शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

शेवटच्या क्षणी बदलले उमेदवारांनी पक्ष

By admin | Updated: October 10, 2015 02:03 IST

‘कामाला लागा’चे आश्वासन देऊनही ऐनवेळी दुसऱ्यालाच पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दिल्याने प्रचंड नाराज

मारेगावात काँग्रेस-शिवसेनेत बंडखोरी : ‘बंडोबां’मुळे निवडणुकीत चुरस वाढली, झरीत चौरंगी लढतीची शक्यता मारेगाव : ‘कामाला लागा’चे आश्वासन देऊनही ऐनवेळी दुसऱ्यालाच पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दिल्याने प्रचंड नाराज झालेल्या ‘बंडोबां’नी पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेत बंडाळी करून ऐनवेळी दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे गुरूवारी शेवटच्या दिवशी काही तासांत मारेगाव येथे सर्वच पक्षांचे समीकरण बदलले आहे. बंडोबांमुळे आता निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली आहे.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पक्षांसमोर उमेदवारी वाटपाचा घोळ सुरू होता. एकाच प्रभागात अनेक कार्यकर्ते इच्छुक असल्याने उमेदवार ठरविणे राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांसमोर डोकेदुखी ठरले होते. त्यांची एकप्रकारे अग्नीपरीक्षाच होती. त्यामुळे आत्ताच कुणाला नाराज करण्यापेक्षा सगळ्यांनाच कामाला लागण्याचे आदेश देऊन नेत्यांनी वेळ मारून नेण्याची भूमिका घेतली होती.गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जासोबत पक्षाचा बी फार्म जोडणे आवश्यक असल्याने, राष्ट्रीय पक्षांना आपले उमेदवार जाहीर करावे लागले. उमेदवार जाहीर होताच शिवसेना व काँग्रेस, या दोन पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली आहे. अखेर नाराजांनी सोयीच्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. या बंडाळीचा लाभ मनसे व शिवसेनेला झाला. या पक्षांनी ऐनवेळी इतर पक्षांचे सक्षम उमेदवार मिळत असल्याने त्यांना तत्काळ पक्षात प्रवेश देत आपल्या पक्षाची उमेदवारी बहाल केली आहे.काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची मोठी संख्या होती. नेत्यांच्या अवती-भवती फिरणाऱ्या आणि पक्षाचे निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या या सिनीअर कार्यकर्त्यांना ‘धोबीपछाड’ देत काँग्रेसच्या नेत्यांनी विजयी होणाऱ्या उमेदवारांना पसंती दर्शविली. त्यामुळे काँग्रेसच्या काही कायकर्त्यांचा हिरमोड झाला. काँग्रेसने जुन्या कार्यकर्त्यांपैकी उदय रायपूरे व खालीद पटेल यांना मात्र उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसेसोबतच आता अपक्षांची कसोटी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)