शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

हैदराबादमधून आले, यवतमाळात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस, विठाळा, कान्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणचे मजूर रविवारी हैदराबादवरून चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरवरून या मजुरांना यवतमाळसाठी स्वतंत्र बस देण्यात आली. या बसमध्ये बसून हे मजूर सकाळी ८ वाजता यवतमाळात पोहोचले. यवतमाळमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी शासकीय प्रक्रिया संथगतीने पार पाडल्याने पाच तास ताटकळत थांबावे लागले.

ठळक मुद्देटळटळीत उन्हात मजुरांचा पाच तास बसमध्येच ठिय्या : चंद्रपूर आगाराच्या बसची मर्यादा यवतमाळात संपली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील मजूर कामाच्या शोधात हैदराबादमध्ये पोहोचले. गत नऊ महिन्यापासून त्याच ठिकाणी असलेल्या मजुरांना तेलंगणा सरकारने रविवारी परतीचा पास दिला. हे मजूर हैदराबादवरून यवतमाळात आले. या ठिकाणी आरोग्य तपासणीसाठी त्यांना पाच तास ताटकळत राहावे लागले.जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस, विठाळा, कान्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणचे मजूर रविवारी हैदराबादवरून चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरवरून या मजुरांना यवतमाळसाठी स्वतंत्र बस देण्यात आली. या बसमध्ये बसून हे मजूर सकाळी ८ वाजता यवतमाळात पोहोचले. यवतमाळमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी शासकीय प्रक्रिया संथगतीने पार पाडल्याने पाच तास ताटकळत थांबावे लागले. या मजुरांकडे पिण्याचे पाणी नाही. भोजनाची व्यवस्था नाही. खिशात पैसे नाही अशा स्थितीत भर उन्हात हे मजूर बसस्थानक चौकात एसटीमध्येच बसून होते. त्यांना वाहक आणि चालकाकडून शासकीय प्रक्रिया पार पाडत आहे, त्यामुळे थांबाव लागणार असेच उत्तर ऐकायला मिळत होते. परराज्यातून आलेले हे मजूर राज्यात पाठविताना प्रथम आरोग्य तपासणी बंधनकारक आहे. यासोबतच वाहनाला सॅनिटराईज करावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी ही बस थांबली आहे. या प्रकारामुळे संतप्त मजुरांनी आम्हाला किमान पाणी द्या आणि नंतर गावी पाठवा, असे म्हणत धिम्या गतीचा निषेध नोंदविला. समीर चेटुले, दशरथ देवकर, सतीश शेळके, अजय ढवळे, तन्मय किनाके, सतीश शेळके यांनी मजुरांनी त्वरित आपल्या गावी पाठवावे, असे मत नोंदविले.पुढचा प्रवास उधारीवरमजुरांना घेऊन बस यवतमाळात पोहोचली. मात्र पाच तास झाल्यानंतरही पुढे जाण्यासाठी सूचना मिळाल्या नाही. अखेर हे मजूर पायदळ गावाकडे निघाले. त्यांना एका ठिकाणावरून उधारीवर ऑटोरिक्षा मिळाला. प्रवाशांना पुढे नेण्याकरिता एसटीची मर्यादा संपली. यामुळे चंद्रपूर आगाराच्या वाहक आणि चालकांनी गाडी पुढे नेण्याकरिता मनाई केली. पाच तास ही गाडी रेंगाळली. मात्र मजुरांची आरोग्य तपासणी झाली नाही. अखेर बस चालकांनी चौकात थांबलेली गाडी बसस्थानकात नेली. तेथून ही बस चंद्रपूरला गेली. काही मजूर पायी गेले. तर काही उधारीवर ऑटोरिक्षा मिळवून आपल्या गावाकडे गेले. मजुरांनी या संपूर्ण प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी