शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कंपनी म्हणते, मुबलक ‘डीपी’, तरी गावांमध्ये पोहोचेना वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 14:33 IST

Yawatmal News electricity यवतमाळ तालुक्यातील कोळंबी सर्कलमध्ये येणाऱ्या पारध तांड्यामध्ये तर वीज डीपी जळाल्यानंतर तब्बल १५ दिवसाने कृषी फिडर बसविण्यात आले.

ठळक मुद्दे१५ दिवसानंतर पारध तांड्यावर डीपी पोहोचली

लोकमत न्यूज नेटवर्क  

यवतमाळ : गाव आणि शेतशिवार यांच्यामध्ये विजेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून वीज कंपनीने कृषी फिडर आणि गावठाण फिडर अशी स्वतंत्र रचना केली. यानंतर मागणी करताच तत्काळ कृषी फिडर उपलब्ध होईल, अशा सूचना वीज कंपनीने दिल्या आहेत. प्रत्यक्षात शेतशिवारात मागणी केल्यानंतरही आठ ते दहा दिवसांनी कृषी फिडर उपलब्ध होते. यवतमाळ तालुक्यातील कोळंबी सर्कलमध्ये येणाऱ्या पारध तांड्यामध्ये तर वीज डीपी जळाल्यानंतर तब्बल १५ दिवसाने कृषी फिडर बसविण्यात आले. आता याठिकाणी फिडर असले तरी लाईन नाही. अशा परिस्थितीत शेतशिवारातील पिके करपत आहेत. अनेकांनी हरभरा लागवडीची व्यवस्था केली. परंतु वीज नसल्याने त्यांची पेरणी थांबली आहे. शिवारात असलेला गहू, तूर पाण्याअभावी वाळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सर्कलमधून विनंती केल्यानंतरही या शेतकऱ्यांना डीपी मिळाली नव्हती. यामुळे शेतकऱ्यांनी वीज कंपनी कार्यालयावर धडक देत डीपी आणली. याशिवाय डीपीसाठी लागणारे वायर आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांना शेतकऱ्यांकडून लोकवर्गणी गोळा करावी लागली. आता गत दोन दिवसांपासून वीज नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. अशीच परिस्थिती वारंवार प्रत्येक सर्कलमध्ये निर्माण होते. वीज कंपनी मात्र डीपी मुबलक उपलब्ध असल्याचे सांगत आहे. मागणी आल्यावर आम्ही तत्काळ पुरवठा करतो, असे सांगितले जाते.

तक्रार करूनही प्रतीक्षेतच

डीपी ओव्हरलोड होतात, अनेक ठिकाणी एबी स्विच खराब होतात, वायर गुंततात यामुळे डीपी अनेकवेळा स्फोट होऊन जळतात. या डीपीकडे लक्ष देण्यासाठी कंत्राटदारांवर काम सोपविण्यात आले आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळाअभावी तक्रारींकडे लक्षच दिले जात नाही.

शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे पिकांचे नुकसान

सध्याची वीज पुरवठ्याची व्यवस्था वीज कंपनीवरच अवलंबून आहे. मात्र त्याला पर्याय असलेली साैर ऊर्जा फिडर उपलब्ध नाही. जिल्ह्यात मांजर्डा आणि अकोलाबाजार वगळता अशी व्यवस्था झाली नाही. यामुळे पाण्याअभावी नुकसान होत आहे.

रोहित्र जळाल्याने तूर, हरभरा, गव्हाला फटका

- विजेचा संपूर्ण पुरवठा कृषी फिडरवर अवलंबून असतो. रोहित्र जळाल्याने शेतशिवारांमध्ये तूर, हरभरा आणि गव्हाच्या पिकाला फटका बसत आहे.

- अनेक भागामध्ये रोहित्र सुरू असले तरी कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे आठ तास मिळणारा विजेचा पुरवठा वारंवार खंडित होतो. यातून ओलित रखडले आहे.

जिल्ह्यात वीज वितरण कंपनीकडे पुरेसे रोहित्र उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणावरून तक्रारी येतात, त्या ठिकाणी तत्काळ कारवाई केली जाते. गत महिन्यामध्ये ऑईलचा प्राॅब्लेम होता. मात्र आता तशा कुठल्याच अडचणी नाहीत. कुठलेच रोहित्र बंद नाही.

- संजय, प्रशासन अधिकारी, वीज कंपनी

आमच्या भागात रोहित्र जळाले आणि मागणी केल्यानंतर १५ दिवसाने रोहित्राचा पुरवठा झाला. आज गावामध्ये रोहित्र बसविले आहे. मात्र दोन तासांची वीज मिळाली. आता तर दाेन दिवसांपासून लाईनच बंद आहे. पारध तांडा शिवारात शेतातील पिके पाण्याअभावी वाळत आहे.

- शेषराव जाधव, शेतकरी, पारध तांडा, ता.यवतमाळ

टॅग्स :electricityवीज