शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शालेय पोषण आहारातील पूरक आहार हद्दपार

By admin | Updated: November 9, 2014 22:36 IST

डोंगराळ व बंदी भागात असलेल्या प्राथमिक शाळांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातून पूरक आहार हद्दपार झाल्याचे दिसत आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांमुळे शैक्षणिक विकासाला ग्रहण लागले

फुलसावंगी : डोंगराळ व बंदी भागात असलेल्या प्राथमिक शाळांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातून पूरक आहार हद्दपार झाल्याचे दिसत आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांमुळे शैक्षणिक विकासाला ग्रहण लागले असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. मात्र यावर शाळा व्यवस्थापन समित्याही बोलायला तयार नाही.ग्रामीण व दुर्गम भागातील तांडे आणि वस्तीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. शिक्षणासोबतच सुदृढ आरोग्य व कुपोषण टाळण्यासाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. दैनंदिन आहारातून विशिष्ट जीवनसत्व मिळावे यासाठी पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य तसेच आठवड्यातून एक दिवस बिस्कीट, केळी अथवा अंडी देणे बंधनकारक आहे. परंतु बंदी भागातील चिखली व कोरटा परिसरातील शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणजे केवळ पिवळा भात दिला जातो. आठवड्यातून एकदा देण्यात येणारा पूरक आहार तर येथील विद्यार्थ्यांना माहीतच नाही. तो केवळ बिले काढण्यापुरताच दिसत आहे.चिखली व कोरटा केंद्रातील शिक्षक ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून येणे-जाणे करतात. कोरटा केंद्राचे केंद्र प्रमुख नांदेड जिल्ह्यातून कारभार पाहत आहे. सदर शिक्षक मुख्यालयी राहत असल्याबाबतचे पुरावे मात्र सादर केले जातात. घरभाडे भत्ता घेऊन शासनाची दिशाभूल केली जाते. अनेक विद्यार्थी शाळेत येतात परंतु त्यांना पुरक पोषण आहार मिळत नाही. शाळा व्यवस्थापन समितीचे यावर प्रत्यक्ष नियंत्रण असते. मात्र ग्रामीण भागातील अनेक शाळा व्यवस्थापन समित्या केवळ कागदोपत्री आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थी निमूटपणे पिवळा भात खाताना दिसतात. याबाबत उमरखेडच्या शालेय पोषण आहार अधीक्षकांशी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस पूरक पोषण आहार देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक मुख्याध्यापकांनी बिलही जोडल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र विपरित परिस्थिती असल्याचे सांगितल्यावर त्यांनी या प्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)