शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

आर्णी शहरात घर तेथे आम्रवृक्ष लावण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:34 IST

सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. मात्र हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे. त्यावरून बोध घेऊन येथील वृक्षप्रेमींनी ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच आर्णीची आंबानगरी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देवृक्षप्रेमींचा उपक्रम : पहिल्या टप्प्यात १०० रोपट्यांची लागवड, शहराची आंबानगरीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. मात्र हा दुष्काळ निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजनशून्य कृतीचा परिणाम आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने ही स्थिती ओढवली आहे. त्यावरून बोध घेऊन येथील वृक्षप्रेमींनी ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच आर्णीची आंबानगरी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे.शहरातील काही वृक्षप्रेमींनी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून कडूनिंब, वड, पिंपळासोबतच एक हजार केशर आंब्याची लागवड करून ‘घर तेथे आम्र वृक्ष’ ही संकल्पना अंमालात आणली. शहराला आंबानगरीचे वैभव प्राप्त करण्यासाठी शेकडो आर्णीकर धडपडत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वस्तिक जिनिंग, खासगी बाजार समिती, चेंबर आॅफ कॉमर्स, केमिस्ट अँड ड्रगीस्ट, डॉक्टर असोसिएशनच्या संयुक्त पुढाकारातून रविवारी १०० रोपट्यांची लागवड करण्यात आली.वातावरणात होणारा बदल बघून वृक्ष लागवडीशिवाय पर्याय शिल्लक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील वृक्षप्रेमींनी पुढाकार घेऊन शहरात लोक सहभागातून एक हजार आम्रवृक्ष लागवडीचा संकल्प केला. याकरिता आर्णी आम्रवृक्ष मंडळाची स्थापना करण्यात आली. यातूनच रविवारी सकाळी १०० रोपट्यांचे रोपण करण्यात आले.वृक्षारोपणाला आमदार ख्वाजा बेग, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, डॉ.शीतलकुमार गटागट, मुख्याधिकारी माळकर, ठाणेदार यशवंत बावीस्कार, दिग्रसचे ठाणेदार उदयसिंह चंदेल, आरएफओ रोडगे, मंडळ अधिकारी नाईक, नगरसेवक चिराग शहा, प्रकाश पांडे, नंदकिशोर राठी, मनोज गंगन, प्रफुल वानखडे, अशोक अग्रवाल यांच्यासह पत्रकार व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वृक्षारोपणाचे कार्य आर्णीत उत्तरोत्तर वाढून आर्णीचे नाव ‘आंबा नगरी: म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात उदयास यावे, असे मत डॉ.गटागट यांनी व्यक्त केले.जावयाची पाहुणचारासाठी अशीही अटजावई म्हटलं की सन्मान आलाच. उन्हाळ्यात आंब्याचा रस म्हणजे पाहुणचाराची पर्वणी. रसाळीच्या मेजवाणीत जावयाची खास खिदमत केली जाते.मात्र येथील कोठारी परिवाराच्या जावयाने १०० रोपटी लावणार असेल, तरच सासुरवाडीला रसाळीसाठी येईल, अशी अनोखी अट घातली. डॉ.शीतलकुमार गटागट असे या जावई बापूचे नाव आहे. ते लातूर येथे वास्तव्याला असतात. डॉक्टरांना लातूरच्या दुष्काळी भागाची दाहकता माहिती आहे. त्यामुळेच ते पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीचा संदेश देत या मोहिमेत सहभागी झाले. त्यांची अट मान्य करून येथील कोठारी परिवाराने त्यांना १०० रोपटी लावण्याचा शब्द दिला. त्यामुळे डॉ.गटागट यांच्या उपस्थितीतच १०० रोपांची लागवड करण्यात आली.