शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाण्याच्या टँकरवर नागरिकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 21:20 IST

एकेकाळी दुध दुभत्याने समृद्ध असलेले यवतमाळ आज पाण्यासाठी मोताद झाले आहे. ताक, दही फुकटात वाटून देण्याची दिलदारी बाळगणाऱ्या यवतमाळात आज चक्क बादलीभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा टँकर पोहोचताच शहराच्या विविध भागात पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. त्यातही साठवलेले पाणी तिजोरीत दागिना ठेवावा, तसे ड्रमला कुलूप लावून पाणी जपले जात आहे...

ठळक मुद्देटंचाई स्फोटक टप्प्यावर : सहा माणसांच्या कुटुंबाला मिळते फक्त एक ड्रम

एकेकाळी दुध दुभत्याने समृद्ध असलेले यवतमाळ आज पाण्यासाठी मोताद झाले आहे. ताक, दही फुकटात वाटून देण्याची दिलदारी बाळगणाऱ्या यवतमाळात आज चक्क बादलीभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा टँकर पोहोचताच शहराच्या विविध भागात पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. त्यातही साठवलेले पाणी तिजोरीत दागिना ठेवावा, तसे ड्रमला कुलूप लावून पाणी जपले जात आहे...रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण यवतमाळ शहर पाण्याच्या एकेका थेंबासाठी चातकाप्रमाणे वाट पाहात आहे. एका कुटुंबाला ड्रमभर पाण्यात आठ दिवस गुजराण करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. मागास वस्त्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पुढील काही दिवसात ही स्थिती स्फोटक होण्याची शक्यता आहे. पाटीपुऱ्यांतील अंबिकानगर, राजारामनगर, अण्णाभाऊ साठे चौक, सम्यक क्रांती चौकात पाण्यासाठी हाहाकार उडाल्याचे चित्र आहे. या भागातील बहुतांश नागरिक रोजमजुरी आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. पाणीटंचाईने त्यांच्या व्यवसायावरच पाणी फेरल्या जाण्याची वेळ आली आहे. किमान आठ दिवसांच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी या भागात अनेक कुटुंबांना एक दिवसाची सुटी घेणे भाग पडत आहे. नाहीतर पाणीच मिळत नाही. यामुळे ज्या दिवशी टँकर येणार, त्या दिवशी या भागातले नागरिक घराबाहेर, चौकात टाक्या आणून ठेवतात. टँकरवर पाळत ठेवतात. टँकर येताच पाणी भरण्यासाठी अक्षरश: यात्रा असते.अंबिकानगरात महिनाभर प्रतीक्षाप्रतिक वानखडे यांनी अंबिकानगरात गत महिनाभरापासून नळ नसल्याचा संताप नोंदविला. यामुळे इतर काम सोडून पाण्यासाठी हापशीवर जावे लागत असल्याचे ते म्हणाले. या भागात दोन हापशा आहेत. यातील एक कोरडी पडली आहे. तर दुसरीला पाण्यासाठी खूप पंप मारावे लागतात. त्याच्या दुरूस्तीकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे त्यांनी सांगितले.आरती घोडाम याच भागातील विशाखा बुद्धविहार परिसरात राहतात. त्या ज्या ठिकाणी भाड्याने राहतात, ते घरमालक आठवड्यातून एक दिवस पाणी देतात. इतर दिवसात पाण्याची व्यवस्था त्यांना करावी लागते. यामुळे पाण्यासाठी सुटी घ्यावी लागते, असे त्या म्हणाल्या.याच भागातल्या पुष्पा उरकुडे यांनी हापसीमुळेच आम्ही जगतोय, अशी व्यथा मांडली. या भागात इतरत्र पाणी नाही. टँकरही येत नाही. अशा स्थितीत वापर कसा करावा, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे.सूरज डोंगरे भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. दिवसभर भाजी विकल्यानंतर रात्री पाणी भरावे लागते. यामुळे भाजी व्यवसायही प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात टँकर मिळाला असता तर आम्हाला रोजंदारी बुडण्याची भीती राहिली नसती, असे त्यांचे म्हणणे आहे.राजारामनगराची टँकरवरच भिस्तराजारामनगरातील द्वारका वाघमारे, मीना ताकतोडे, शारदा खंडारे, करूणा वानखडे म्हणाल्या, आमचा भाग केवळ टँकरवर अवलंबून आहे. पाणीटंचाईवर टँकर हा पर्याय नाही. कारण मोजकेच पाणी मिळते. त्यावर काम कसं भागणार?, टँकरची वाट पाहत अख्खा दिवस जातो. यासाठी रोजमजुरी सोडावी लागते. ज्या ठिकाणावरून टँकर भरून येतो, त्या ठिकाणी पाणी तळाला गेले आहे. यामुळे १५ दिवसात स्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वाटत आहे.पाटीपुऱ्यात १९७३ च्या दुष्काळाची आठवणपाटीपुºयातील प्रभाग आठमधील प्रमोद पाटील यांनी महिनाभरापासून आमच्या भागाकडे नळ नाही अशी खंत मांडली. दररोजच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयापर्यंत धाव घ्यावी लागते. १०० ते १२० रूपये ड्रम पाणी विकत घ्यावे लागते, असे ते म्हणाले. टंचाईने १९७३ च्या दुष्काळाची आठवण करून दिल्याचे सचिन मेश्राम, नरेश अढावे, वसंतराव मेश्राम म्हणाले. १४ एप्रिलनंतर काही कुटुंबीय बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असल्याचे प्रमोद पाटील म्हणाले. या भागात पाण्याच्या चोºया होत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. यामुळे ड्रमला कुलूप लावण्याची वेळ आली आहे. सारिका कळने, वैशाली कळने, इंदू कांबळे, वर्षा तेलंगे, सिंधू कळने, सविता डोंगरे यांनी महिलांना कसरत करावी लागत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Waterपाणी