शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

संमती ६२ हजार पालकांची, शाळेत केवळ १५ हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 05:00 IST

राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग भरविणे सुरू केले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून अशी पत्रे गोळा केली. जिल्ह्यात नववी ते बारावीच्या वर्गात १ लाख ४९ हजार ७८५ विद्यार्थी आहेत.

ठळक मुद्देनववी ते बारावीचे वर्ग सुरू : पालकांच्या मनात धाकधुक

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लाॅकडाऊननंतर जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू करताना ६२ हजार ९०९ पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्र दिले. प्रत्यक्षात केवळ १५ हजार ४२१ विद्यार्थीच शाळेत येत आहेत. यावरून पालकांच्या मनात अजूनही धाकधुक असल्याचे स्पष्ट होते. राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग भरविणे सुरू केले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून अशी पत्रे गोळा केली. जिल्ह्यात नववी ते बारावीच्या वर्गात १ लाख ४९ हजार ७८५ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ४२ टक्के म्हणजे ६२ हजार ९०९ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र भरून दिले. परंतु, प्रत्यक्षात केवळ दहा टक्के म्हणजे १५ हजारच पालकांनी मुलांना शाळेत पाठविले आहे. उर्वरित ९० टक्के पालकांच्या मनात संभ्रम अद्याप कायम असल्याचे यावरून स्पष्ट होते. दरम्यान, शाळांमध्ये सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, थर्मल गन आदी गोष्टींचा काटेकोर वापर होत आहे. शाळाही केवळ चार तासच भरविली जात आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठविले पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहेत. तर शासनानेही कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे. त्यामुळे बहुतांश पालक मुलांना सध्याच शाळेत पाठविण्याबाबत ठाम भूमिका घेताना दिसत नाही. तर अनेक विद्यार्थी मात्र शिक्षणाच्या ओढीने स्वत:च जमेल त्या मार्गाने शाळा गाठताना दिसत आहे. त्यांना शिक्षक वर्गाकडूनही पालकांप्रमाणे सांभाळून घेतले जात आहे. 

शाळांतील उपस्थितीसोमवारी १५ हजार ४२१ विद्यार्थी शाळेत आले. मात्र दुसऱ्या दिवशीपासून या उपस्थितीमध्ये वाढ होत असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. सध्या कोणत्या तालुक्यात किती विद्यार्थी शाळेत उपस्थित होत आहेत, याची आकडेवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत गोळा केली जात आहे. त्याचा एकत्रित अहवाल दोन दिवसानंतर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमीजिल्ह्यात एकंदर ३३९७ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्धारित होते. प्रत्यक्षात त्यापेक्षाही अधिक शिक्षकांनी चाचणी करून घेतली. त्यातील ८१ शिक्षक व ८ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे कर्मचारी सध्या शाळेत अनुपस्थित आहेत. तर काही शिक्षकांची चाचणी होऊनही त्यांचे अहवाल येणे बाकी असल्यामुळे तेही शाळेत गैरहजर आहेत. मात्र उर्वरित सर्व शिक्षक अध्यापनासाठी मेहनत घेत आहे. 

४२ टक्के पालकांचे संमतीपत्र आले आहे. विद्यार्थी उपस्थिती हळूहळू वाढेल. ज्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली, तेवढे शिक्षक वगळता सर्वच शिक्षक शाळेत अध्यापन करीत आहेत.                   - दीपक चवणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यवतमाळ

टॅग्स :SchoolशाळाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या