शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

इंदिरानगरातील नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

महसूल, नगरपरिषद, आरोग्य विभाग व अन्य प्रशासनातील अधिकारी या भागात फिरकत नाहीत, शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही, केवळ दानदाते व सामाजिक संस्थांच्या मदतीवरच वेळ मारुन नेली जात आहे. त्यामुळे आमच्याकडे सर्वत्र जेवण-धान्य पोहोचत नाही, पर्यायाने आमची उपासमार होत आहे, असा सरसकट सूर या जमावाने व्यक्त केला. एरिया सील असल्याने घराबाहेर निघू दिले जात नाही,

ठळक मुद्देतणावाची स्थिती : घरातील अन्न धान्य संपले, किराणा मिळत नाही, सांगा जगावे कसे ?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असलेल्या पवारपुरा, इंदिरानगर परिसराला पूर्णत: सील केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडूच नये असे आदेश आहे. मात्र घरातील जीवनावश्यक वस्तू संपल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. हा मुद्दा घेवून मंगळवारी दुपारी इंदिरानगरातील नागरिक रस्त्यावर उतरले होते.महसूल, नगरपरिषद, आरोग्य विभाग व अन्य प्रशासनातील अधिकारी या भागात फिरकत नाहीत, शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही, केवळ दानदाते व सामाजिक संस्थांच्या मदतीवरच वेळ मारुन नेली जात आहे. त्यामुळे आमच्याकडे सर्वत्र जेवण-धान्य पोहोचत नाही, पर्यायाने आमची उपासमार होत आहे, असा सरसकट सूर या जमावाने व्यक्त केला. एरिया सील असल्याने घराबाहेर निघू दिले जात नाही, घरातील अन्न धान्य संपले आहे, शासनाकडून पुरवठा होत नाही, त्यामुळे आम्ही जगावे कसे असा मुद्दा या जमावाने उपस्थित केला. शासनाकडून जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी दिला जातो, या निधीतून इंदिरानगर व अन्य सील केलेल्या क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा अशी मागणीही या जमावातून करण्यात आली.इंदिरानगर व सील केलेल्या परिसरात बहुतांश गोरगरिबांची घरे आहे. हातावर आणून पानावर खाणे अशी त्यांची अवस्था आहे. मात्र दोन आठवड्यांपासून कोरोनामुळे एरिया सील केल्याने सर्व लोक घरात आहे. त्यांच्या हाताला काम नाही, रोजगारच नाही तर घरात पैसा येणार कोठून, मोठ्या संख्येच्या कुटुंबाची उपजीविका चालवावी कशी अशी भीषण समस्या तेथील नागरिकांपुढे निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निधीतून सर्वतोपरी मदत करून सील केलेल्या एरियातील रहिवाशांची लॉकडाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याची जबाबदारी घ्यावी, अशी एकमुखी मागणी जमावातून करण्यात आली.जमाव रस्त्यावर आल्याचे कळताच पोलीस अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली. जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या जातील, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. यानंतर पोलिसांनी काही वेळातच इंदिरानगर भागात दूध व ब्रेडच्या ८०० पॅकेटस्चे घरोघरी वाटप केले. त्यामुळे काही प्रमाणात जमाव शांत झाला. परंतु जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निधीतून जीवनावश्यक वस्तूचे घरोघरी वाटप तत्काळ सुरू न केल्यास पुन्हा इंदिरानगर प्रकरणाची पुनरावृत्ती होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोकाही वर्तविला जात आहे.जीवाची पर्वा न करता पोलीस २४ तास तैनातकोरोनाचा उद्रेक असलेल्या भोसा रोड, इंदिरानगर, पवारपुरा परिसरात सामान्य माणूस संसर्गाच्या भीतीने तेथे जायलाही धजावत नाही. अशा स्थितीत पोलिसांना मात्र २४ तास त्याच भागात काढावे लागतात. तेथेच चहा, नास्ता, जेवण, पाणी घ्यावे लागते. पोलीस एकीकडे जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित परिसरात अखंड सेवा देत असताना प्रशासनातील अन्य विभागाचे अधिकारी मात्र या भागात फिरकत नसल्यानेच मंगळवारी इंदिरानगरातील संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. आम्ही आमच्या अडचणी कुणाला सांगाव्या, कुणाला जाब विचारावा व कुणाला जबाबदार धरावे असा सवाल त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांपुढे उपस्थित केला.संयुक्त कमिटी हवीयवतमाळातील सील केलेल्या एरियासाठी महसूल, नगरपरिषद, आरोग्य, पोलीस, नगरसेवक यांची संयुक्त देखरेख कमिटी बनविली जावी, कुठे किती व काय वाटप झाले यावर त्यांनी नजर ठेवावी, त्यांनी जीवनावश्यक वस्तू वाटपाचे समन्वयक व्हावे अशी मागणी जमावातून करण्यात आली.इंदिरानगरात महिला-पुरुषांचा प्रशासनाविरुद्ध रोष दिसून आला. आपत्ती व्यवस्थापनातून जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळत नाही, अधिकारी फिरकत नाही ही या जमावाची खंत होती. त्यांचा रोष कमी करण्यासाठी आम्ही लगेच दूध, किराणा साहित्याच्या किट पोहोचविल्या. रमजान महिना असल्याने प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे गरजेचे आहे. मदतीअभावी नागरिकांत रोष वाढून उद्रेकाची भीती आहे.- जावेद अन्सारी, नगरसेवक इंदिरानगर परिसर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस