शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

इंदिरानगरातील नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

महसूल, नगरपरिषद, आरोग्य विभाग व अन्य प्रशासनातील अधिकारी या भागात फिरकत नाहीत, शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही, केवळ दानदाते व सामाजिक संस्थांच्या मदतीवरच वेळ मारुन नेली जात आहे. त्यामुळे आमच्याकडे सर्वत्र जेवण-धान्य पोहोचत नाही, पर्यायाने आमची उपासमार होत आहे, असा सरसकट सूर या जमावाने व्यक्त केला. एरिया सील असल्याने घराबाहेर निघू दिले जात नाही,

ठळक मुद्देतणावाची स्थिती : घरातील अन्न धान्य संपले, किराणा मिळत नाही, सांगा जगावे कसे ?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असलेल्या पवारपुरा, इंदिरानगर परिसराला पूर्णत: सील केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडूच नये असे आदेश आहे. मात्र घरातील जीवनावश्यक वस्तू संपल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. हा मुद्दा घेवून मंगळवारी दुपारी इंदिरानगरातील नागरिक रस्त्यावर उतरले होते.महसूल, नगरपरिषद, आरोग्य विभाग व अन्य प्रशासनातील अधिकारी या भागात फिरकत नाहीत, शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही, केवळ दानदाते व सामाजिक संस्थांच्या मदतीवरच वेळ मारुन नेली जात आहे. त्यामुळे आमच्याकडे सर्वत्र जेवण-धान्य पोहोचत नाही, पर्यायाने आमची उपासमार होत आहे, असा सरसकट सूर या जमावाने व्यक्त केला. एरिया सील असल्याने घराबाहेर निघू दिले जात नाही, घरातील अन्न धान्य संपले आहे, शासनाकडून पुरवठा होत नाही, त्यामुळे आम्ही जगावे कसे असा मुद्दा या जमावाने उपस्थित केला. शासनाकडून जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी दिला जातो, या निधीतून इंदिरानगर व अन्य सील केलेल्या क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा अशी मागणीही या जमावातून करण्यात आली.इंदिरानगर व सील केलेल्या परिसरात बहुतांश गोरगरिबांची घरे आहे. हातावर आणून पानावर खाणे अशी त्यांची अवस्था आहे. मात्र दोन आठवड्यांपासून कोरोनामुळे एरिया सील केल्याने सर्व लोक घरात आहे. त्यांच्या हाताला काम नाही, रोजगारच नाही तर घरात पैसा येणार कोठून, मोठ्या संख्येच्या कुटुंबाची उपजीविका चालवावी कशी अशी भीषण समस्या तेथील नागरिकांपुढे निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निधीतून सर्वतोपरी मदत करून सील केलेल्या एरियातील रहिवाशांची लॉकडाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याची जबाबदारी घ्यावी, अशी एकमुखी मागणी जमावातून करण्यात आली.जमाव रस्त्यावर आल्याचे कळताच पोलीस अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली. जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या जातील, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले. यानंतर पोलिसांनी काही वेळातच इंदिरानगर भागात दूध व ब्रेडच्या ८०० पॅकेटस्चे घरोघरी वाटप केले. त्यामुळे काही प्रमाणात जमाव शांत झाला. परंतु जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निधीतून जीवनावश्यक वस्तूचे घरोघरी वाटप तत्काळ सुरू न केल्यास पुन्हा इंदिरानगर प्रकरणाची पुनरावृत्ती होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोकाही वर्तविला जात आहे.जीवाची पर्वा न करता पोलीस २४ तास तैनातकोरोनाचा उद्रेक असलेल्या भोसा रोड, इंदिरानगर, पवारपुरा परिसरात सामान्य माणूस संसर्गाच्या भीतीने तेथे जायलाही धजावत नाही. अशा स्थितीत पोलिसांना मात्र २४ तास त्याच भागात काढावे लागतात. तेथेच चहा, नास्ता, जेवण, पाणी घ्यावे लागते. पोलीस एकीकडे जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित परिसरात अखंड सेवा देत असताना प्रशासनातील अन्य विभागाचे अधिकारी मात्र या भागात फिरकत नसल्यानेच मंगळवारी इंदिरानगरातील संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. आम्ही आमच्या अडचणी कुणाला सांगाव्या, कुणाला जाब विचारावा व कुणाला जबाबदार धरावे असा सवाल त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांपुढे उपस्थित केला.संयुक्त कमिटी हवीयवतमाळातील सील केलेल्या एरियासाठी महसूल, नगरपरिषद, आरोग्य, पोलीस, नगरसेवक यांची संयुक्त देखरेख कमिटी बनविली जावी, कुठे किती व काय वाटप झाले यावर त्यांनी नजर ठेवावी, त्यांनी जीवनावश्यक वस्तू वाटपाचे समन्वयक व्हावे अशी मागणी जमावातून करण्यात आली.इंदिरानगरात महिला-पुरुषांचा प्रशासनाविरुद्ध रोष दिसून आला. आपत्ती व्यवस्थापनातून जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळत नाही, अधिकारी फिरकत नाही ही या जमावाची खंत होती. त्यांचा रोष कमी करण्यासाठी आम्ही लगेच दूध, किराणा साहित्याच्या किट पोहोचविल्या. रमजान महिना असल्याने प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे गरजेचे आहे. मदतीअभावी नागरिकांत रोष वाढून उद्रेकाची भीती आहे.- जावेद अन्सारी, नगरसेवक इंदिरानगर परिसर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस