शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागाची दीड कोटीची कामे रखडणार

By admin | Updated: March 27, 2015 01:38 IST

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या चरणात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कामे निकाली काढण्यासाठी सवयीप्रमाणे बॅक डेटचा आधार घेतला जात आहे.

यवतमाळ : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या चरणात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कामे निकाली काढण्यासाठी सवयीप्रमाणे बॅक डेटचा आधार घेतला जात आहे. मात्र यातच मोठी अनियमीतता होत असल्याचा अनुभव असल्याने अर्थ विभागाने प्रस्ताव स्विकृतीस आल्यानंतर दिनांक नोंदविणे सुरू केले. नियमावर बोट ठेऊन कारवाई होत असल्यामुळे बांधकाम विभागाची गोची होत आहे. जिल्हा परिषदेतील दोन्ही बांधकाम विभाग नेहमीच चर्चेत राहतात. येथील कार्यशैलीमुळे विविध स्वरूपाचे वाद निर्माण होतात. याबाबत बांधकाम एक तर सदैवच अग्रेसर राहिला आहे. आता आर्थिक वर्षात निधी खर्च करण्यासाठी घिसाडघाई केली जात आहे. नियमांना फाटा देऊन तयार करण्यात आलेले प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी ही शक्कल अनेक वर्षांपासून वापरली जात आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षातील निधी खर्च करण्यासाठी आणखी एक वर्षांचा अवधी आहे. मात्र २०१४ पर्यंतचा निधी याच वर्षात खर्च करावा लागणार आहे. बांधकाम विभागामध्ये चालणाऱ्या टक्केवारीच्या बाजारामुळे येथील प्रत्येक कामच संशयाने तपासले जाते. याही वर्षी अगदी शेवटच्या टप्प्यात शंभरावर कामे उरकण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव स्विकृतीसाठी अर्थ विभागाकडे पाठविण्यात येत आहे. नियम १४२ अन्वये प्रत्येक कामाला अर्थ विभागाकडून स्विकृती मिळविणे आवश्यक असते. आजपर्यंत मागील तारखेत कामे पूर्ण केली जात होती. अनेक कामांचे तर कार्यादेशही होण्यापूर्वीच कामे उरकण्यात येत होती. आता या प्रकाराला कात्री लावण्यासाठी अर्थ विभागाकडून आपल्या अधिकाराचा वापर केला जात आहे. मुख्य लेखा वित्त अधिकारी सुरेश शहापूरकर यांनी बांधकाम विभागाकडून स्विकृतीसाठी आलेल्या प्रत्येक फाईलवर दिनांक टाकणे सुरू केले आहे. हिच बाब अनियमितता करणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. आतापर्यंत अर्थ व बांधकाम विभागातील समन्वय एका टक्क्यापर्यंत जुळून होता. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी याला छेद दिला आहे. त्यामुळेच बांधकाम विभागाच्या एकंदर कामकाजाचे बिंग फुटले आहे. २०१४ पर्यंतचा निधी खर्च न झाल्यास तो परत जाण्याची भीती आहे. शिवाय २०१५ पर्यंतच्या निधीतील अनेक कामे मोठ्या आत्मविश्वासाने मंजुरी अभावीच पुर्णत्वास आणण्याचा खटाटोप काही ठिकाणी करण्यात आला आहे. आता या प्रकरणामुळे बांधकाम विभागाला मोठी अडचण निर्माण झाली आहे. यावर पदाधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये चुळबुळ निर्माण झाली आहे. नव्याने प्रभार घेतलेल्या कार्यकारी अभियंत्यांकडून या प्रकरणात हात वर करण्यात आले आहे. जुन्याच अभियंतांच्या कार्यकाळातील पेंडींग कामे पूर्ण करण्याची धडपड करत असल्याची केविलवाणी ओरड त्यांच्याकडून होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)