शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टँकरवर नागरिकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 21:20 IST

एकेकाळी दुध दुभत्याने समृद्ध असलेले यवतमाळ आज पाण्यासाठी मोताद झाले आहे. ताक, दही फुकटात वाटून देण्याची दिलदारी बाळगणाऱ्या यवतमाळात आज चक्क बादलीभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा टँकर पोहोचताच शहराच्या विविध भागात पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. त्यातही साठवलेले पाणी तिजोरीत दागिना ठेवावा, तसे ड्रमला कुलूप लावून पाणी जपले जात आहे...

ठळक मुद्देटंचाई स्फोटक टप्प्यावर : सहा माणसांच्या कुटुंबाला मिळते फक्त एक ड्रम

एकेकाळी दुध दुभत्याने समृद्ध असलेले यवतमाळ आज पाण्यासाठी मोताद झाले आहे. ताक, दही फुकटात वाटून देण्याची दिलदारी बाळगणाऱ्या यवतमाळात आज चक्क बादलीभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा टँकर पोहोचताच शहराच्या विविध भागात पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. त्यातही साठवलेले पाणी तिजोरीत दागिना ठेवावा, तसे ड्रमला कुलूप लावून पाणी जपले जात आहे...रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहर पाण्याच्या एकेका थेंबासाठी चातकाप्रमाणे वाट पाहात आहे. एका कुटुंबाला ड्रमभर पाण्यात आठ दिवस गुजराण करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. मागास वस्त्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पुढील काही दिवसात ही स्थिती स्फोटक होण्याची शक्यता आहे. पाटीपुऱ्यांतील अंबिकानगर, राजारामनगर, अण्णाभाऊ साठे चौक, सम्यक क्रांती चौकात पाण्यासाठी हाहाकार उडाल्याचे चित्र आहे. या भागातील बहुतांश नागरिक रोजमजुरी आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. पाणीटंचाईने त्यांच्या व्यवसायावरच पाणी फेरल्या जाण्याची वेळ आली आहे. किमान आठ दिवसांच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या भागात अनेक कुटुंबांना एक दिवसाची सुटी घेणे भाग पडत आहे. नाहीतर पाणीच मिळत नाही. यामुळे ज्या दिवशी टँकर येणार, त्या दिवशी या भागातले नागरिक घराबाहेर, चौकात टाक्या आणून ठेवतात. टँकरवर पाळत ठेवतात. टँकर येताच पाणी भरण्यासाठी अक्षरश: यात्रा असते.अंबिकानगरात महिनाभर प्रतीक्षाप्रतिक वानखडे यांनी अंबिकानगरात गत महिनाभरापासून नळ नसल्याचा संताप नोंदविला. यामुळे इतर काम सोडून पाण्यासाठी हापशीवर जावे लागत असल्याचे ते म्हणाले. या भागात दोन हापशा आहेत. यातील एक कोरडी पडली आहे. तर दुसरीला पाण्यासाठी खूप पंप मारावे लागतात. त्याच्या दुरूस्तीकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे त्यांनी सांगितले.आरती घोडाम याच भागातील विशाखा बुद्धविहार परिसरात राहतात. त्या ज्या ठिकाणी भाड्याने राहतात, ते घरमालक आठवड्यातून एक दिवस पाणी देतात. इतर दिवसात पाण्याची व्यवस्था त्यांना करावी लागते. यामुळे पाण्यासाठी सुटी घ्यावी लागते, असे त्या म्हणाल्या.याच भागातल्या पुष्पा उरकुडे यांनी हापसीमुळेच आम्ही जगतोय, अशी व्यथा मांडली. या भागात इतरत्र पाणी नाही. टँकरही येत नाही. अशा स्थितीत वापर कसा करावा, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे.सूरज डोंगरे भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. दिवसभर भाजी विकल्यानंतर रात्री पाणी भरावे लागते. यामुळे भाजी व्यवसायही प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात टँकर मिळाला असता तर आम्हाला रोजंदारी बुडण्याची भीती राहिली नसती, असे त्यांचे म्हणणे आहे.राजारामनगराची टँकरवरच भिस्तराजारामनगरातील द्वारका वाघमारे, मीना ताकतोडे, शारदा खंडारे, करूणा वानखडे म्हणाल्या, आमचा भाग केवळ टँकरवर अवलंबून आहे. पाणीटंचाईवर टँकर हा पर्याय नाही. कारण मोजकेच पाणी मिळते. त्यावर काम कसं भागणार?, टँकरची वाट पाहत अख्खा दिवस जातो. यासाठी रोजमजुरी सोडावी लागते. ज्या ठिकाणावरून टँकर भरून येतो, त्या ठिकाणी पाणी तळाला गेले आहे. यामुळे १५ दिवसात स्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वाटत आहे.पाटीपुऱ्यात १९७३ च्या दुष्काळाची आठवणपाटीपुºयातील प्रभाग आठमधील प्रमोद पाटील यांनी महिनाभरापासून आमच्या भागाकडे नळ नाही अशी खंत मांडली. दररोजच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयापर्यंत धाव घ्यावी लागते. १०० ते १२० रूपये ड्रम पाणी विकत घ्यावे लागते, असे ते म्हणाले. टंचाईने १९७३ च्या दुष्काळाची आठवण करून दिल्याचे सचिन मेश्राम, नरेश अढावे, वसंतराव मेश्राम म्हणाले. १४ एप्रिलनंतर काही कुटुंबीय बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असल्याचे प्रमोद पाटील म्हणाले. या भागात पाण्याच्या चोºया होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. यामुळे ड्रमला कुलूप लावण्याची वेळ आली आहे. सारिका कळने, वैशाली कळने, इंदू कांबळे, वर्षा तेलंगे, सिंधू कळने, सविता डोंगरे यांनी महिलांना कसरत करावी लागत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Waterपाणी