शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये प्रभारीराज संपण्याच्या मार्गावर! बुधवारपासून तालुकाध्यक्ष मुलाखती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:53 IST

दाभडी ते आर्णी: यवतमाळमध्ये शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा आजपासून

विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील अनेक वर्षापासून राज्यातील 30 जिल्ह्यांत प्रभारी अध्यक्षांमार्फत काँग्रेसचा कारभार सुरू आहे. हे प्रभारीराज लवकरच संपणार आहे. पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष निवडीसाठी उद्या, बुधवार ४ जूनपासून मुंबईत टिळक भवन येथे मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. तालुकाध्यक्ष निवडीसाठी पहिल्यांदाच मुलाखती घेऊन अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे.

पक्षाची धुरा स्वच्छ प्रतिमा आणि रोखठोक शैली तसेच संघटनेत जनाधार असलेल्यांकडे सोपविण्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मानस आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची अध्यक्षपदी अनपेक्षितपणे निवड करून त्यांनी याची सुरुवात केली. सपकाळ यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकाची नेमणूक केली होती. या पक्षनिरीक्षकांनी संबंधित जिल्ह्यात जाऊन थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आता या जिल्ह्यातील अहवाल पक्षश्रेष्ठींकडे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, बुधवारपासून मुंबई येथे तालुकाध्यक्ष निवडीसाठी मुलाखती होणार असून, तसे निरोप संबंधित पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. 

राज्यात काँग्रेसचे ६० जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र, तब्बल ३० जिल्हाध्यक्ष हे प्रभारी आहेत. काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षाची नियुक्ती प्रदेश अध्यक्षांच्या शिफारसीने थेट दिल्लीहून काँग्रेस अध्यक्षांमार्फत होते. मात्र, मागील काही वर्षात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीऐवजी प्रदेश स्तरावरून प्रभारी जिल्हाध्यक्ष नेमून कामकाज सुरू होते. हे प्रभारी तसेच ज्या जिल्ह्यात पक्षनिरीक्षकांना संघटनात्मक उणिवा आढळल्या, अशा ठिकाणाचा आढावा घेऊन नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रदेश पातळीवर रणनीती सुरू आहे. अखिल भारतीय कॉंग्रेसने मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात पदाधिकारी निवडीसाठी 'संघटन सृजन अभियान' हा नवा पॅटर्न आणला आहे. थेट दिल्लीहून बड्या नेत्याची निरीक्षकपदी नेमणूक करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्ष निवडला जात आहे. हीच पद्धत महाराष्ट्रातील नियुक्तीवेळी वापरली जाण्याची शक्यता काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली. प्रदेश कार्यकारिणीचीही साफसफाई करण्यात येणार आहे. जनतेत सक्रिय नसलेल्या मात्र कार्यकारिणीत वर्षानुवर्षे जागा अडवून बसलेल्या १८ ते २० उपाध्यक्ष तसेच ७० ते ७५ सचितांची उचलबांगडी होऊ शकते, असे ते म्हणाले.

यवतमाळमध्ये आज शेतकरी सन्मान पदयात्रा

  • प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त्ती झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून थेट जनतेत जाण्यावर भर दिला आहे. मस्साजोग ते बीड अशी स‌द्भावना यात्रा काढली. त्यानंतर परभणी ते पोखर्णी यात्रा झाल्यावर परळीमध्ये सद्भावना सत्याग्रह केला.
  • बेळगावसह नांदेडमध्ये तिरंगा रॅली काढली. रामनवमीला नाशिकमध्ये काळाराम मंदिरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नातवाला सोबत घेऊन पुजाऱ्यांना थेट संविधानाची प्रत दिली. या उपक्रमांच्या माध्यमातून काँग्रेसला उभारी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
  • आता मंगळवार ३ जून रोजी यवतमाळ जिल्ह्यात दाभडी ते आर्णी अशी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा ते काढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच दाभडी येथे २० मार्च २०१४ रोजी 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम घेतला होता.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसYavatmalयवतमाळ