शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

शालेय पोषण आहारातील पूरक आहार हद्दपार

By admin | Updated: November 9, 2014 22:36 IST

डोंगराळ व बंदी भागात असलेल्या प्राथमिक शाळांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातून पूरक आहार हद्दपार झाल्याचे दिसत आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांमुळे शैक्षणिक विकासाला ग्रहण लागले

फुलसावंगी : डोंगराळ व बंदी भागात असलेल्या प्राथमिक शाळांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातून पूरक आहार हद्दपार झाल्याचे दिसत आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांमुळे शैक्षणिक विकासाला ग्रहण लागले असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. मात्र यावर शाळा व्यवस्थापन समित्याही बोलायला तयार नाही.ग्रामीण व दुर्गम भागातील तांडे आणि वस्तीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. शिक्षणासोबतच सुदृढ आरोग्य व कुपोषण टाळण्यासाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. दैनंदिन आहारातून विशिष्ट जीवनसत्व मिळावे यासाठी पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य तसेच आठवड्यातून एक दिवस बिस्कीट, केळी अथवा अंडी देणे बंधनकारक आहे. परंतु बंदी भागातील चिखली व कोरटा परिसरातील शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणजे केवळ पिवळा भात दिला जातो. आठवड्यातून एकदा देण्यात येणारा पूरक आहार तर येथील विद्यार्थ्यांना माहीतच नाही. तो केवळ बिले काढण्यापुरताच दिसत आहे.चिखली व कोरटा केंद्रातील शिक्षक ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून येणे-जाणे करतात. कोरटा केंद्राचे केंद्र प्रमुख नांदेड जिल्ह्यातून कारभार पाहत आहे. सदर शिक्षक मुख्यालयी राहत असल्याबाबतचे पुरावे मात्र सादर केले जातात. घरभाडे भत्ता घेऊन शासनाची दिशाभूल केली जाते. अनेक विद्यार्थी शाळेत येतात परंतु त्यांना पुरक पोषण आहार मिळत नाही. शाळा व्यवस्थापन समितीचे यावर प्रत्यक्ष नियंत्रण असते. मात्र ग्रामीण भागातील अनेक शाळा व्यवस्थापन समित्या केवळ कागदोपत्री आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थी निमूटपणे पिवळा भात खाताना दिसतात. याबाबत उमरखेडच्या शालेय पोषण आहार अधीक्षकांशी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस पूरक पोषण आहार देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक मुख्याध्यापकांनी बिलही जोडल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र विपरित परिस्थिती असल्याचे सांगितल्यावर त्यांनी या प्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)