शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

विद्यार्थ्यांना आधारची अट शिथिल

By admin | Updated: August 11, 2015 02:47 IST

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचा

पालकांना दिलासा : शालेय शिक्षण संचालनालयाचे आदेशयवतमाळ : शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचा अध्यादेश काढला होता. मात्र, अपुऱ्या यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढणे अशक्य झाले. यामुळे शालेय शिक्षण विभागाने हा अध्यादेश मागे घेत आधारकार्ड सक्तीचे नसल्याचे परिपत्रक काढले आहे. यामुळे पालकांची फरपट थांबणार आहे. सप्टेंबरपासून ० ते ५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची टॅबवर नोंद केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शाळांमध्ये शिष्यवृत्ती, गणवेश, पुस्तक आणि परीक्षा अर्ज भरण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची आधारकार्ड काढण्यासाठी धावपळ सुरू होती. यातून ८० अंगणवाड्यांमध्ये आधारकार्ड काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. ही संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाच्या नियंत्रणात राबविली जात आहे. सीएमएस कंपनीकडून आधारची नोंदणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या तुलनेत असलेले आधारकार्ड अपुरे आहेत. यामुळे आधारकार्डसाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगा लागत आहे. यातूनच आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन केंद्र सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मोठ्या रांगा होत्या.आधार कार्ड काढण्याची यंत्रणा अपुरी पडत आहे. यामुळे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी एक परिपत्रक काढले आहे. यामध्ये आधारकार्ड सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे सरलमधून शालेय विद्यार्थ्यांचा आधारकार्ड सक्तीचा स्टार काढण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाने पालकांची होणारी हेळसांड थांबणार आहे.सप्टेंबरपासून ० ते ५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी टॅबच्या मदतीने करण्यात येणार आहे. जिल्ह्याकरिता असे ४० टॅब मागविण्यात आले आहे. हे टॅब आल्यानंतर ८० आधारकार्ड यंत्र सर्वसामान्यांच्या नोंदणीसाठी वापरले जाणार आहेत. त्याची नोंद वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)पाच लाख नागरिकांना आधारची प्रतीक्षा४जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी काढलेले आधार कार्ड अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. पोस्टाची दिरंगाई की सदर कंपनीनेच आधार कार्ड पाठविले नाही, हे कळायला मार्ग नाही. आधार कार्ड येत नसल्याने अनेकांनी ई-आधार काढून काम भागविणे सुरू केले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आधार काढलेल्या पावतीवरील क्रमांकावरून आधार कार्ड काढले जात आहे. यामुळे नागरिकांचे काम होत असले तरी मूळ आधार कार्डाची अनेकांना प्रतीक्षा आहे. त्यासाठी ते पोस्टाचे उंबरठे झिजवित असल्याचे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत दिसत आहे.