शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

हैदराबादमधून आले, यवतमाळात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस, विठाळा, कान्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणचे मजूर रविवारी हैदराबादवरून चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरवरून या मजुरांना यवतमाळसाठी स्वतंत्र बस देण्यात आली. या बसमध्ये बसून हे मजूर सकाळी ८ वाजता यवतमाळात पोहोचले. यवतमाळमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी शासकीय प्रक्रिया संथगतीने पार पाडल्याने पाच तास ताटकळत थांबावे लागले.

ठळक मुद्देटळटळीत उन्हात मजुरांचा पाच तास बसमध्येच ठिय्या : चंद्रपूर आगाराच्या बसची मर्यादा यवतमाळात संपली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील मजूर कामाच्या शोधात हैदराबादमध्ये पोहोचले. गत नऊ महिन्यापासून त्याच ठिकाणी असलेल्या मजुरांना तेलंगणा सरकारने रविवारी परतीचा पास दिला. हे मजूर हैदराबादवरून यवतमाळात आले. या ठिकाणी आरोग्य तपासणीसाठी त्यांना पाच तास ताटकळत राहावे लागले.जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस, विठाळा, कान्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणचे मजूर रविवारी हैदराबादवरून चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरवरून या मजुरांना यवतमाळसाठी स्वतंत्र बस देण्यात आली. या बसमध्ये बसून हे मजूर सकाळी ८ वाजता यवतमाळात पोहोचले. यवतमाळमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी शासकीय प्रक्रिया संथगतीने पार पाडल्याने पाच तास ताटकळत थांबावे लागले. या मजुरांकडे पिण्याचे पाणी नाही. भोजनाची व्यवस्था नाही. खिशात पैसे नाही अशा स्थितीत भर उन्हात हे मजूर बसस्थानक चौकात एसटीमध्येच बसून होते. त्यांना वाहक आणि चालकाकडून शासकीय प्रक्रिया पार पाडत आहे, त्यामुळे थांबाव लागणार असेच उत्तर ऐकायला मिळत होते. परराज्यातून आलेले हे मजूर राज्यात पाठविताना प्रथम आरोग्य तपासणी बंधनकारक आहे. यासोबतच वाहनाला सॅनिटराईज करावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी ही बस थांबली आहे. या प्रकारामुळे संतप्त मजुरांनी आम्हाला किमान पाणी द्या आणि नंतर गावी पाठवा, असे म्हणत धिम्या गतीचा निषेध नोंदविला. समीर चेटुले, दशरथ देवकर, सतीश शेळके, अजय ढवळे, तन्मय किनाके, सतीश शेळके यांनी मजुरांनी त्वरित आपल्या गावी पाठवावे, असे मत नोंदविले.पुढचा प्रवास उधारीवरमजुरांना घेऊन बस यवतमाळात पोहोचली. मात्र पाच तास झाल्यानंतरही पुढे जाण्यासाठी सूचना मिळाल्या नाही. अखेर हे मजूर पायदळ गावाकडे निघाले. त्यांना एका ठिकाणावरून उधारीवर ऑटोरिक्षा मिळाला. प्रवाशांना पुढे नेण्याकरिता एसटीची मर्यादा संपली. यामुळे चंद्रपूर आगाराच्या वाहक आणि चालकांनी गाडी पुढे नेण्याकरिता मनाई केली. पाच तास ही गाडी रेंगाळली. मात्र मजुरांची आरोग्य तपासणी झाली नाही. अखेर बस चालकांनी चौकात थांबलेली गाडी बसस्थानकात नेली. तेथून ही बस चंद्रपूरला गेली. काही मजूर पायी गेले. तर काही उधारीवर ऑटोरिक्षा मिळवून आपल्या गावाकडे गेले. मजुरांनी या संपूर्ण प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी