शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

बालहक्क दिन विशेष; बाल हक्क संरक्षणाच्या नावावर सरकारचा पोरखेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 12:40 IST

बालकांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी कायदा आहे. तो राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण युनिटही स्थापन झाले. पण युनिटमध्ये काम करण्यासाठी कर्मचारी नेमण्याचाच सरकारला विसर पडलेला आहे.

ठळक मुद्देयुनिट आहे, पण माणसेच नाहीतदहा जिल्ह्यांना बालसंरक्षण अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बालकांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी कायदा आहे. तो राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण युनिटही स्थापन झाले. पण युनिटमध्ये काम करण्यासाठी कर्मचारी नेमण्याचाच सरकारला विसर पडलेला आहे. त्यामुळे मंगळवारी जागतिक बालहक्क दिवस साजरा होत असला, तरी महाराष्ट्रातील बाल संरक्षणाचे युनिट पोरके आहे आणि बालसंरक्षणाच्या नावे सरकारचा पोरखेळ सुरू आहे.महिला व बाल विकास खात्याच्या अखत्यारित हे युनिट २०१० पासून जिल्हाधिकारी स्तरावर स्थापन करण्यात आले. पण खुद्द बालविकास मंत्र्यांच्याच बिड जिल्ह्याच्या युनिटमध्ये १२ पैकी ११ पदे भरलेली नाहीत. बालन्याय अधिनियमानुसार बालकांना जगण्याचा, सहभागाचा, विकासाचा आणि संरक्षणाचा असे चार महत्त्वाचे अधिकार आहेत. विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय ठेवून प्रत्येक बालकाचे हे अधिकारी अबाधित राखण्याची जबाबदारी बालसंरक्षण युनिटवर सोपविण्यात आली. प्रत्येक जिल्हास्तरावर १२ पदे निर्माण करण्यात आली आहे. मात्र अपवाद वगळता कोणत्याही जिल्ह्यात संपूर्ण पदे भरलेली नाहीत.त्यातही ९ जिल्ह्यांमध्ये तर १२ पैकी एकही पद भरण्यात आलेले नाही. मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, धुळे, जळगाव, नंदूरबार, हिंगोली, जालना, परभणी या जिल्ह्यांमधील सर्वच्या सर्व जागा रिक्त आहेत. तर महिला व बाल विकास मंत्र्यांचे गाव असलेल्या बिड जिल्ह्याच्या युनिटमध्ये १२ पैकी केवळ एकच पद भरलेले आहे. तीच स्थिती नांदेडच्या युनिटचीही आहे. विशेष म्हणजे, अनेक जिल्ह्यांत काही पदे भरलेली असली तरी या युनिटसाठी फर्निचर, संगणक अशा सुविधाच पुरविण्यात आलेल्या नाहीत.त्याहूनही गंभीर म्हणजे, या कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती नाही. अनेकांचे कंत्राट ‘रिनिव्ह’ करण्यासाठी कुचराई केली जात असल्याची ओरड आहे. तर यापुढे कार्यरत कर्मचाऱ्यांना कमी करून सरकार ‘आउटसोर्सिंग’चा मार्ग चोखाळण्याच्या मनस्थितीत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे बालसंरक्षण युनिटमधील कर्मचारी बेरोजगारीच्या धास्तीत आहेत.शाळांमध्येही बालहक्कांची पायमल्लीबालन्याय अधिनियमानुसार ० ते १८ वयोगटातील बालकांना चार महत्त्वाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. त्यात शिक्षण घेण्याचा अधिकारही समाविष्ठ आहे. शिवाय मोफत व सक्तीच्या शिक्षणाचाही कायदा अमलात आलेला आहे. मात्र, महाराष्ट्रातील अनेक प्राथमिक शाळांमध्ये हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहे. त्यामुळे शिक्षण घेण्याचा बालकांचा अधिकार कोण संरक्षित करणार, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रGovernmentसरकार