शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालक सात वर्षांपासून मानधनावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:39 IST

शासनाचे डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्यातील २७ हजार संगणक परिचालक गेल्या सात वर्षांपासून कायमस्वरूपी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांची महत्वपूर्ण मागणी केव्हा पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देसंघटना आक्रमक : पद निश्चित करण्याची शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शासनाचे डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्यातील २७ हजार संगणक परिचालक गेल्या सात वर्षांपासून कायमस्वरूपी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांची महत्वपूर्ण मागणी केव्हा पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.सध्या मानधन तत्वावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना एक-एक वर्ष मानधन मिळत नाही. त्याचबरोबर हे पद निश्चित करून महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी असून याकरिता आता राज्य संघटना लढा देणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र अर्थात संग्राम व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक म्हणून हजारो संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहे. हे काम करीत असताना राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला रहिवासी बांधकाम परवाना, पीटीआर नक्कल अशा सर्व २९ प्रकारचे दाखले, ग्रामपंचायतचा संपूर्ण जमा खर्चाची नोंद घेणे, ग्रामसभा, मासिक सभेचे आॅनलाईन कामकाज, १४ व्या वित्त आयोगाचा गावविकास आराखडा यासह ग्रामपंचायत सांगेल ते काम संगणक परिचालक करतात. तसेच मागील वर्षी शेतकरी कर्जमाफी, अस्मिता योजना, जनगणना व सध्या सुरू असलेला लाखो कुटुंबाचा घरकुलाचा सर्वे, प्रधानमंत्री पिकविमा योजना इत्यादी प्रकारची कामे सेवा केंद्रांमध्ये केली जातात. परंतु एवढी महत्त्वाची कामे करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. सध्या मानधन तत्त्वावर असणाºया परिचालकांना वर्ष-वर्ष मानधनसुद्धा मिळत नाही. त्यामुळे वेळेवर मानधन मिळावे, त्याचबरोबर ग्रामीण भागातील सहा कोटी जनतेचे अनेक प्रकारचे आॅनलाईन कामे करण्यासाठी संगणक परिचालकाची आवश्यकता आहे. संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून सर्व परिचालकांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी या मागणीकरिता लोकप्रतिनिधींना संघटनेचे दारव्हा तालुकाध्यक्ष राजकुमार महल्ले, हेमंतकुमार अघम, तुषार उघडे, धीरज जयस्वाल, विजय पिंगाने, लखन जाधव यांनी निवेदन सादर केले.खाजगी कंपन्यावर शासनाची मेहरबानीगेल्या सात वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याऐवजी शासनाकडून संग्राम व आपले सरकार प्रकल्पासाठी खाजगी कंपन्यांची नियुक्ती केल्या जाते. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपसुद्धा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने केला आहे. कायमस्वरूपी नियुक्तीची मागणी मान्य व्हावी, याकरिता ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींना निवेदन दिल्या जात आहे. ही मागणी मान्य न झाल्यास संघटनेच्यावतीने येत्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळावर धडक देणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड