शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधासाठी सत्ताधाऱ्यांचा ‘खविसं’कडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 22:08 IST

दोन वर्षांपासून खरेदी विक्री संघाने खरेदी केलेल्या तूर, मूग, सोयाबीन आणि हरभऱ्याचे चुकारे अद्यापही मिळाले नाही. खरेदी विक्री संघ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून तूर खरदीकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांना वेठीस धरले.

ठळक मुद्देतूर खरेदीचा पेच : जिल्हाभरातील प्रतिनिधींचे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन वर्षांपासून खरेदी विक्री संघाने खरेदी केलेल्या तूर, मूग, सोयाबीन आणि हरभऱ्यांचे चुकारे अद्यापही मिळाले नाही. खरेदी विक्री संघ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून तूर खरदीकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांना वेठीस धरले. याविरोधात जिल्ह्यातील खविसंच्या प्रतिनिधींनी मंगळवारी यवतमाळात धरणे आंदोलन केले. नंतर पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.२०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये सोयाबीन, चणा, तूर खरेदीसाठी खविसंचा पाच कोटीचा खर्च झाला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात खविसं राहिल्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप खरेदी विक्री संघाने केला आहे.पत्रकार परिषदेला कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, यवतमाळ बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, पणनचे संचालक सुरेश चिंचोळकर, राजेश मॅडमवार, मिलिंद इंगोले, पंडीत बुटले, देविदास राठोड, संजय दुद्दलवार, धनंजय डुबेवार, अशोक सूर, चक्रधर तिर्थगिरीकर, पांडुरंग रोगे, दिगंबर पाचकोर, संजय इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.आॅनलाईन नोंदणीला नकारबुधवारपासून तूर खरेदीची आॅनलाईन नोंदणी होणार आहे. खरेदी विक्री संघाने ही नोंदणी करण्यास नकार दिला आहे. हे काम मार्केटींग फेडरेशन अथवा व्हीसीएमएसकडे देण्यात यावी, असे मत पत्रकार परिषदेत मांडले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने तूर खरेदीचा पेच निर्माण झाला आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. शासनाने चुकारे दिल्याखरीज खरेदी होणार नसल्याची भूमिका यावेळी खविसंच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस