शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हाताला कामासाठी काँग्रेसला ‘हात’

By admin | Updated: May 17, 2014 02:11 IST

पोटाला चिमटा मारून आईवडिलांनी आम्हाला शिकविले. मोठय़ा खस्ता खाऊन विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले. पात्रता असूनही नोकरीसाठी दारोदार भटकंती करण्याची वेळ आली. यावेळेस सत्तापरिवर्तनातून ...

यवतमाळ : पोटाला चिमटा मारून आईवडिलांनी आम्हाला शिकविले. मोठय़ा खस्ता खाऊन विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले. पात्रता असूनही नोकरीसाठी दारोदार भटकंती करण्याची वेळ आली. यावेळेस सत्तापरिवर्तनातून हाताला काम मिळेल असे वातावरण देशभरात होते. त्यामुळेच एकदा विरोधी बाकावरील लोकांना संधी द्यावी म्हणून नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातील एनडीऐच्या बाजूने मतदान केले. देशात आता मोदीचे सरकार येणार असूनलोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवरकायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारने पुढाकर घेतला पाहिजे. राजकीय नेत्यांचा देशाबाहेर असलेला काळा पैसा परत आणला जाईल, ही अपेक्षा ठेऊनच सत्तापरिवर्तनासाठी आम्ही युवकांनी पुढाकार घेतल्याचे ललित राठोड याने सांगितले. सत्तारुढ पक्ष भ्रष्टाचाराने बरबटला होता. एवढेच नाही तर, अनेक दोषींना लोकसभेच्या मैदानात उतरवून जनतेच्या भावनेशी खेळण्यात आले. त्यामुळेच सत्तापरिवर्तनात युवकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला, असे मत आशिष हातागडे याने मांडले. अश्‍वजित शेळके हा युवक म्हणाला, आतापर्यंत दलितांवर खूप अत्याचार झाले. परंतु खर्‍या अर्थाने न्याय मिळाला नाही. दलितांना घाबरवत ठेऊन राजकीय पक्षांनी आपली पोळी शेकली. महायुतीच्या शासन काळात दलितांवर अन्याय होणार नाही, असा आशावाद त्याने व्यक्त केला.इद्रीस खान याने आता ग्रामीण, वृध्द, अशिक्षित, बेरोजगार आणि गरिबांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रकाश धवने म्हणाला, सरकार कोणाचे येणार यापेक्षा बेरोजगारांसाठी ते काय करणार, हे पाहावे लागणार आहे. आतापर्यंंत काँग्रेस सरकारने निराश केले. त्यामुळे भाजप सरकारकडून आम्हा युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षणाकडे आता जातीने लक्ष दिले जाईल, आशा आशावाद सुनील चव्हाणने केला.आम्ही आमचे काम केले. आता सरकारला जनतेला दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती करायची आहे. खासकरून बेरोजगारांसाठी काय करणार, याकडे आमचे लक्ष राहणार असल्याचे संतोष गदई याने सांगितले. शिवम इंगोले म्हणाला, आता खर्‍या अर्थाने देशाची प्रगती होईल आणि देश महासत्ता होईल. एकंदरीत युवकांच्या मनामध्ये नरेंद्र मोदी यांच्याविषयी प्रचंड आकर्षण आणि विश्‍वास असल्याचे दिसून आले. मात्र येणार्‍या काळात युवकांचा विश्‍वास किती सार्थ ठरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (लोकमत चमू)‘अच्छे दिन आने वाले है’ ची आशा निर्माण झाल्याच्या भावना नवमतदारांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या. ‘लोकमत’ने शुक्रवारी अनेक युवकांशी मनमोकळा संवाद साधला. आकाश पवार याने मोदी सरकारामुळे बेरोजगारांची समस्या सुटेल, अशी आशा व्यक्त केली. स्थानिकांना रोजगार आणि प्रत्येक मतदारसंघात नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. शेतमालावर आधारीत प्रकल्प आणण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज प्रवीण राठोड याने व्यक्त केली. अनेक वर्षांपासून यवतमाळचा रेल्वे प्रश्न प्रलंबित आहे. आता तरी तो सुटला पाहिजे, अशी अपेक्षा अक्षय अतकरी याने व्यक्त केली.