शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या 'स्टे'वर राज्य सरकार टिकून - ॲड. प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 12:35 IST

''राज्य सरकारवर अद्यापही टांगती तलवार''

यवतमाळ : शिवसेनेतील फुटीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आमदारांच्या अपात्रतेचा अर्जही अद्याप प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेमुळे सध्या राज्य सरकार टिकून आहे. या सरकारवर अद्यापही टांगती तलवार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (दि. १४) येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी ॲड. आंबेडकर शुक्रवारी यवतमाळ येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सध्याचे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेमुळे टिकून असल्याचे स्पष्ट केले. आमदारांच्या अपात्रतेच्या अर्जावर अद्याप निर्णय न झाल्याने सरकारवर टांगती तलवार असून न्यायालयाने ती त्वरित संपवावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी प्रशासकीय असफलता आणि घटनात्मक असफलता यावरही मतप्रदर्शन केले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी काही निर्णयांवरून सर्वोच्च न्यायालय स्वत:ला राजकीय वादात ओढवून घेत असल्याचे दिसून येते, असे सांगितले.

हिजाब बंदीच्या निर्णयावरही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे मतैक्य होत नाही, असे सांगितले. जेथे ड्रेस कोड लागू नाही, तेथे कुणीच गणवेशाची सक्ती करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र विदर्भ कधी होईल, या प्रश्नावर त्यांनी जेव्हा केंद्रातील सरकार जाण्याच्या मार्गावर असेल तेव्हा नक्कीच विदर्भ स्वतंत्र होईल, असे सांगितले.

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाला आपला विरोध अद्यापही कायम असून टोल माफ केल्यास एसटी महामंडळ नफ्यात येऊ शकते, असे सांगितले. सध्या एसटी महामंडळ वर्षाकाठी टोलपोटी अडीच हजार कोटी रुपयांचा भरणा करते. हा टोल माफ झाल्यास कर्मचाऱ्यांचा १२०० कोटींचा पगार देऊन महामंडळ १३ कोटींनी फायद्यात राहू शकते, असे त्यांनी सांगितले.

विलीनीकरणाला विरोध असला तरी एसटीच्या संपाला आपला पाठिंबा होता, असे त्यांनी कबूल केले. मात्र चालक, वाहक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना केवळ आपल्या वेतनाची चिंता असून महामंडळ कायम ठेवण्यासाठी ते इमानदारीने प्रयत्न करीत नसल्याचा आरोप केला. शिवनेरी बसेस भाड्याने घेतल्याने महामंडळाचे कंबरडे मोडले, असे त्यांनी सांगितले. हा मुद्दा कर्मचारी लोकांसमोर आणत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिवसेना, काँग्रेसकडून प्रतिसाद नाही

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसकडे युतीचा प्रस्ताव दिल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कबूल केले. मात्र अद्याप शिवसेना आणि काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचेही सांगितले. मात्र युती न झाल्यास राज्यभर सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी जात, धर्म, व्यवसाय पाहून मतदान न करता आपल्या हिताच्या लोकप्रतिनिधींना निवडून द्यावे, असे आवाहन केले. अन्यथा त्यांचीच फसवणूक होते, असेही स्पष्ट केले.

यवतमाळमध्ये उतरणार

वंचित बहुजन आघाडीने मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात आपली ताकद दाखवून दिली होती. आता यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच निवडणुकांत हा पक्ष रणांगणात उतरणार आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही वंचितचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरState Governmentराज्य सरकार