शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

काळीदौलतमध्ये तरुणाचा निर्घृण खून, तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 05:00 IST

श्याम राठोड हा तरुण आपला भाऊ लक्ष्मण शेषराव राठोड याच्यासह काही कामानिमित्त दुचाकीवर निघाला होता. या दरम्यान बसस्थानक परिसरात त्याच्या दुचाकीचा एका तरुणाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून संबंधित तरुणाने आपल्या साथीदारासह श्याम व त्याच्या भावाविरुध्द वाद घातला. वाद वाढत जावून श्यामवर तलवारीने वार करण्यात आले. यात श्यामचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले.  

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव / पुसद : रस्त्याने जाताना केवळ दुचाकीचा धक्का लागला या कारणावरून दोन तरुणांचे भांडण पेटले. त्यातच दुचाकीस्वार तरुणावर तलवारीने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी भरदुपारी काळीदौलत खान येथे वर्दळीच्या ठिकाणी घडली. श्याम शेषराव राठोड (२२) रा. काळी असे या घटनेतील मृताचे नाव आहे. तर श्याम याच्यावर जीवघेणा हल्ला करणारे अज्ञात आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, श्यामचा खून झाल्याचे कळताच त्याच्या नातेवाईकांमध्ये हलकल्लोळ उडाला. काही नागरिकांनी सायंकाळी बसस्थानक परिसरात जाळपोळ केली. या घटनेला जातीय रंग आल्याने काही काळ गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. श्याम राठोड हा तरुण आपला भाऊ लक्ष्मण शेषराव राठोड याच्यासह काही कामानिमित्त दुचाकीवर निघाला होता. या दरम्यान बसस्थानक परिसरात त्याच्या दुचाकीचा एका तरुणाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून संबंधित तरुणाने आपल्या साथीदारासह श्याम व त्याच्या भावाविरुध्द वाद घातला. वाद वाढत जावून श्यामवर तलवारीने वार करण्यात आले. यात श्यामचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले.  खुनाची वार्ता  तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. पुसद ग्रामीण पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.  ही घटना  दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणातून घडली की, मृत व हल्लेखोरांचे काही पूर्ववैमनस्य होते, या बाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहे. 

श्याम करीत होता पाेलीस भरतीची तयारी - २२ वर्षीय श्याम राठोड हा तरुण गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करीत होता. नुकतीच त्याला दुसऱ्या एका नोकरीची ऑफरही आली होती, अशी चर्चा आहे. मात्र शुक्रवारच्या हल्ल्यात श्याम संपला. गेल्या काही दिवसात किरकोळ वादातून थेट खुनाच्या घटना वाढत आहे. बेरोजगारी, असुरक्षितता आणि व्यसनाधिनता यातून अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले. 

कृतीदलाचे जवान पाचारण करून घटनास्थळी बंदोबस्त लावला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. गावकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. - डाॅ. दिलीप पाटील भुजबळजिल्हा पोलीस अधीक्षक

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी