शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सीएए व एनआरसी हा गुलाम करणारा कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर यवतमाळात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले असता त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ते म्हणाले, एकट्या आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करताना १५ लाखांपेक्षा जास्त जे शंकास्पद नागरिक सरकारने शोधले त्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूंचीच संख्या अधिक असून ती १५ लाखांपेक्षा जास्त आहे.

ठळक मुद्देबी.जी. कोळसे पाटील : शंकास्पद ठरलेल्या नागरिकांचे करणार तरी काय?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सीएए, एनआरसी हा कायदा म्हणजे सरकारचा घर पेटवण्याचा प्रकार आहे. या कायद्याने केवळ मुस्लीमच टार्गेट होणार नाही तर देशातील एससी, एसटी, ओबीसी व सर्व जातीतील गरिबांना गुलाम करणारा हा कायदा आहे, अशी खरमरीत टीका मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर यवतमाळात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आले असता त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. ते म्हणाले, एकट्या आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करताना १५ लाखांपेक्षा जास्त जे शंकास्पद नागरिक सरकारने शोधले त्यात मुस्लिमांपेक्षा हिंदूंचीच संख्या अधिक असून ती १५ लाखांपेक्षा जास्त आहे. त्यातही जवळपास दहा लाख नागरिक हे एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील आहे. त्यामुळे या कायद्याची कुºहाड कोणावर कोसळणार हे स्पष्ट आहे. आसाममध्ये ही मोहीम राबवताना सरकारला सोळाशे कोटीपेक्षा जास्त खर्च आला. एवढा प्रचंड खर्च करून सरकारच्या हाती काहीच लागत नाही. शंकास्पद ठरलेले नागरिक अन्नसुरक्षा, मनरेगापासून वंचित होणार. कामगार कायदा, मिनिमम वेजेस यापासून ते वंचित राहणार असल्याने त्यांना पुढेही देशात ठेवले तरी त्यांची अवस्था गुलामांपेक्षा वाईट होणार आहे, अशी भीती कोळसे पाटील यांनी व्यक्त केली.संविधानाने भारताच्या सर्व लोकांना भारताचे मालक केले. हीच बाब काही मूठभर लोकांना मान्य नाही. त्यासाठी त्यांनी हा अन्याकारक कायदा पुढे केला असून त्याला मनुस्मृतीची पार्श्वभूमी असल्याचे त्यांनी सांगितले. तर देशातील बिघडलेल्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करण्यासाठी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा पुढे केला आहे. आसाममध्येही सर्वांकडेच नागरिकत्वाची कागदपत्रे होती. मात्र अनेकांची कागदपत्रे विखुरलेली आहेत, अनेकांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका आहेत. त्यामुळे काही नागरिकांना तेथे संशयास्पद ठरवण्यात आले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा कायदा राबविण्यास नकार द्यावा. त्यासाठी आम्ही १५ मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले आहे. राज्य सरकारला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातही जाता येईल, असे मत दिल्ली येथील कासीम रसूल इलियास यांनी व्यक्त केले. पत्रपरिषदेला डॉ.मुजीब शेख, जिया मिनाई उपस्थित होते.

हा कायदा मानणे म्हणजे नपुंसकताजो कायदा लोकांवर अन्याय करतो तो मानणे म्हणजे नपुंसकता होय, अशी भूमिका महात्मा गांधींनी आफ्रिकेतील आंदोलनात मांडली होती. आम्हीही आता सीएए, एनआरसीविरोधात सविनाय कायदेभंग करणार आहोत. एनआरसीचा फॉर्म भरून घेण्यासाठी जो कर्मचारी आमच्याकडे येईल त्याचा सन्मान करू. मात्र त्याला फॉर्म भरून देणार नाही. शिवाय हा कायदा मागे घेण्यासाठी न्यायालयीन लढाईदेखील लढण्याची आमची तयारी आहे, असे अलायन्स अगेन्स्ट सीएए, एनआरसी, एनपीआरचे महाराष्ट्र संयोजक व निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील म्हणाले.