शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

ढगाळी वातावरणाची धडकी

By admin | Updated: October 25, 2014 22:46 IST

एकापाठोपाठ एक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागचे संकट अद्यापही संपले नाही. ऐन सोयाबीन काढणीचा हंगाम आणि कापूस फुटला असताना ढगाळी वातावरण निर्माण झाले.

संकटाची मालिका : सोयाबीन काढणीचा हंगामयवतमाळ : एकापाठोपाठ एक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागचे संकट अद्यापही संपले नाही. ऐन सोयाबीन काढणीचा हंगाम आणि कापूस फुटला असताना ढगाळी वातावरण निर्माण झाले. काढलेले सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा उडत असून या वातावरणाने शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा धडकी भरविली आहे.निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याला सातत्याने बसत आहे. यंदा तर संकटाची मालिकाच सुरू आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली. दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यातून वाचलेल्या पिकांवर किडींनी आक्रमण केले. शेंगा भरण्याच्या वेळेस पावसाने पुन्हा दगा दिला. अपरिपक्व शेंगात ज्वारीच्या दाण्याऐवढे सोयाबीन आहे. एकरी दहा पोते व्हायचे तेथे दोन पोतेही होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत शेतकरी सोयाबीन काढणीच्या तयारीला लागला. नेमकी हीच वेळ साधून पुन्हा निसर्गाची अवकृपा होत आहे. शुक्रवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. आकाशात शनिवारी दिवसभर काळे ढग जमले होते. काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. बदलते वातावरण पाहून शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली. शेतात काढलेला सोयाबीन झाकण्यासाठी धांदल सुरू झाली. आधीच उत्पन्नाची हमी नाही, त्यातच भाड्याने ताडपत्र्या आणून सोयाबीन झाकावे लागत आहे. सोयाबीन सारखीच कपाशीची स्थिती आहे. पाऊस आल्यास फुटलेले बोंड पावसामुळे मातीत मिसळण्याची भीती आहे. अशा स्थितीत कापूस आणि सोयाबीन आता पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे. नव्या सरकारकडून आशाविधानसभेच्या निवडणुका आटोपल्या. लवकरच नवीन सरकार सत्तारुढ होणार आहे. शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नव्या शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. शासन सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला कसे धावून येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)