शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

सत्ता स्थापनेच्या तिढ्याने कापूस खरेदीचा गुंता; शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:42 IST

राज्यात सरकारच स्थापन न झाल्याने कापूस खरेदीचा निर्णय कोण घेणार, हा प्रश्न आहे. यातून राज्यातील ४० कापूस संकलन केंद्र अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देराज्यातील ४० संकलन केंद्रांवर प्रश्नचिन्ह

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. राज्यात सरकारच स्थापन न झाल्याने कापूस खरेदीचा निर्णय कोण घेणार, हा प्रश्न आहे. यातून राज्यातील ४० कापूस संकलन केंद्र अडचणीत आले आहेत.यंदा परतीच्या पावसाने कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. शासनाचे हमी केंद्र अजूनही उघडले नाही. या स्थितीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडले आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकºयांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. मात्र राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. कोणत्याही पक्षाचे सरकारच बनले नाही. त्यामुळे कापूस संकलन केंद्र उघडण्याचे आदेश देणार कोण, त्यासाठी लागणारा पैसा उभा होणार कसा, हे प्रश्न बाकी आहे.केंद्र शासनाने कापसाचे हमीदर जाहीर केल्यानंतर कापूस संकलन केंद्र उघडणे अपेक्षित होते. मात्र याच कालावधीत निवडणुका लागल्या. निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाले असते, तर कापूस संकलन केंद्र उघडले गेले असते. मात्र सरकार न बसल्याने कापूस संकलनाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.

मुहूर्तही लोटला पुढेराज्यात सरकार स्थापन न झाल्याने कापूस संकलन केंद्र उघडण्याबाबत पणनचे व्यवस्थापक आणि संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यात निर्णय घेतला जाणार आहे. आता २५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत कापूस खरेदीचा मुहूर्त पुढे लोटण्यात आला आहे. पणन महासंघाने ४० केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे. तर सीसीआय ८३ केंद्र उघडणार आहे. मात्र कायदेशीर प्रक्रिया अपूर्ण आहे. शासकीय हमीदरानुसार कापसाला ५४५० रूपये क्विंटलचे दर आहेत. तर खासगी व्यापारी तीन ते साडेतीन हजार रूपये क्ंिवटल दराने कापसाचे खरेदी करीत आहे.४७ लाख हेक्टरवर पेराराज्यात सर्वाधिक पेरा कापसाचा आहे. ४७ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. हा कापूस वेचण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरात कापूस आला आहे. मात्र अजूनही शासकीय खरेदी केंद्र उघडले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आहे.सरकार स्थापनेअभावी नवा पेच निर्माण झाला. या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी १४ आणि १५ नोव्हेंबरला मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर कापूस खरेदीचा प्रश्न सोडविला जाणार आहे.- राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष, पणन महासंघ

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती