शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
3
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
4
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
5
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
6
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
7
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
8
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
10
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
11
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
12
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
13
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
14
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
15
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
16
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
17
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
18
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
19
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
20
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

काँग्रेसमध्ये प्रभारीराज संपण्याच्या मार्गावर! बुधवारपासून तालुकाध्यक्ष मुलाखती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:53 IST

दाभडी ते आर्णी: यवतमाळमध्ये शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा आजपासून

विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील अनेक वर्षापासून राज्यातील 30 जिल्ह्यांत प्रभारी अध्यक्षांमार्फत काँग्रेसचा कारभार सुरू आहे. हे प्रभारीराज लवकरच संपणार आहे. पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष निवडीसाठी उद्या, बुधवार ४ जूनपासून मुंबईत टिळक भवन येथे मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. तालुकाध्यक्ष निवडीसाठी पहिल्यांदाच मुलाखती घेऊन अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे.

पक्षाची धुरा स्वच्छ प्रतिमा आणि रोखठोक शैली तसेच संघटनेत जनाधार असलेल्यांकडे सोपविण्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मानस आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची अध्यक्षपदी अनपेक्षितपणे निवड करून त्यांनी याची सुरुवात केली. सपकाळ यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकाची नेमणूक केली होती. या पक्षनिरीक्षकांनी संबंधित जिल्ह्यात जाऊन थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आता या जिल्ह्यातील अहवाल पक्षश्रेष्ठींकडे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, बुधवारपासून मुंबई येथे तालुकाध्यक्ष निवडीसाठी मुलाखती होणार असून, तसे निरोप संबंधित पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. 

राज्यात काँग्रेसचे ६० जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र, तब्बल ३० जिल्हाध्यक्ष हे प्रभारी आहेत. काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षाची नियुक्ती प्रदेश अध्यक्षांच्या शिफारसीने थेट दिल्लीहून काँग्रेस अध्यक्षांमार्फत होते. मात्र, मागील काही वर्षात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीऐवजी प्रदेश स्तरावरून प्रभारी जिल्हाध्यक्ष नेमून कामकाज सुरू होते. हे प्रभारी तसेच ज्या जिल्ह्यात पक्षनिरीक्षकांना संघटनात्मक उणिवा आढळल्या, अशा ठिकाणाचा आढावा घेऊन नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रदेश पातळीवर रणनीती सुरू आहे. अखिल भारतीय कॉंग्रेसने मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात पदाधिकारी निवडीसाठी 'संघटन सृजन अभियान' हा नवा पॅटर्न आणला आहे. थेट दिल्लीहून बड्या नेत्याची निरीक्षकपदी नेमणूक करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्ष निवडला जात आहे. हीच पद्धत महाराष्ट्रातील नियुक्तीवेळी वापरली जाण्याची शक्यता काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली. प्रदेश कार्यकारिणीचीही साफसफाई करण्यात येणार आहे. जनतेत सक्रिय नसलेल्या मात्र कार्यकारिणीत वर्षानुवर्षे जागा अडवून बसलेल्या १८ ते २० उपाध्यक्ष तसेच ७० ते ७५ सचितांची उचलबांगडी होऊ शकते, असे ते म्हणाले.

यवतमाळमध्ये आज शेतकरी सन्मान पदयात्रा

  • प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त्ती झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून थेट जनतेत जाण्यावर भर दिला आहे. मस्साजोग ते बीड अशी स‌द्भावना यात्रा काढली. त्यानंतर परभणी ते पोखर्णी यात्रा झाल्यावर परळीमध्ये सद्भावना सत्याग्रह केला.
  • बेळगावसह नांदेडमध्ये तिरंगा रॅली काढली. रामनवमीला नाशिकमध्ये काळाराम मंदिरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नातवाला सोबत घेऊन पुजाऱ्यांना थेट संविधानाची प्रत दिली. या उपक्रमांच्या माध्यमातून काँग्रेसला उभारी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
  • आता मंगळवार ३ जून रोजी यवतमाळ जिल्ह्यात दाभडी ते आर्णी अशी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा ते काढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच दाभडी येथे २० मार्च २०१४ रोजी 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम घेतला होता.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसYavatmalयवतमाळ