शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

आर्णी शहरात घर तेथे आम्रवृक्ष लावण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:34 IST

सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. मात्र हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे. त्यावरून बोध घेऊन येथील वृक्षप्रेमींनी ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच आर्णीची आंबानगरी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देवृक्षप्रेमींचा उपक्रम : पहिल्या टप्प्यात १०० रोपट्यांची लागवड, शहराची आंबानगरीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. मात्र हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे. त्यावरून बोध घेऊन येथील वृक्षप्रेमींनी ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच आर्णीची आंबानगरी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.शहरातील काही वृक्षप्रेमींनी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून कडूनिंब, वड, पिंपळासोबतच एक हजार केशर आंब्याची लागवड करून ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना अंमालात आणली. शहराला आंबानगरीचे वैभव प्राप्त करण्यासाठी शेकडो आर्णीकर धडपडत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वस्तिक जिनिंग, खासगी बाजार समिती, चेंबर आॅफ कॉमर्स, केमिस्ट अँड ड्रगीस्ट, डॉक्टर असोसिएशनच्या संयुक्त पुढाकारातून रविवारी १०० रोपट्यांची लागवड करण्यात आली.वातावरणात होणारा बदल बघून वृक्ष लागवडीशिवाय पर्याय शिल्लक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील वृक्षप्रेमींनी पुढाकार घेऊन शहरात लोक सहभागातून एक हजार आम्रवृक्ष लागवडीचा संकल्प केला. याकरिता आर्णी आम्रवृक्ष मंडळाची स्थापना करण्यात आली. यातूनच रविवारी सकाळी १०० रोपट्यांचे रोपण करण्यात आले.वृक्षारोपणाला आमदार ख्वाजा बेग, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, डॉ.शीतलकुमार गटागट, मुख्याधिकारी माळकर, ठाणेदार यशवंत बावीस्कार, दिग्रसचे ठाणेदार उदयसिंह चंदेल, आरएफओ रोडगे, मंडळ अधिकारी नाईक, नगरसेवक चिराग शहा, प्रकाश पांडे, नंदकिशोर राठी, मनोज गंगन, प्रफुल वानखडे, अशोक अग्रवाल यांच्यासह पत्रकार व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वृक्षारोपणाचे कार्य आर्णीत उत्तरोत्तर वाढून आर्णीचे नाव ‘आंबा नगरी: म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात उदयास यावे, असे मत डॉ.गटागट यांनी व्यक्त केले.जावयाची पाहुणचारासाठी अशीही अटजावई म्हटलं की सन्मान आलाच. उन्हाळ्यात आंब्याचा रस म्हणजे पाहुणचाराची पर्वणी. रसाळीच्या मेजवाणीत जावयाची खास खिदमत केली जाते.मात्र येथील कोठारी परिवाराच्या जावयाने १०० रोपटी लावणार असेल, तरच सासुरवाडीला रसाळीसाठी येईल, अशी अनोखी अट घातली. डॉ.शीतलकुमार गटागट असे या जावई बापूचे नाव आहे. ते लातूर येथे वास्तव्याला असतात. डॉक्टरांना लातूरच्या दुष्काळी भागाची दाहकता माहिती आहे. त्यामुळेच ते पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीचा संदेश देत या मोहिमेत सहभागी झाले. त्यांची अट मान्य करून येथील कोठारी परिवाराने त्यांना १०० रोपटी लावण्याचा शब्द दिला. त्यामुळे डॉ.गटागट यांच्या उपस्थितीतच १०० रोपांची लागवड करण्यात आली.