शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या क्षणी बदलले उमेदवारांनी पक्ष

By admin | Updated: October 10, 2015 02:03 IST

‘कामाला लागा’चे आश्वासन देऊनही ऐनवेळी दुसऱ्यालाच पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दिल्याने प्रचंड नाराज

मारेगावात काँग्रेस-शिवसेनेत बंडखोरी : ‘बंडोबां’मुळे निवडणुकीत चुरस वाढली, झरीत चौरंगी लढतीची शक्यता मारेगाव : ‘कामाला लागा’चे आश्वासन देऊनही ऐनवेळी दुसऱ्यालाच पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दिल्याने प्रचंड नाराज झालेल्या ‘बंडोबां’नी पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेत बंडाळी करून ऐनवेळी दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे गुरूवारी शेवटच्या दिवशी काही तासांत मारेगाव येथे सर्वच पक्षांचे समीकरण बदलले आहे. बंडोबांमुळे आता निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली आहे.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पक्षांसमोर उमेदवारी वाटपाचा घोळ सुरू होता. एकाच प्रभागात अनेक कार्यकर्ते इच्छुक असल्याने उमेदवार ठरविणे राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांसमोर डोकेदुखी ठरले होते. त्यांची एकप्रकारे अग्नीपरीक्षाच होती. त्यामुळे आत्ताच कुणाला नाराज करण्यापेक्षा सगळ्यांनाच कामाला लागण्याचे आदेश देऊन नेत्यांनी वेळ मारून नेण्याची भूमिका घेतली होती.गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जासोबत पक्षाचा बी फार्म जोडणे आवश्यक असल्याने, राष्ट्रीय पक्षांना आपले उमेदवार जाहीर करावे लागले. उमेदवार जाहीर होताच शिवसेना व काँग्रेस, या दोन पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली आहे. अखेर नाराजांनी सोयीच्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. या बंडाळीचा लाभ मनसे व शिवसेनेला झाला. या पक्षांनी ऐनवेळी इतर पक्षांचे सक्षम उमेदवार मिळत असल्याने त्यांना तत्काळ पक्षात प्रवेश देत आपल्या पक्षाची उमेदवारी बहाल केली आहे.काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची मोठी संख्या होती. नेत्यांच्या अवती-भवती फिरणाऱ्या आणि पक्षाचे निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या या सिनीअर कार्यकर्त्यांना ‘धोबीपछाड’ देत काँग्रेसच्या नेत्यांनी विजयी होणाऱ्या उमेदवारांना पसंती दर्शविली. त्यामुळे काँग्रेसच्या काही कायकर्त्यांचा हिरमोड झाला. काँग्रेसने जुन्या कार्यकर्त्यांपैकी उदय रायपूरे व खालीद पटेल यांना मात्र उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसेसोबतच आता अपक्षांची कसोटी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)