शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा..! नोकरीला बोलावले अन् उमेदवारच आले नाहीत; संस्थाचालकच ताटकळत

By अविनाश साबापुरे | Updated: August 12, 2023 15:56 IST

सहा वर्षे लांबलेल्या शिक्षक भरतीत नवा पेचप्रसंग

अविनाश साबापुरे

यवतमाळ : एकीकडे एका जागेसाठी हजारो बेरोजगारांचे अर्ज येत आहेत, तर दुसरीकडे शिक्षक भरती प्रक्रियेत एका जागेसाठी फक्त दहा उमेदवारांना बोलावूनही एकही उमेदवार आलेला नाही. त्यामुळे मुलाखतीसाठी वाट पाहणाऱ्या संस्थाचालकांना शेवटपर्यंत वाटच पाहत राहावी लागली. शुक्रवारी या मुलाखतींचा शेवटचा दिवसही असाच रिकामा गेल्याने संस्थाचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

राज्य शासनातर्फे पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीमधील हा नवाच ट्विस्ट आता पुढे आला आहे. राज्यात दहा वर्षे बंदी असलेली शिक्षक भरती २०१७ मध्ये सुरू करून त्यासाठी पहिल्यांदाच अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. त्यात जिल्हा परिषद शाळांमधील जवळपास पाच हजार जागा भरण्यात आल्या. मात्र, खासगी संस्थाचालक, तसेच काही उमेदवार न्यायालयात गेल्याने अनुदानित संस्थांमधील भरती अडकली होती. हा तिढा सुटून यंदा राज्यातील १९६ शिक्षण संस्थांमधील पदभरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे उमेदवारांची शिफारस करण्यात आली. या उमेदवारांची ११ ऑगस्टपर्यंत संस्थाचालकांनी मुलाखती घेऊन, अध्यापन कौशल्याचा डेमो घेऊन नियुक्ती देण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण संचालकांनी १ ऑगस्टलाच दिले होते.

त्यानुसार एका जागेसाठी शिफारस झालेल्या दहाही उमेदवारांशी संस्थाचालकांनी, मुख्याध्यापकांनी ई-मेल पाठवून संपर्क केला. मुलाखतीचा दिवस ठरवून दिला. मात्र, अनेक संस्थांमध्ये मुलाखतीला एकही उमेदवार आला नाही. अशा संस्थांनी परत व्हाॅट्सॲपद्वारे, प्रत्यक्ष फोन काॅल करून उमेदवारांना बोलावले, तरीही कोणी आले नाही. त्यामुळे अशा संस्थांमधील जागा आता भरल्या जातील की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी अखेरच्या दिवशी वाट पाहून थकलेल्या संस्थाचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तोडगा काढण्यासाठी धाव घेतली.

या शाळांना पाहावी लागली वाट

१) मारेगाव तालुक्यातील शाळेत ७ ऑगस्टला शिक्षक पदभरतीकरिता मुलाखती आयोजित केल्या होत्या. मात्र एकही उमेदवार उपस्थित झाला नाही.

२) घाटंजी येथील नामवंत शाळेतही ७ ऑगस्टला पाच पदांसाठी मुलाखती झाल्या; परंतु ईडब्ल्यूएस प्रवर्गातील एकही उमेदवार आला नाही. यामुळे ११ ऑगस्टला पुन्हा मुलाखत आयोजित करण्यात आली. दिवसभर संबंधित उमेदवाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

३) महागाव तालुक्यातील एका मोठ्या शिक्षण संस्थेतही ७ ऑगस्टलाच मुलाखती आयोजित केल्या होत्या. तिथेसुद्धा एकही उमेदवार आला नाही.

४) या सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता आम्ही याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना अवगत केल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

असे का घडले?

२०१७ मध्ये अभियोग्यता परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नोकरीच्या काॅलसाठी उमेदवारांना तब्बल २०२३ पर्यंत वाट पाहावी लागली. या सहा वर्षांच्या कालावधीत अनेक उमेदवार विविध खासगी नोकऱ्यांमध्ये गुंतले. काहींनी आपला स्वत:चा छोटासा का होईना व्यवसाय सुरू केला. यवतमाळच्या संस्थांसाठी चक्क सोलापूर, सांगली, मिरजसारख्या दूरच्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांची शिफारस झाली आहे. हे उमेदवार यवतमाळऐवजी आपल्या गावाजवळ असलेल्या संस्थांमध्ये मुलाखतीला गेले असण्याची शक्यता आहे. २०१७ मध्येच अनेक उमेदवार ‘एजबार’ होण्याच्या उंबरठ्यावर होते. अशा विविध कारणांमुळे २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेमधील उमेदवार २०२३ मधील मुलाखतींना गैरहजर राहिल्याची शक्यता आहे.

आता पुढे काय होणार?

पवित्र पोर्टल आणि संस्था लाॅगीनवरच याबाबतची संपूर्ण माहिती असते. ज्या संस्थांमध्ये उमेदवार आले नाहीत, त्यांनी पवित्र पोर्टलमार्फत मेल केल्यास त्यावर उपाय सुचविला जाऊ शकतो. कदाचित अशा संस्थांना मुलाखती घेण्यासाठी आणखी मुदतवाढही मिळू शकते. ज्या उमेदवारांना दूरवरून मुलाखतीला येणे शक्य नाही, त्यांना ऑनलाइन मुलाखत देण्याची सुविधादेखील दिली जाऊ शकते, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत यांनी सांगितले. त्याचवेळी अतिरिक्त शिक्षकांचे अशा जागांवर समायोजन केले जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Educationशिक्षणjobनोकरीTeacherशिक्षकYavatmalयवतमाळ