शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

'देवेंद्र फडणवीसांना शेतकरी प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 16:16 IST

आपल्या सत्ताकाळात विविध अटी व शर्ती लादून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा योग्य लाभ होऊ दिला नाही  

यवतमाळ : पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर असतांना ज्यांनी शेतकऱ्यांचे अतोनात हाल केले, त्यांच्या आयुष्याची होळी केली त्या देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा थेट सवाल महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केला आहे.

आपल्या सत्ताकाळात विविध अटी व शर्ती लादून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा योग्य लाभ होऊ दिला नाही आणि आता तेच देवेंद्र फडणवीस त्यांनीच निर्माण केलेल्या समस्यांवर बोलत आहेत असे पवार म्हणाले. विदर्भात गंभीर दुष्काळी परिस्थिती असतांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी उच्च न्यायालयात जावे लागले. न्यायालयाने आदेश देऊनही सरकारने शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही.

गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी तत्कालीन कृषिमंत्र्यांनी कोरडवाहु शेतीसाठी ३० हजार ८०० रुपये तर ओलीताच्या शेतीसाठी ३७ हजार ५०० रुपये प्रती हेक्टरी मदत घोषित केली होती. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली.या प्रकरणातील दोषी बियाणे कंपन्यांच्या विरोधात साधे सरकारी वकील ही सरकारने उभे केले नाही. तसेच भाजप सरकारने दिलेली कथित कर्जमाफी हि शेतकऱ्यांच्या आयुष्यातील एक संकटकाळ होता. ऑनलाईन फॉर्म, जाचक अटी, तालुक्याच्या ठिकाणी चकरा व एवढे सगळे करूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

कमीत कमी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी असाच त्या योजनेचा आराखडा होता. त्यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला नाही. महाविकास आघाडीने राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसतांनाही शेतकऱ्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल अशी कर्जमुक्ती योजना आणली आहे. या शिवाय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काहीतरी खुसपट काढून सरकारवर टीका करत आहेत असा आरोप देवानंद पवार यांनी केला. 

खरीप २०१८ मध्ये दुसऱ्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळाची मदत देण्यात फडणवीस सरकार पूर्णतः अपयशी ठरले. आता ही मदत देण्यास केंद्रातील भाजप सरकार नकार देत आहे.उल्लेखनीय म्हणजे या वर्षीच्या दुष्काळी समस्येवर राज्याने केंद्राकडे निधीची मागणी केली होती. मात्र भाजप सरकारने ती सपशेल फेटाळून लावली. राजकीय सोयीचे नाही म्हणून केंद्र सरकार शेतीप्रश्नावरही महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहेत.

शेतकऱ्यांच्या समस्या देवेंद्र फडणवीस यांनी जरूर मांडाव्या. विरोधी पक्षनेते म्हणून ते त्यांचे कर्तव्य व अधिकार आहे. समर्पक समस्या मांडल्यास त्यांचे स्वागतच होईल. मात्र ज्या समस्या मुख्यमंत्रीपदावर असतांना फडणवीसांनी सोडविल्या नाही उलट त्यामध्ये अजून भर टाकली त्यावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार उरलेला नाही. फडणवीसांना शेतकऱ्यांचा खरोखरच एवढा कळवळा असेल तर त्यांनी केंद्राकडे दुष्काळी मदतीसाठी पाठपुरावा करून राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, असे आवाहनही देवानंद पवार यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसYavatmalयवतमाळ