शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सीएए व एनआरसी हा गुलाम करणारा कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर यवतमाळात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले असता त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ते म्हणाले, एकट्या आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करताना १५ लाखांपेक्षा जास्त जे शंकास्पद नागरिक सरकारने शोधले त्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूंचीच संख्या अधिक असून ती १५ लाखांपेक्षा जास्त आहे.

ठळक मुद्देबी.जी. कोळसे पाटील : शंकास्पद ठरलेल्या नागरिकांचे करणार तरी काय?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सीएए, एनआरसी हा कायदा म्हणजे सरकारचा घर पेटवण्याचा प्रकार आहे. या कायद्याने केवळ मुस्लीमच टार्गेट होणार नाही तर देशातील एससी, एसटी, ओबीसी व सर्व जातीतील गरिबांना गुलाम करणारा हा कायदा आहे, अशी खरमरीत टीका मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर यवतमाळात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले असता त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ते म्हणाले, एकट्या आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करताना १५ लाखांपेक्षा जास्त जे शंकास्पद नागरिक सरकारने शोधले त्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूंचीच संख्या अधिक असून ती १५ लाखांपेक्षा जास्त आहे. त्यातही जवळपास दहा लाख नागरिक हे एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील आहे. त्यामुळे या कायद्याची कुºहाड कोणावर कोसळणार हे स्पष्ट आहे. आसाममध्ये ही मोहीम राबवताना सरकारला सोळाशे कोटीपेक्षा जास्त खर्च आला. एवढा प्रचंड खर्च करून सरकारच्या हाती काहीच लागत नाही. शंकास्पद ठरलेले नागरिक अन्नसुरक्षा, मनरेगापासून वंचित होणार. कामगार कायदा, मिनिमम वेजेस यापासून ते वंचित राहणार असल्याने त्यांना पुढेही देशात ठेवले तरी त्यांची अवस्था गुलामांपेक्षा वाईट होणार आहे, अशी भीती कोळसे पाटील यांनी व्यक्त केली.संविधानाने भारताच्या सर्व लोकांना भारताचे मालक केले. हीच बाब काही मूठभर लोकांना मान्य नाही. त्यासाठी त्यांनी हा अन्याकारक कायदा पुढे केला असून त्याला मनुस्मृतीची पार्श्वभूमी असल्याचे त्यांनी सांगितले. तर देशातील बिघडलेल्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करण्यासाठी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा पुढे केला आहे. आसाममध्येही सर्वांकडेच नागरिकत्वाची कागदपत्रे होती. मात्र अनेकांची कागदपत्रे विखुरलेली आहेत, अनेकांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका आहेत. त्यामुळे काही नागरिकांना तेथे संशयास्पद ठरवण्यात आले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा कायदा राबविण्यास नकार द्यावा. त्यासाठी आम्ही १५ मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे. राज्य सरकारला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातही जाता येईल, असे मत दिल्ली येथील कासीम रसूल इलियास यांनी व्यक्त केले. पत्रपरिषदेला डॉ.मुजीब शेख, जिया मिनाई उपस्थित होते.

हा कायदा मानणे म्हणजे नपुंसकताजो कायदा लोकांवर अन्याय करतो तो मानणे म्हणजे नपुंसकता होय, अशी भूमिका महात्मा गांधींनी आफ्रिकेतील आंदोलनात मांडली होती. आम्हीही आता सीएए, एनआरसीविरोधात सविनाय कायदेभंग करणार आहोत. एनआरसीचा फॉर्म भरून घेण्यासाठी जो कर्मचारी आमच्याकडे येईल त्याचा सन्मान करू. मात्र त्याला फॉर्म भरून देणार नाही. शिवाय हा कायदा मागे घेण्यासाठी न्यायालयीन लढाईदेखील लढण्याची आमची तयारी आहे, असे अलायन्स अगेन्स्ट सीएए, एनआरसी, एनपीआरचे महाराष्ट्र संयोजक व निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील म्हणाले.