शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी रोडचे बांधकाम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:22 IST

येथील बसस्थानक चौक ते आर्णी रोड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे बांधकाम खात्याच्या तपासणीत उघड झाले आहे.

ठळक मुद्देपीडब्ल्यूडीचे कंत्राटदाराला पत्र : चूक दाखविणाºया अभियंत्यालाच हटविले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील बसस्थानक चौक ते आर्णी रोड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे बांधकाम खात्याच्या तपासणीत उघड झाले आहे. त्यावरून संबंधित कंत्राटदाराला बांधकाम खात्याने नोटीसही बजावली आहे. दरम्यान, कंत्राटदाराला राजकीय पाठबळ मिळाल्याने बांधकाम प्रशासनावर दबाव निर्माण झाला. त्यातूनच निकृष्टतेची चूक दाखविणाºया उपअभियंत्यालाच हटविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया यवतमाळ शहरातील बसस्थानक ते वनवासी मारुती मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण व सुधारणा केली जात आहे. ३८ कोटी ५० लाख रुपये किंमत असलेल्या या मार्गाच्या बांधकामाची लांबी साडेतीन किलोमीटर एवढी आहे. २४ मीटर रुंदीच्या या मार्गावर फुटपाथ, डिवायडर, पथदिवे राहणार आहे. वीज वाहिनीसाठी सहा कोटी तर जलवाहिनीसाठी दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या मार्गावर सुमारे एक किलोमीटर क्षेत्रात ३० मीटर रोड उपलब्ध होणार असून त्या ठिकाणी सहा मीटरमध्ये वृक्ष लागवड केली जाणार आहे. डीटीसीपीएल व बीसीसीपीएच (जे.व्ही.) या नागपुरातील कंपनीमार्फत हे बांधकाम सुरू आहे. कागदावर वनवासी मारुतीपर्यंत हे काम मंजूर असल्याचे दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात या मार्गावरील स्मशानभूमीनंतरच्या एका हॉटेलपर्यंतच हे काम केले जाणार असल्याचे सांगितले जाते. त्या भागातूनच या कामाची सुरुवात करण्यात आली. रस्त्यासोबतच दोन्ही बाजूच्या नाल्याचे बांधकाम केले जात आहे. परंतु हे बांधकाम करताना करारातील निकष कंत्राटदाराकडून पाळले जात नसल्याचा आक्षेप या कामावर नियंत्रण ठेवणाºया उपअभियंत्याने घेतला. त्यामुुळे हे काम निकृष्ट दर्जाचे व नियम, निकष झुगारून केले जात आहे. ड्रेनेजच्या कामामध्ये बेड काँक्रिटच्या खाली मेटलचा थर योग्य नसणे, रेती व मुरूमऐवजी केवळ मुरूम वापरणे, नालीची कॉम्पॅक्टरने दबाई न करणे, चाचण्यांसाठी साहित्य उपलब्ध नसणे, वारंवार सांगूनही प्लॅस्टिसायजर न वापरणे अशा विविध स्वरूपाच्या तक्रारी आहेत. सदर उपअभियंत्याने आपल्यावरील प्रचंड दबाव झुगारून कंत्राटदारांना नोटीस बजावली. शिवाय आपल्या वरिष्ठांनासुद्धा याबाबत अवगत केले. मात्र त्यानंतरही या रोडवरील कामाच्या गुणवत्तेवर फारसा फरक पडला नाही. उलट गुणवत्तेवर आक्षेप घेणाºया उपअभियंत्यालाच अचानक बदलविण्यात आले. राजकीय-प्रशासकीय दबावाला भीक न घालणाºया या कर्तव्यकठोर अभियंत्याची बदली करून त्या ठिकाणी कंत्राटदार व सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या सोयीचे अभियंते नेमण्यात आले आहे. त्यामुळे आर्णी रोडवरील या कामावर यंत्रणा एका विभागाची आणि नियंत्रण ठेवणारे अधिकारी दुसºया विभागाचे, अशी विसंगत स्थिती निर्माण झाली आहे. देशाचे परिवहनमंत्री महामार्गांच्या बांधकामात गुणवत्तेचा आग्रह धरीत असले तरी स्थानिक राजकीय नेतेमंडळी मात्र गुणवत्तेला तेवढी किमत देत नसल्याचे या प्रकरणावरून दिसून आले. आतापर्यंत किमान २५ टक्के काम अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात दहा टक्के झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी डीटीसीपीएल कंत्राटदार कंपनीचे प्रमुख विशाल ठक्कर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या अभियंत्यांनी आपली बाजू स्पष्ट केली.आर्णी रोडचे काम सुरू आहे. तेथे अभियंत्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांच्या पाहणीत कामांमध्ये आढळलेल्या त्रुट्या कंत्राटदाराला सांगून त्या दुरुस्त करण्यात आल्या. ही प्रक्रिया पुढेही चालणार आहे. गुणवत्तेनुसारच काम करून घेतले जाईल. १८ महिन्यात हे काम पूर्ण करून घेतले जाईल. गेल्या सहा महिन्यात दहा टक्के काम झाले आहे. एक किमीचा रस्ता काँक्रीटीकरणापर्यंत आला आहे. तर नाली दोन किमी झाली आहे. हा मार्ग शहरातून जात असल्याने प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्युत पोल, वाहिन्या, जलवाहिन्या, टेलिफोन लाईन या कामांवर बांधकामाची गती अवलंबून आहे.- वाय.एस. लाखाणीकार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प विभाग, यवतमाळबांधकाम खात्याने या कामाबाबत काही त्रुट्या दाखविल्या आहेत. त्या दुरुस्त केल्या जाणार आहेत. करारानुसारच बांधकामाची गुणवत्ता राखली जाईल. पुढेही बांधकाम खात्याकडून दाखविल्या जाणाºया त्रुट्यांचे स्वागतच आहे. त्या तत्काळ दुरुस्त करून गुणवत्तेवर भर दिला जाणार आहे.- रमेश सोनीअभियंता, डीटीसीपीएल, नागपूर