शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या दोन गटांतील शीतयुद्ध थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

सध्या परतीच्या पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हिरावले गेले आहे. कपाशीची अवस्था बिकट झाली आहे. शासनाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. शेतीमध्ये लावलेले पैसेही निघण्याची शक्यता धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकळंबमध्ये समन्वयाचा अभाव : विधानसभा निवडणुकीत फटका बसूनही वेगळ्या चुली

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : विधानसभा निवडणुकीत तालुका काँग्रेसच्या दोन गटांत समन्वयाचा अभाव होता. त्याचा परिणाम काँग्रेस तालुक्यात मोठ्या फरकाने माघारली. सर्वत्र कमळ फुलले. आता निवडणूक संपली, असली तरी काँग्रेसच्या दोन गटातील शीतयुध्द पूर्णविराम घ्यायला तयार नाही.सध्या परतीच्या पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हिरावले गेले आहे. कपाशीची अवस्था बिकट झाली आहे. शासनाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. शेतीमध्ये लावलेले पैसेही निघण्याची शक्यता धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यामुळे शुक्रवारी काँग्रेसच्या एका गटाने तहसीलदारांना निवेदन दिले. असे असताना पुन्हा शनिवारी प्रवीण देशमुख गटाकडून याच विषयावर निवेदन दिले. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसच्या दोन गटात अजुनही दिलजमाई झाल्याचे दिसून येत नाही. या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये असलेले वैर परावभवानंतरही संपायचे नाव घ्यायला तयार नाही.दोन गटातील कार्यकर्त्यांचे आत्मीय मनोमिलन करण्याची जबाबदारी प्रा.वसंत पुरके यांची आहे, असे मत व्यक्त होत आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे. समन्वय नसल्याचा फटका प्रा.पुरके यांना विधानसभेतही बसला. आता तर लवकरच कळंब नगरपंचायतच्या निवडणुकीचे नगारे वाजायला सुुरुवात होणार आहे. या निवडणुकीत तिकीट वाटप करणे काँग्रेससाठी मोठे आव्हानात्मक राहणार आहे. दोन गटातील लोकांनी एकत्र आल्याशिवाय भाजप-सेनेपासून सत्ता हिसकाऊन घेणे कठीण होणार आहे.गावातूनच पत गमवणारे गावपुढारी कम नेते तालुक्याच्या राजकारणात प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याच्याच दबावाला बळी पडत ‘नेतृत्व’ व्यूहरचना आखतात. सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनेला कुठलीही किंमत दिली जात नाही. त्यामुळे कालपर्यंत जवळ असणारे आज मात्र दुरावले जात आहे. याचा विचार काँगे्रस पक्ष जेवढ्या लवकर करतील तेवढा त्यांचाच फायदा होणार आहे. अन्यथा संघटनात्मक शक्ती नसतानाही भाजपचे कमळ आणि शिवसेनेचा बाण जोराने सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :congressकाँग्रेस