शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

काँग्रेसच्या दोन गटांतील शीतयुद्ध थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

सध्या परतीच्या पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हिरावले गेले आहे. कपाशीची अवस्था बिकट झाली आहे. शासनाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. शेतीमध्ये लावलेले पैसेही निघण्याची शक्यता धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकळंबमध्ये समन्वयाचा अभाव : विधानसभा निवडणुकीत फटका बसूनही वेगळ्या चुली

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : विधानसभा निवडणुकीत तालुका काँग्रेसच्या दोन गटांत समन्वयाचा अभाव होता. त्याचा परिणाम काँग्रेस तालुक्यात मोठ्या फरकाने माघारली. सर्वत्र कमळ फुलले. आता निवडणूक संपली, असली तरी काँग्रेसच्या दोन गटातील शीतयुध्द पूर्णविराम घ्यायला तयार नाही.सध्या परतीच्या पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हिरावले गेले आहे. कपाशीची अवस्था बिकट झाली आहे. शासनाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. शेतीमध्ये लावलेले पैसेही निघण्याची शक्यता धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यामुळे शुक्रवारी काँग्रेसच्या एका गटाने तहसीलदारांना निवेदन दिले. असे असताना पुन्हा शनिवारी प्रवीण देशमुख गटाकडून याच विषयावर निवेदन दिले. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसच्या दोन गटात अजुनही दिलजमाई झाल्याचे दिसून येत नाही. या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये असलेले वैर परावभवानंतरही संपायचे नाव घ्यायला तयार नाही.दोन गटातील कार्यकर्त्यांचे आत्मीय मनोमिलन करण्याची जबाबदारी प्रा.वसंत पुरके यांची आहे, असे मत व्यक्त होत आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे. समन्वय नसल्याचा फटका प्रा.पुरके यांना विधानसभेतही बसला. आता तर लवकरच कळंब नगरपंचायतच्या निवडणुकीचे नगारे वाजायला सुुरुवात होणार आहे. या निवडणुकीत तिकीट वाटप करणे काँग्रेससाठी मोठे आव्हानात्मक राहणार आहे. दोन गटातील लोकांनी एकत्र आल्याशिवाय भाजप-सेनेपासून सत्ता हिसकाऊन घेणे कठीण होणार आहे.गावातूनच पत गमवणारे गावपुढारी कम नेते तालुक्याच्या राजकारणात प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याच्याच दबावाला बळी पडत ‘नेतृत्व’ व्यूहरचना आखतात. सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनेला कुठलीही किंमत दिली जात नाही. त्यामुळे कालपर्यंत जवळ असणारे आज मात्र दुरावले जात आहे. याचा विचार काँगे्रस पक्ष जेवढ्या लवकर करतील तेवढा त्यांचाच फायदा होणार आहे. अन्यथा संघटनात्मक शक्ती नसतानाही भाजपचे कमळ आणि शिवसेनेचा बाण जोराने सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :congressकाँग्रेस