शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

'गावाच्या विकासासाठी कामाची पद्धत बदला', भास्कर पेरे पाटलांचा सरपंचांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 17:53 IST

Yavatmal : भास्कर पेरे पाटील आर्णी येथे व्याख्यान, सरपंच, उपसरपंचांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी: गावाचा विकास साधायचा असेल तर आपल्याला कामाची पद्धत बदलवावी लागेल. फळझाडे लावून आपल्याला गावाची समृद्धी साधता येईल. गावात पिण्याचे स्वच्छ पाणी कसे देता येईल, जेणेकरून ग्रामस्थ निरोगी राहतील अशा उपाययोजना केल्या पाहिजे. यामुळे पैसे, महिलांचे श्रम वाचतील, असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. आपण यासाठी काय प्रयोग केले हेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार राजू तोडसाम यांनी आर्णी येथे आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी भास्कर पेरे पाटील यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी गाव विकासाच्या दृष्टीने यावेळी विविध उदाहरणे दिली. यात स्वच्छता, पिण्याचे पाणी या बाबींवर अधिक भर देण्यात आला. स्वच्छतेसाठी दररोज गाव झाडणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी उदाहरणासह सांगितले.

शौचालयाचा वापर आपण केला पाहिजे हे त्यांनी सांगितले. शिक्षणावरही त्यांनी मार्गदर्शन केले. काही लोक मुलींना शिक्षण घेऊ देत नाही, हे चुकीचे आहे. शिक्षण वाया जात नाही. शिक्षणाकडे आपण गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. महिला सक्षम झाल्या तरच आपले गाव, घर, राज्य, देश सक्षम होईल. 

गावविकासाच्या दृष्टीने आपण काय प्रयोग केले हे सांगितले. शेतीत सिंचन वाढवले आहे. गावात पिण्याचे, वापरण्याचे मुबलक पाणी उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय अनेक सुविधा देऊन गावाचा आणि नागरिकांचा विकास साधल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. गावाचा विकास करणे कठीण नाही. याची सुरुवात कुठेतरी केली पाहिजे, असे भास्कर पेरे पाटील म्हणाले.

यावेळी राजू तोडसाम, प्रिया तोडसाम यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन इनूस शेख यांनी केले. आभार अॅड. राहुल ढोरे यांनी मानले. मंचावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर डकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

  

टॅग्स :Yavatmalयवतमाळ