शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाजपच्या मंत्र्यांपुढे काँग्रेसचा सामान्य चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

यवतमाळ मतदारसंघात एकच व्यक्ती सलग दोन वेळा निवडून आल्याचा अलिकडचा इतिहास नाही, हा इतिहास बदलविण्यात मदन येरावार यशस्वी ठरतात का याकडे नजरा लागल्या आहेत. भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर व शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांच्यात ही लढत होत असली तरी ढवळे नेमके कुणाला नुकसानकारक ठरणार याचा अंदाज बांधणे राजकीय तज्ज्ञांनाही कठीण होऊन बसले आहे.

ठळक मुद्देतिहेरी लढत : शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे कुणाच्या फायद्याचे?, संभ्रम कायम

भाजपचे वजनदार मंत्री, आर्थिक दृष्ट्या संपन्न मदन येरावार यांच्यापुढे यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने जनसामान्यांचा चेहरा म्हणून बाळासाहेब मांगुळकर यांना रिंगणात उतरविले आहे. शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे यांचीही उमेदवारी असल्याने येथे तिहेरी सामना होणार आहे.यवतमाळ मतदारसंघात एकच व्यक्ती सलग दोन वेळा निवडून आल्याचा अलिकडचा इतिहास नाही, हा इतिहास बदलविण्यात मदन येरावार यशस्वी ठरतात का याकडे नजरा लागल्या आहेत. भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर व शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांच्यात ही लढत होत असली तरी ढवळे नेमके कुणाला नुकसानकारक ठरणार याचा अंदाज बांधणे राजकीय तज्ज्ञांनाही कठीण होऊन बसले आहे. यवतमाळ मतदारसंघातील भाजपचा कारभार मुंबईपर्यंत गाजला आहे. त्यातून पक्ष, कार्यकर्ते व मतदारांमध्ये भाजप विरोधात निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा काँग्रेस व सेना बंडखोराला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २०१४ च्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी सेनेतील महत्वाच्या घटकांनी साथ सोडल्याने व काहींनी आघाडीचा धर्म सोडून भाजपला साथ दिल्याने संतोष ढवळे यांचा अवघ्या १२०० मतांनी पराभव झाला होता. पक्षाच्या चिन्हावर त्यावेळी ५० हजारांवर मिळालेली मते डोळ्यापुढे ठेऊनच ढवळे पुन्हा रिंगणात उतरले. मात्र आता अपक्ष म्हणून यापैकी किती मतदार ढवळेंच्या पाठीशी उभे राहतात हे पाहणेही तेवढेच महत्वाचे ठरते. या मतदारसंघात १३ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत.विकास कामांसाठी आणलेला कोट्यवधींचा निधी, लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला मिळालेली ३७ हजार मतांची आघाडी, नगरपरिषदेतील सत्ता, जिल्हा परिषदेतील सत्तेचा सहभाग आदी बाबी भाजपकडून आक्रमकपणे मतदारांपुढे ठेवल्या जात आहे. परंतु गेल्या पाच वर्षात भाजपची गाजलेली प्रकरणे, पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचा निर्माण झालेला दुरावा, वाढलेली गुन्हेगारी, त्याला मिळणारा राजकीय व पर्यायाने प्रशासकीय सपोर्ट, त्यातूनच व्यापारी, व्यावसायिक व जनमाणसात निर्माण झालेली दहशत आदीबाबी भाजपसाठी नुकसानकारक ठरत आहे. त्यातच आता यवतमाळ मतदारसंघात भाषिक वादही जन्म घेतो की काय अशी हूरहूर पहायला मिळते आहे.बेंबळाचे पाणी न मिळणे, रस्ते उखडणे, त्यामुळे मनुष्य व वाहनांचे आरोग्य धोक्यात येणे आदी बाबी मतदारांमध्ये आधीच प्रमुख चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्याच वेळी ‘माझी उमेदवारी यवतमाळातील गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी’ हे काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांचे आवाहन मतदारासाठी आशादायी ठरत आहे. दहशतीत वावरणाऱ्या जनतेसाठी यानिमित्ताने आपला कुणी तरी वाली आहे अशी भावना निर्माण झाली आहे. त्याचा फायदा काँग्रेसला अधिक प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हेगारीच्या निमित्ताने भाजपकडून काँग्रेसवर पलटवार केले जात असले तरी तो इतिहास झाल्याने त्याचा जनतेवर फार काही परिणाम होताना दिसत नाही.प्रहारचे बिपीन चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे योगेश देशमुख पारवेकर, स्वतंत्र विदर्भाचा झेंडा घेऊन अ‍ॅड. अमोल बोरखडे, बसपाचे संदीप देवकते हेसुद्धा मतदारसंघात आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे समाजातीलच नव्हे तर भाजप व संघ परिवारातील प्रतिष्ठीत मंडळी निवडणुकीत दुरावा ठेऊन असताना काँग्रेसमध्ये मात्र अनेक गट-तट एकजुटीने काम करताना दिसतआहे. 

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ