शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

ढगाळी वातावरणाची धडकी

By admin | Updated: October 25, 2014 22:46 IST

एकापाठोपाठ एक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागचे संकट अद्यापही संपले नाही. ऐन सोयाबीन काढणीचा हंगाम आणि कापूस फुटला असताना ढगाळी वातावरण निर्माण झाले.

संकटाची मालिका : सोयाबीन काढणीचा हंगामयवतमाळ : एकापाठोपाठ एक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागचे संकट अद्यापही संपले नाही. ऐन सोयाबीन काढणीचा हंगाम आणि कापूस फुटला असताना ढगाळी वातावरण निर्माण झाले. काढलेले सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा उडत असून या वातावरणाने शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा धडकी भरविली आहे.निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याला सातत्याने बसत आहे. यंदा तर संकटाची मालिकाच सुरू आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली. दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यातून वाचलेल्या पिकांवर किडींनी आक्रमण केले. शेंगा भरण्याच्या वेळेस पावसाने पुन्हा दगा दिला. अपरिपक्व शेंगात ज्वारीच्या दाण्याऐवढे सोयाबीन आहे. एकरी दहा पोते व्हायचे तेथे दोन पोतेही होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत शेतकरी सोयाबीन काढणीच्या तयारीला लागला. नेमकी हीच वेळ साधून पुन्हा निसर्गाची अवकृपा होत आहे. शुक्रवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. आकाशात शनिवारी दिवसभर काळे ढग जमले होते. काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. बदलते वातावरण पाहून शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली. शेतात काढलेला सोयाबीन झाकण्यासाठी धांदल सुरू झाली. आधीच उत्पन्नाची हमी नाही, त्यातच भाड्याने ताडपत्र्या आणून सोयाबीन झाकावे लागत आहे. सोयाबीन सारखीच कपाशीची स्थिती आहे. पाऊस आल्यास फुटलेले बोंड पावसामुळे मातीत मिसळण्याची भीती आहे. अशा स्थितीत कापूस आणि सोयाबीन आता पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे. नव्या सरकारकडून आशाविधानसभेच्या निवडणुका आटोपल्या. लवकरच नवीन सरकार सत्तारुढ होणार आहे. शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नव्या शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. शासन सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला कसे धावून येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)