम विभागामध्ये चालणाऱ्या टक्केवारीच्या बाजारामुळे येथील प्रत्येक कामच संशयाने तपासले जाते. याही वर्षी अगदी शेवटच्या टप्प्यात शंभरावर कामे उरकण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव स्विकृतीसाठी अर्थ विभागाकडे पाठविण्यात येत आहे. नियम १४२ अन्वये प्रत्येक कामाला अर्थ विभागाकडून स्विकृती मिळविणे आवश्यक असते. आजपर्यंत मागील तारखेत कामे पूर्ण केली जात होती. अनेक कामांचे तर कार्यादेशही होण्यापूर्वीच कामे उरकण्यात येत होती. आता या प्रकाराला कात्री लावण्यासाठी अर्थ विभागाकडून आपल्या अधिकाराचा वापर केला जात आहे. मुख्य लेखा वित्त अधिकारी सुरेश शहापूरकर यांनी बांधकाम विभागाकडून स्विकृतीसाठी आलेल्या प्रत्येक फाईलवर दिनांक टाकणे सुरू केले आहे. हिच बाब अनियमितता करणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. आतापर्यंत अर्थ व बांधकाम विभागातील समन्वय एका टक्क्यापर्यंत जुळून होता. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी याला छेद दिला आहे. त्यामुळेच बांधकाम विभागाच्या एकंदर कामकाजाचे बिंग फुटले आहे. २०१४ पर्यंतचा निधी खर्च न झाल्यास तो परत जाण्याची भीती आहे. शिवाय २०१५ पर्यंतच्या निधीतील अनेक कामे मोठ्या आत्मविश्वासाने मंजुरी अभावीच पुर्णत्वास आणण्याचा खटाटोप काही ठिकाणी करण्यात आला आहे. आता या प्रकरणामुळे बांधकाम विभागाला मोठी अडचण निर्माण झाली आहे. यावर पदाधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये चुळबुळ निर्माण झाली आहे. नव्याने प्रभार घेतलेल्या कार्यकारी अभियंत्यांकडून या प्रकरणात हात वर करण्यात आले आहे. जुन्याच अभियंतांच्या कार्यकाळातील पेंडींग कामे पूर्ण करण्याची धडपड करत असल्याची केविलवाणी ओरड त्यांच्याकडून होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)