शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

यवतमाळ जिल्ह्यातील ब्राह्मणी फाटा झाला कोळसा हेराफेरीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 10:19 IST

खाणीतून ट्रकद्वारे आणला जाणारा कोळसा थेट रेल्वे सायडिंगवर न नेता वणी बायपासवर असलेल्या ब्राह्मणी फाट्यावर उतरविल्या जातो. ब्राम्हणी फाटा कोळसा हेराफेरीचे केंद्र झाला आहे.

ठळक मुद्देवणी वेकोलि क्षेत्ररात्रभर चालतो माती मिश्रणाचा गोरखधंदा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खाणीतून ट्रकद्वारे आणला जाणारा कोळसा थेट रेल्वे सायडिंगवर न नेता वणी बायपासवर असलेल्या ब्राह्मणी फाट्यावर उतरविल्या जातो. ब्राम्हणी फाटा कोळसा हेराफेरीचे केंद्र झाला आहे. तेथे चांगल्या प्रतीचा कोळसा वेगळा करून उर्वरित कोळशात काळ्या रंगाची माती व दगड मिसळविले जातात. त्यानंतर तेथून तो माती, दगड मिश्रित कोळसा रेल्वेसायडिंगवर पोहचविला जातो, अशी माहिती पुढे आली आहे.दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून ‘लोकमत’मध्ये वणी वेकोलि क्षेत्रात सुरू असलेल्या कोळसा चोरीबद्दल वृत्तमालिका प्रकाशित केली जात आहे. त्यामुळे कोळसा तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. पोलीस यंत्रणाही या तस्करांवर पाळत ठेऊन आहे. वणी बायपासवरील ब्राम्हणी मार्गाच्या पुढे वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी आहेत. या मार्गाने दररोज मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जाते. याच मार्गावर किमान चार ठिकाणी कोळशाची हेराफेरी केली जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ दिली. निळापूर-ब्राह्मणी या गावांच्या पुढे कोलारपिपरी, पिंपळगाव, जुनाड, निलजई, नायगाव, उकणी आदी कोळसा खाणी आहेत. त्यामुळे वाहतुकीदरम्यान, कोळशाची हेराफेरी करणे सोईचे जावे, यासाठी रस्त्याच्या अगदी कडेला ट्रकमधील कोळसा डम्प करून नंतर त्यात हेराफेरी केली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. असे असले तरी वेकोलि प्रशासन अथवा पोलीस यंत्रणा कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या हेराफेरीतून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.कोळशात माती व दगड मिश्रण करणारे मजूरही गुंड प्रवृत्तीचे असून यासाठी त्यांना मोठी रक्कम अदा केली जात असल्याचे कळते. या मजुरांजवळदेखील घातक शस्त्रे असतात, असे सांगितले जाते. कोळशात माती व दगड मिसळविल्यानंतर कोळशाने भरलेला ट्रक वणी रेल्वे सायडिंगवर आणला जातो, त्यावेळी अनेकदा या कोळशाचे मोजमापही केले जात नसल्याची माहिती आहे. यासाठी संबंधित ‘काटाबाबू’ला देखील मोठी बिदागी दिली जात असल्याची चर्चा आहे. एकूणच हा तस्करीचा व्यवसाय सर्व पातळ्यांवर ‘मॅनेज’ असल्याने कोणत्याही कारवाया होताना दिसत नाही.मिश्रणासाठी कोळसा खाणीतीलच दगड-मातीकोळशात केलेली हेराफेरी उघड होऊ नये, यासाठी खाणीतूनच दगड आणि माती आणली जाते. या दगड आणि मातीचा रंगही काळाच असतो. त्यात काही प्रमाणात कोळशाची बारीक चुरीदेखील असते. त्यामुळे तो कोळसा आहे की दगड आहे, हे सहज लक्षात येत नाही. कोळशात त्याचे मिश्रण केल्यानंतर तर लक्षात येत नाही. त्यामुळे कोळसा तस्कर हा फंडा वापरत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा