शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची सर्वदूर हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 21:11 IST

पावसाळ्याचे अडीच महिने लोटले तरी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला नव्हता. शेतकरी, पिके, जनावरांसह खेडी-शहरातही पेयजलाचा प्रश्न उद्भवला होता.

ठळक मुद्देदिवसभर रिमझिम : पिकांना जीवदान, बळीराजा सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्याचे अडीच महिने लोटले तरी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला नव्हता. शेतकरी, पिके, जनावरांसह खेडी-शहरातही पेयजलाचा प्रश्न उद्भवला होता. अखेर दीर्घकाळ चाललेला लपंडाव शुक्रवारी रात्री संपला आणि शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र अखंड पाऊस बरसला. उशिरा का होईना पण पाऊस आल्यामुळे मरणासन्न पिकांना जीवदान मिळाले आहे. तथापि जलाशयांना अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यावर यावर्षी वरूण राजाने अवकृपा केली. गेल्या अडीच महिन्यात जिल्ह्यात एकदाही दमदार पाऊस बरसला नाही. यात २० दिवस दीर्घ खंडाचा समावेश आहे. उर्वरित दोन महिन्यात अत्यल्प पाऊस बरसला. पावसात खंड पडताच खरिपातील पिकांनी माना टाकल्या. शेतातील उभी पिके करपू लागली. हजारो हेक्टरवरील कपाशी आणि सोयाबीनचे पीक पावसाअभावी करपले. मूग आणि उडीदाचे पिकही नष्ट झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. शनिवारीही दिवसभर पाऊस बरसल्याने ऐन पोळ्यापूर्वी शेतकºयांच्या चेहºयावर थोडे हास्य उमलले. या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली. मात्र अद्याप जिल्ह्यातील जलाशयांना मोठ्या प्रावसाची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४० टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी यावेळेपर्यंत तब्बल ६३ टक्के पाऊस झाला होता.गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८.४४ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक १९ मिमी पाऊस बाभूळगाव, तर झरीमध्ये सर्वात कमी १ मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील जलप्रकल्पांतील पाणीसाठा वाढण्यास मदत मिळणार आहे. तूर्तास जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २७ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पांत तर केवळ २० टक्के पाणी शिल्लक आहे.सहा प्रकल्प अद्याप कोरडेचजिल्ह्यातील ६२ लघु प्रकल्पांत २० टक्के पाणी शिल्लक असले, तरी सहा प्रकल्प अद्याप कोरडे आहेत. यामध्ये लोहतवाडी, नेर, खरद, बोर्डा, मुडाणा, पोफाळी या प्रकल्पांचा समावेश आहे. आजमितीस जिल्ह्यातील मोठ्या पूस प्रकल्पात २०.१२ टक्के, गोकीत ११.३८, वाघाडीत १७.५१, सायखेडात ५९.९, लोअरपूसमध्ये ५३.९५, तर बोरगाव प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के जलसाठा आहे. गेल्या २४ तासांत यवतमाळ १५, बाभूळगाव १९, कळंब १०, आर्णी १२, दारव्हा ७, दिग्रस ६, नेर ७, पुसद २, उमरखेड २, महागाव ८, केळापूर ९, घाटंजी ११, राळेगाव १२, वणी १२, मारेगाव २, तर झरीमध्ये १ मिमी पाऊस झाला.निळोण्यातील जलसाठा वाढलायवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाºया निळोणा जलाशयात सध्या २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या साठ्यात दमदार पावसाअभावी वाड झाली नव्हती. मात्र शुक्रवारपासून यवतमाळ परिसरात पाऊस बरसत असल्याने निळोण्यातील जलसाठा २ इंचांनी वाढला आहे. यामुळे यवतमाळकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.