शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादमधून आले, यवतमाळात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस, विठाळा, कान्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणचे मजूर रविवारी हैदराबादवरून चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरवरून या मजुरांना यवतमाळसाठी स्वतंत्र बस देण्यात आली. या बसमध्ये बसून हे मजूर सकाळी ८ वाजता यवतमाळात पोहोचले. यवतमाळमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी शासकीय प्रक्रिया संथगतीने पार पाडल्याने पाच तास ताटकळत थांबावे लागले.

ठळक मुद्देटळटळीत उन्हात मजुरांचा पाच तास बसमध्येच ठिय्या : चंद्रपूर आगाराच्या बसची मर्यादा यवतमाळात संपली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील मजूर कामाच्या शोधात हैदराबादमध्ये पोहोचले. गत नऊ महिन्यापासून त्याच ठिकाणी असलेल्या मजुरांना तेलंगणा सरकारने रविवारी परतीचा पास दिला. हे मजूर हैदराबादवरून यवतमाळात आले. या ठिकाणी आरोग्य तपासणीसाठी त्यांना पाच तास ताटकळत राहावे लागले.जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस, विठाळा, कान्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणचे मजूर रविवारी हैदराबादवरून चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरवरून या मजुरांना यवतमाळसाठी स्वतंत्र बस देण्यात आली. या बसमध्ये बसून हे मजूर सकाळी ८ वाजता यवतमाळात पोहोचले. यवतमाळमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी शासकीय प्रक्रिया संथगतीने पार पाडल्याने पाच तास ताटकळत थांबावे लागले. या मजुरांकडे पिण्याचे पाणी नाही. भोजनाची व्यवस्था नाही. खिशात पैसे नाही अशा स्थितीत भर उन्हात हे मजूर बसस्थानक चौकात एसटीमध्येच बसून होते. त्यांना वाहक आणि चालकाकडून शासकीय प्रक्रिया पार पाडत आहे, त्यामुळे थांबाव लागणार असेच उत्तर ऐकायला मिळत होते. परराज्यातून आलेले हे मजूर राज्यात पाठविताना प्रथम आरोग्य तपासणी बंधनकारक आहे. यासोबतच वाहनाला सॅनिटराईज करावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी ही बस थांबली आहे. या प्रकारामुळे संतप्त मजुरांनी आम्हाला किमान पाणी द्या आणि नंतर गावी पाठवा, असे म्हणत धिम्या गतीचा निषेध नोंदविला. समीर चेटुले, दशरथ देवकर, सतीश शेळके, अजय ढवळे, तन्मय किनाके, सतीश शेळके यांनी मजुरांनी त्वरित आपल्या गावी पाठवावे, असे मत नोंदविले.पुढचा प्रवास उधारीवरमजुरांना घेऊन बस यवतमाळात पोहोचली. मात्र पाच तास झाल्यानंतरही पुढे जाण्यासाठी सूचना मिळाल्या नाही. अखेर हे मजूर पायदळ गावाकडे निघाले. त्यांना एका ठिकाणावरून उधारीवर ऑटोरिक्षा मिळाला. प्रवाशांना पुढे नेण्याकरिता एसटीची मर्यादा संपली. यामुळे चंद्रपूर आगाराच्या वाहक आणि चालकांनी गाडी पुढे नेण्याकरिता मनाई केली. पाच तास ही गाडी रेंगाळली. मात्र मजुरांची आरोग्य तपासणी झाली नाही. अखेर बस चालकांनी चौकात थांबलेली गाडी बसस्थानकात नेली. तेथून ही बस चंद्रपूरला गेली. काही मजूर पायी गेले. तर काही उधारीवर ऑटोरिक्षा मिळवून आपल्या गावाकडे गेले. मजुरांनी या संपूर्ण प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी