शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेवटच्या क्षणी बदलले उमेदवारांनी पक्ष

By admin | Updated: October 10, 2015 02:03 IST

‘कामाला लागा’चे आश्वासन देऊनही ऐनवेळी दुसऱ्यालाच पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दिल्याने प्रचंड नाराज

मारेगावात काँग्रेस-शिवसेनेत बंडखोरी : ‘बंडोबां’मुळे निवडणुकीत चुरस वाढली, झरीत चौरंगी लढतीची शक्यता मारेगाव : ‘कामाला लागा’चे आश्वासन देऊनही ऐनवेळी दुसऱ्यालाच पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दिल्याने प्रचंड नाराज झालेल्या ‘बंडोबां’नी पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेत बंडाळी करून ऐनवेळी दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे गुरूवारी शेवटच्या दिवशी काही तासांत मारेगाव येथे सर्वच पक्षांचे समीकरण बदलले आहे. बंडोबांमुळे आता निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली आहे.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पक्षांसमोर उमेदवारी वाटपाचा घोळ सुरू होता. एकाच प्रभागात अनेक कार्यकर्ते इच्छुक असल्याने उमेदवार ठरविणे राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांसमोर डोकेदुखी ठरले होते. त्यांची एकप्रकारे अग्नीपरीक्षाच होती. त्यामुळे आत्ताच कुणाला नाराज करण्यापेक्षा सगळ्यांनाच कामाला लागण्याचे आदेश देऊन नेत्यांनी वेळ मारून नेण्याची भूमिका घेतली होती.गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जासोबत पक्षाचा बी फार्म जोडणे आवश्यक असल्याने, राष्ट्रीय पक्षांना आपले उमेदवार जाहीर करावे लागले. उमेदवार जाहीर होताच शिवसेना व काँग्रेस, या दोन पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली आहे. अखेर नाराजांनी सोयीच्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. या बंडाळीचा लाभ मनसे व शिवसेनेला झाला. या पक्षांनी ऐनवेळी इतर पक्षांचे सक्षम उमेदवार मिळत असल्याने त्यांना तत्काळ पक्षात प्रवेश देत आपल्या पक्षाची उमेदवारी बहाल केली आहे.काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची मोठी संख्या होती. नेत्यांच्या अवती-भवती फिरणाऱ्या आणि पक्षाचे निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या या सिनीअर कार्यकर्त्यांना ‘धोबीपछाड’ देत काँग्रेसच्या नेत्यांनी विजयी होणाऱ्या उमेदवारांना पसंती दर्शविली. त्यामुळे काँग्रेसच्या काही कायकर्त्यांचा हिरमोड झाला. काँग्रेसने जुन्या कार्यकर्त्यांपैकी उदय रायपूरे व खालीद पटेल यांना मात्र उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसेसोबतच आता अपक्षांची कसोटी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)