शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

‘मजीप्रा’पुढे नागरिक हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

पाणी वितरणासोबतच देयक वितरणाचेही नियोजन कमालीचे कोलमडले आहे. काही भागात चार दिवसांआड, काही ठिकाणी पाच दिवसानंतर तर काही परिसरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे या विभागाकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात पाच दिवसाआडही पाणीपुरवठ्याची सोय या विभागाकडून योग्यरित्या केली जात नाही.

ठळक मुद्देवरिष्ठांकडून समस्या दुर्लक्षित : कार्यालयातील बहुतांश कक्षांमध्ये असतो शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यवतमाळ विभागाचा बेताल कारभार सुरू आहे. नागरिकांच्या प्रश्नांशी या विभागाला काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. या कार्यालयात बहुतांशवेळा शुकशुकाट राहात असल्याने नेमके भेटायचे कुणाला हा प्रश्न निर्माण होतो. संपूर्ण कारभार जणू कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सोडून देण्यात आला आहे. त्यांची मनमानी सुरू आहे. कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी होत आहे.पाणी वितरणासोबतच देयक वितरणाचेही नियोजन कमालीचे कोलमडले आहे. काही भागात चार दिवसांआड, काही ठिकाणी पाच दिवसानंतर तर काही परिसरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे या विभागाकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात पाच दिवसाआडही पाणीपुरवठ्याची सोय या विभागाकडून योग्यरित्या केली जात नाही.पाण्याचे देयक दोन महिन्याचे दिले जाते. यासाठी मीटरचे रिडींगही घेतले जात नाही. मनठोक युनीट नोंदवून ग्राहकांच्या हाती हजारो रुपयांचे बिल टाकले जाते. अनेक भागात तर ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ या दोन महिन्याचे देयक नोव्हेंबर महिन्यात देण्यात आले आहे. पाणी वापराचे युनीटही दिशाभूल करणारे आहे. बील भरण्याची तारीख अगदी आठ दिवसांवर असताना देयक पाठविले जाते. या बिलाचा भरणा करत नाही तोच पुढील महिन्याचे देयक तयार होते. त्यात मागील थकीत रक्कम दाखवून हजारो रुपयांचे बिल माथी मारले जाते. यातही गोंधळाची परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. ग्राहकांना सहज समजेल अशा नोंदी दिल्या जात नाही. समजावून घेण्याचा प्रयत्न केल्यास तांत्रिक बाबी पुढे करून गोंधळात टाकले जाते.या कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांना लोकांचे फोनही उचलण्याची अ‍ॅलर्जी आहे. मांडलेली समस्या त्यांच्याकडून अपवादानेही सोडविली जात नाही. काही अधिकारी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. विचारलेल्या माहितीची वास्तव स्थिती त्यांच्याकडे राहात नाही. प्रामुख्याने तांत्रिक कामे सांभाळणाºयांना हा आजार जडलेला आहे. अनेक भागात नव्यानेच टाकलेल्या पाईपलाईनवर लिकेज आहे. वॉलमनला या बाबी दिसत असतानाही दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष का केले जाते, हा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय सुरू आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही.नवीन लाईनवर जोडण्या कशा घेणारअमृत योजनेंतर्गत यवतमाळ शहरात नवीन अंतर्गत पाईपलाईन टाकल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केला जात आहे. याच आधारे जुने कनेक्शन नवीन लाईनवर टाकण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. लाईन न बदलविल्यास पाणी पुरवठा थांबेल, अशी धमकीवजा सूचनाही देण्यात आली आहे. प्रत्यक्षात अनेक भागात नवीन पाईपलाईनच पोहोचलेली नाही. अशावेळी कनेक्शन बदलविणार कसे हा नळधारकांचा प्रश्न आहे.

टॅग्स :Socialसामाजिक