शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाह रोखले : पाच अल्पवयीन बालिकांचे वाचले आयुष्य

By अविनाश साबापुरे | Updated: May 10, 2024 19:41 IST

अक्षय्य तृतीयेचा साधला होता मुहूर्त, प्रशासनाने केली कारवाई

यवतमाळ : कमी वयात मुलीचे लग्न लावणे गुन्हा असण्यासोबतच ही बाब तिच्या आरोग्यासाठीही घातक ठरते. मात्र आजही बालविवाहांचे प्रकार थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. शुक्रवारी अक्षय्य तृतियेचा शुभमुहूर्त साधून जिल्ह्यात तब्बल पाच बालिकांचा बालविवाह लावण्याचा घाट घालण्यात आला होता. ऐनवेळी प्रशासनाचे पथक मांडवात धडकल्याने हे पाचही विवाह रोखण्यात आले.

जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील खेकडी, घाटंजी तालुक्यातील मुरली, उमरखेड तालुक्यातील कळमुला व देवसरी, महागाव तालुक्यातील फुलसावंगी या गावांमध्ये शुक्रवारी सकाळी ९ वाजता ही कारवाई बालसंरक्षण कक्षाच्या पथकाने पार पाडली.

जिल्ह्यात अक्षय तृतियेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बालविवाह होऊ शकतात, असा अलर्ट राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने देशभरातील सर्व जिल्ह्यांना पाठविला होता. त्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. जिल्हा बालसंरक्षण कक्षानेबालविवाह प्रतिबंधासाठी गावपातळीपर्यंत प्रयत्न वाढविले होते. तरीही शुक्रवारी तब्बल सात बालविवाहांचा घाट घातल्या गेल्याची गोपनीय माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळाली.

खेकडी (ता. दिग्रस) येथे २, मुरली (ता. घाटंजी) येथे १, कळमुला व देवसरी (ता. उमरखेड) येथे २, फुलसावंगी (ता. महागाव) येथे १, पांढरकवडा येथे १ अशा एकूण ७ नियोजित बालविवाहांबाबत अज्ञात व्यक्तींकडून प्रशासनाला माहिती पुरविण्यात आली होती.  त्यानंतर जिल्हा बाल व विकास अधिकारी प्रभाकर उपरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात तातडीने पथके रवाना करण्यात आली. बालिकांच्या वयाची शहानिशा केली असता ५ बालिका अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. तर दोन  बालिकांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली असल्याने त्यांना विवाह करण्यास संमती देण्यात आली.

अज्ञात व्यक्तीने दिलेल्या पत्त्यावर पथकाने धडक देऊन संबंधित कुटुंबातील पालकांना बालविवाह न करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. अल्पवयात लग्न लावून दिल्यास व त्यास सहकार्य करणाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यांना एक लाख रुपये दंड व दोन वर्ष कारावास होऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर संबंधित पालकांनी मुलीला १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत तिचे लग्न करणार नाही, असे लेखी हमीपत्र दिले आणि बालविवाह थांबविले. सर्व अल्पवयीन बालिका, नियोजित वर, लग्न लावून देणारे नातेवाईक यांना बाल कल्याण समितीपुढे हजर करण्याची प्रक्रिया जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे सुरु आहे.

या कार्यवाहीसाठी दिग्रस, उमरखेड, महागाव, घाटंजी, पांढरकवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, दिग्रसचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सखाराम माने, उमरखेडचे बाल विकास प्रकल्प अधिकारी परांडे, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे सहकार्य लाभले. बाल संरक्षण अधिकारी अविनाश पिसुर्डे, बाल संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, चाईल्ड हेल्प लाईन समन्वयक फाल्गुन पालकर, सुपरवायझर गणेश आत्राम, मनीष शेळके, पूनम कनाके व केस वर्कर शुभम कोंडलवार, अश्विनी नासरे, पूजा शेलारे यांनी ही कारवाई पार पाडली.

मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्षे होण्यापूर्वी विवाह केल्यास तो बालविवाह ठरतो. अशा बालविवाहाबाबत माहिती असल्यास ग्रामसेवक, गाव बालविवाह प्रतिबंध अधिकारी, सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील अथवा चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे करण्यात आले.

टॅग्स :marriageलग्नYavatmalयवतमाळ