शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

सर्वोच्च न्यायालयाच्या 'स्टे'वर राज्य सरकार टिकून - ॲड. प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 12:35 IST

''राज्य सरकारवर अद्यापही टांगती तलवार''

यवतमाळ : शिवसेनेतील फुटीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आमदारांच्या अपात्रतेचा अर्जही अद्याप प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेमुळे सध्या राज्य सरकार टिकून आहे. या सरकारवर अद्यापही टांगती तलवार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (दि. १४) येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी ॲड. आंबेडकर शुक्रवारी यवतमाळ येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सध्याचे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेमुळे टिकून असल्याचे स्पष्ट केले. आमदारांच्या अपात्रतेच्या अर्जावर अद्याप निर्णय न झाल्याने सरकारवर टांगती तलवार असून न्यायालयाने ती त्वरित संपवावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी प्रशासकीय असफलता आणि घटनात्मक असफलता यावरही मतप्रदर्शन केले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी काही निर्णयांवरून सर्वोच्च न्यायालय स्वत:ला राजकीय वादात ओढवून घेत असल्याचे दिसून येते, असे सांगितले.

हिजाब बंदीच्या निर्णयावरही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे मतैक्य होत नाही, असे सांगितले. जेथे ड्रेस कोड लागू नाही, तेथे कुणीच गणवेशाची सक्ती करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र विदर्भ कधी होईल, या प्रश्नावर त्यांनी जेव्हा केंद्रातील सरकार जाण्याच्या मार्गावर असेल तेव्हा नक्कीच विदर्भ स्वतंत्र होईल, असे सांगितले.

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाला आपला विरोध अद्यापही कायम असून टोल माफ केल्यास एसटी महामंडळ नफ्यात येऊ शकते, असे सांगितले. सध्या एसटी महामंडळ वर्षाकाठी टोलपोटी अडीच हजार कोटी रुपयांचा भरणा करते. हा टोल माफ झाल्यास कर्मचाऱ्यांचा १२०० कोटींचा पगार देऊन महामंडळ १३ कोटींनी फायद्यात राहू शकते, असे त्यांनी सांगितले.

विलीनीकरणाला विरोध असला तरी एसटीच्या संपाला आपला पाठिंबा होता, असे त्यांनी कबूल केले. मात्र चालक, वाहक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना केवळ आपल्या वेतनाची चिंता असून महामंडळ कायम ठेवण्यासाठी ते इमानदारीने प्रयत्न करीत नसल्याचा आरोप केला. शिवनेरी बसेस भाड्याने घेतल्याने महामंडळाचे कंबरडे मोडले, असे त्यांनी सांगितले. हा मुद्दा कर्मचारी लोकांसमोर आणत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिवसेना, काँग्रेसकडून प्रतिसाद नाही

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसकडे युतीचा प्रस्ताव दिल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कबूल केले. मात्र अद्याप शिवसेना आणि काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचेही सांगितले. मात्र युती न झाल्यास राज्यभर सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी जात, धर्म, व्यवसाय पाहून मतदान न करता आपल्या हिताच्या लोकप्रतिनिधींना निवडून द्यावे, असे आवाहन केले. अन्यथा त्यांचीच फसवणूक होते, असेही स्पष्ट केले.

यवतमाळमध्ये उतरणार

वंचित बहुजन आघाडीने मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात आपली ताकद दाखवून दिली होती. आता यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच निवडणुकांत हा पक्ष रणांगणात उतरणार आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही वंचितचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरState Governmentराज्य सरकार