शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

काँग्रेसमध्ये प्रभारीराज संपण्याच्या मार्गावर! बुधवारपासून तालुकाध्यक्ष मुलाखती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:53 IST

दाभडी ते आर्णी: यवतमाळमध्ये शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा आजपासून

विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील अनेक वर्षापासून राज्यातील 30 जिल्ह्यांत प्रभारी अध्यक्षांमार्फत काँग्रेसचा कारभार सुरू आहे. हे प्रभारीराज लवकरच संपणार आहे. पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष निवडीसाठी उद्या, बुधवार ४ जूनपासून मुंबईत टिळक भवन येथे मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. तालुकाध्यक्ष निवडीसाठी पहिल्यांदाच मुलाखती घेऊन अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे.

पक्षाची धुरा स्वच्छ प्रतिमा आणि रोखठोक शैली तसेच संघटनेत जनाधार असलेल्यांकडे सोपविण्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मानस आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची अध्यक्षपदी अनपेक्षितपणे निवड करून त्यांनी याची सुरुवात केली. सपकाळ यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकाची नेमणूक केली होती. या पक्षनिरीक्षकांनी संबंधित जिल्ह्यात जाऊन थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आता या जिल्ह्यातील अहवाल पक्षश्रेष्ठींकडे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, बुधवारपासून मुंबई येथे तालुकाध्यक्ष निवडीसाठी मुलाखती होणार असून, तसे निरोप संबंधित पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. 

राज्यात काँग्रेसचे ६० जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र, तब्बल ३० जिल्हाध्यक्ष हे प्रभारी आहेत. काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षाची नियुक्ती प्रदेश अध्यक्षांच्या शिफारसीने थेट दिल्लीहून काँग्रेस अध्यक्षांमार्फत होते. मात्र, मागील काही वर्षात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीऐवजी प्रदेश स्तरावरून प्रभारी जिल्हाध्यक्ष नेमून कामकाज सुरू होते. हे प्रभारी तसेच ज्या जिल्ह्यात पक्षनिरीक्षकांना संघटनात्मक उणिवा आढळल्या, अशा ठिकाणाचा आढावा घेऊन नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रदेश पातळीवर रणनीती सुरू आहे. अखिल भारतीय कॉंग्रेसने मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात पदाधिकारी निवडीसाठी 'संघटन सृजन अभियान' हा नवा पॅटर्न आणला आहे. थेट दिल्लीहून बड्या नेत्याची निरीक्षकपदी नेमणूक करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्ष निवडला जात आहे. हीच पद्धत महाराष्ट्रातील नियुक्तीवेळी वापरली जाण्याची शक्यता काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली. प्रदेश कार्यकारिणीचीही साफसफाई करण्यात येणार आहे. जनतेत सक्रिय नसलेल्या मात्र कार्यकारिणीत वर्षानुवर्षे जागा अडवून बसलेल्या १८ ते २० उपाध्यक्ष तसेच ७० ते ७५ सचितांची उचलबांगडी होऊ शकते, असे ते म्हणाले.

यवतमाळमध्ये आज शेतकरी सन्मान पदयात्रा

  • प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त्ती झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून थेट जनतेत जाण्यावर भर दिला आहे. मस्साजोग ते बीड अशी स‌द्भावना यात्रा काढली. त्यानंतर परभणी ते पोखर्णी यात्रा झाल्यावर परळीमध्ये सद्भावना सत्याग्रह केला.
  • बेळगावसह नांदेडमध्ये तिरंगा रॅली काढली. रामनवमीला नाशिकमध्ये काळाराम मंदिरात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नातवाला सोबत घेऊन पुजाऱ्यांना थेट संविधानाची प्रत दिली. या उपक्रमांच्या माध्यमातून काँग्रेसला उभारी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
  • आता मंगळवार ३ जून रोजी यवतमाळ जिल्ह्यात दाभडी ते आर्णी अशी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा ते काढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच दाभडी येथे २० मार्च २०१४ रोजी 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम घेतला होता.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसYavatmalयवतमाळ