शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना आधारची अट शिथिल

By admin | Updated: August 11, 2015 02:47 IST

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचा

पालकांना दिलासा : शालेय शिक्षण संचालनालयाचे आदेशयवतमाळ : शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचा अध्यादेश काढला होता. मात्र, अपुऱ्या यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढणे अशक्य झाले. यामुळे शालेय शिक्षण विभागाने हा अध्यादेश मागे घेत आधारकार्ड सक्तीचे नसल्याचे परिपत्रक काढले आहे. यामुळे पालकांची फरपट थांबणार आहे. सप्टेंबरपासून ० ते ५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची टॅबवर नोंद केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शाळांमध्ये शिष्यवृत्ती, गणवेश, पुस्तक आणि परीक्षा अर्ज भरण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची आधारकार्ड काढण्यासाठी धावपळ सुरू होती. यातून ८० अंगणवाड्यांमध्ये आधारकार्ड काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. ही संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाच्या नियंत्रणात राबविली जात आहे. सीएमएस कंपनीकडून आधारची नोंदणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या तुलनेत असलेले आधारकार्ड अपुरे आहेत. यामुळे आधारकार्डसाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगा लागत आहे. यातूनच आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन केंद्र सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मोठ्या रांगा होत्या.आधार कार्ड काढण्याची यंत्रणा अपुरी पडत आहे. यामुळे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी एक परिपत्रक काढले आहे. यामध्ये आधारकार्ड सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे सरलमधून शालेय विद्यार्थ्यांचा आधारकार्ड सक्तीचा स्टार काढण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाने पालकांची होणारी हेळसांड थांबणार आहे.सप्टेंबरपासून ० ते ५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी टॅबच्या मदतीने करण्यात येणार आहे. जिल्ह्याकरिता असे ४० टॅब मागविण्यात आले आहे. हे टॅब आल्यानंतर ८० आधारकार्ड यंत्र सर्वसामान्यांच्या नोंदणीसाठी वापरले जाणार आहेत. त्याची नोंद वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)पाच लाख नागरिकांना आधारची प्रतीक्षा४जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी काढलेले आधार कार्ड अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. पोस्टाची दिरंगाई की सदर कंपनीनेच आधार कार्ड पाठविले नाही, हे कळायला मार्ग नाही. आधार कार्ड येत नसल्याने अनेकांनी ई-आधार काढून काम भागविणे सुरू केले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आधार काढलेल्या पावतीवरील क्रमांकावरून आधार कार्ड काढले जात आहे. यामुळे नागरिकांचे काम होत असले तरी मूळ आधार कार्डाची अनेकांना प्रतीक्षा आहे. त्यासाठी ते पोस्टाचे उंबरठे झिजवित असल्याचे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत दिसत आहे.