शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘मजीप्रा’पुढे नागरिक हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

पाणी वितरणासोबतच देयक वितरणाचेही नियोजन कमालीचे कोलमडले आहे. काही भागात चार दिवसांआड, काही ठिकाणी पाच दिवसानंतर तर काही परिसरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे या विभागाकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात पाच दिवसाआडही पाणीपुरवठ्याची सोय या विभागाकडून योग्यरित्या केली जात नाही.

ठळक मुद्देवरिष्ठांकडून समस्या दुर्लक्षित : कार्यालयातील बहुतांश कक्षांमध्ये असतो शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यवतमाळ विभागाचा बेताल कारभार सुरू आहे. नागरिकांच्या प्रश्नांशी या विभागाला काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. या कार्यालयात बहुतांशवेळा शुकशुकाट राहात असल्याने नेमके भेटायचे कुणाला हा प्रश्न निर्माण होतो. संपूर्ण कारभार जणू कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सोडून देण्यात आला आहे. त्यांची मनमानी सुरू आहे. कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी होत आहे.पाणी वितरणासोबतच देयक वितरणाचेही नियोजन कमालीचे कोलमडले आहे. काही भागात चार दिवसांआड, काही ठिकाणी पाच दिवसानंतर तर काही परिसरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे या विभागाकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात पाच दिवसाआडही पाणीपुरवठ्याची सोय या विभागाकडून योग्यरित्या केली जात नाही.पाण्याचे देयक दोन महिन्याचे दिले जाते. यासाठी मीटरचे रिडींगही घेतले जात नाही. मनठोक युनीट नोंदवून ग्राहकांच्या हाती हजारो रुपयांचे बिल टाकले जाते. अनेक भागात तर ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ या दोन महिन्याचे देयक नोव्हेंबर महिन्यात देण्यात आले आहे. पाणी वापराचे युनीटही दिशाभूल करणारे आहे. बील भरण्याची तारीख अगदी आठ दिवसांवर असताना देयक पाठविले जाते. या बिलाचा भरणा करत नाही तोच पुढील महिन्याचे देयक तयार होते. त्यात मागील थकीत रक्कम दाखवून हजारो रुपयांचे बिल माथी मारले जाते. यातही गोंधळाची परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. ग्राहकांना सहज समजेल अशा नोंदी दिल्या जात नाही. समजावून घेण्याचा प्रयत्न केल्यास तांत्रिक बाबी पुढे करून गोंधळात टाकले जाते.या कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांना लोकांचे फोनही उचलण्याची अ‍ॅलर्जी आहे. मांडलेली समस्या त्यांच्याकडून अपवादानेही सोडविली जात नाही. काही अधिकारी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. विचारलेल्या माहितीची वास्तव स्थिती त्यांच्याकडे राहात नाही. प्रामुख्याने तांत्रिक कामे सांभाळणाºयांना हा आजार जडलेला आहे. अनेक भागात नव्यानेच टाकलेल्या पाईपलाईनवर लिकेज आहे. वॉलमनला या बाबी दिसत असतानाही दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष का केले जाते, हा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय सुरू आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही.नवीन लाईनवर जोडण्या कशा घेणारअमृत योजनेंतर्गत यवतमाळ शहरात नवीन अंतर्गत पाईपलाईन टाकल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केला जात आहे. याच आधारे जुने कनेक्शन नवीन लाईनवर टाकण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. लाईन न बदलविल्यास पाणी पुरवठा थांबेल, अशी धमकीवजा सूचनाही देण्यात आली आहे. प्रत्यक्षात अनेक भागात नवीन पाईपलाईनच पोहोचलेली नाही. अशावेळी कनेक्शन बदलविणार कसे हा नळधारकांचा प्रश्न आहे.

टॅग्स :Socialसामाजिक