शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

आर्णी शहरात घर तेथे आम्रवृक्ष लावण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:34 PM

सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. मात्र हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे. त्यावरून बोध घेऊन येथील वृक्षप्रेमींनी ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच आर्णीची आंबानगरी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देवृक्षप्रेमींचा उपक्रम : पहिल्या टप्प्यात १०० रोपट्यांची लागवड, शहराची आंबानगरीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. मात्र हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे. त्यावरून बोध घेऊन येथील वृक्षप्रेमींनी ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच आर्णीची आंबानगरी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.शहरातील काही वृक्षप्रेमींनी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून कडूनिंब, वड, पिंपळासोबतच एक हजार केशर आंब्याची लागवड करून ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना अंमालात आणली. शहराला आंबानगरीचे वैभव प्राप्त करण्यासाठी शेकडो आर्णीकर धडपडत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वस्तिक जिनिंग, खासगी बाजार समिती, चेंबर आॅफ कॉमर्स, केमिस्ट अँड ड्रगीस्ट, डॉक्टर असोसिएशनच्या संयुक्त पुढाकारातून रविवारी १०० रोपट्यांची लागवड करण्यात आली.वातावरणात होणारा बदल बघून वृक्ष लागवडीशिवाय पर्याय शिल्लक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील वृक्षप्रेमींनी पुढाकार घेऊन शहरात लोक सहभागातून एक हजार आम्रवृक्ष लागवडीचा संकल्प केला. याकरिता आर्णी आम्रवृक्ष मंडळाची स्थापना करण्यात आली. यातूनच रविवारी सकाळी १०० रोपट्यांचे रोपण करण्यात आले.वृक्षारोपणाला आमदार ख्वाजा बेग, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, डॉ.शीतलकुमार गटागट, मुख्याधिकारी माळकर, ठाणेदार यशवंत बावीस्कार, दिग्रसचे ठाणेदार उदयसिंह चंदेल, आरएफओ रोडगे, मंडळ अधिकारी नाईक, नगरसेवक चिराग शहा, प्रकाश पांडे, नंदकिशोर राठी, मनोज गंगन, प्रफुल वानखडे, अशोक अग्रवाल यांच्यासह पत्रकार व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वृक्षारोपणाचे कार्य आर्णीत उत्तरोत्तर वाढून आर्णीचे नाव ‘आंबा नगरी: म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात उदयास यावे, असे मत डॉ.गटागट यांनी व्यक्त केले.जावयाची पाहुणचारासाठी अशीही अटजावई म्हटलं की सन्मान आलाच. उन्हाळ्यात आंब्याचा रस म्हणजे पाहुणचाराची पर्वणी. रसाळीच्या मेजवाणीत जावयाची खास खिदमत केली जाते.मात्र येथील कोठारी परिवाराच्या जावयाने १०० रोपटी लावणार असेल, तरच सासुरवाडीला रसाळीसाठी येईल, अशी अनोखी अट घातली. डॉ.शीतलकुमार गटागट असे या जावई बापूचे नाव आहे. ते लातूर येथे वास्तव्याला असतात. डॉक्टरांना लातूरच्या दुष्काळी भागाची दाहकता माहिती आहे. त्यामुळेच ते पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीचा संदेश देत या मोहिमेत सहभागी झाले. त्यांची अट मान्य करून येथील कोठारी परिवाराने त्यांना १०० रोपटी लावण्याचा शब्द दिला. त्यामुळे डॉ.गटागट यांच्या उपस्थितीतच १०० रोपांची लागवड करण्यात आली.