शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी महामार्गांच्या बांधकामांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 15:47 IST

मंदीच्या लाटेमुळे अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीत रस्ते बांधणे परवडणारे नाही, चालू असलेली सर्व कामे थांबवा, एवढेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गाकडे असणारी जमीन व अन्य मालमत्ता विकून खर्च भागवा अशा सूचना देणारे पत्र ‘पीएमओ’कडून केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या सचिवांना १७ ऑगस्ट रोजी पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देहजारो किलोमीटरचे चौपदरी रस्ते वांद्यातगाशा गुंडाळण्याचे कंत्राटदार कंपन्यांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अडचणीच्या वाटेवरून मार्गक्रमण करणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा पहिला हातोडा महामार्गांवर पडला आहे. निधीच्या टंचाईमुळे देशभरातील मोठ्या रस्त्यांच्या बांधकामांना ब्रेक लावण्यात आला आहे. त्यातूनच बांधकाम करणाºया बड्या कंत्राटदार कंपन्यांनी रस्त्यांवरून आपल्या मशिनरीज उचलणे सुरू केले आहे.मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षात देशभरात मोठ्या प्रमाणात रस्ते व पुलांचे जाळे निर्माण करण्याचे काम हाती घेतले गेले. मात्र देशभर कनेक्टीव्हीटी निर्माण करण्याच्या या मोहिमेला मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये निधीअभावी ब्रेक लावावा लागत आहे. मंदीच्या लाटेमुळे अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीत रस्ते बांधणे परवडणारे नाही, चालू असलेली सर्व कामे थांबवा, एवढेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गाकडे असणारी जमीन व अन्य मालमत्ता विकून खर्च भागवा अशा सूचना देणारे पत्र ‘पीएमओ’कडून केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या सचिवांना १७ ऑगस्ट रोजी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. या पत्राने सार्वजनिक बांधकाम व महामार्गाच्या अभियंता, कंत्राटदार व यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे.अर्थव्यवस्था सुरळीत होईस्तोवर मोठ्या रस्त्यांची नवी कामे होणार नाहीत, सध्या सुरू असलेली चौपदरी करणाची कामे थांबविण्यात येतील व अंतिम टप्प्यात असलेली कामे मंद गतीने केली जातील असा अंदाज सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात या पत्रावरून वर्तविला जात आहे. राज्यात निधीअभावी आधीच बहुतांश रस्त्यांची कामे मंदावली होती. आता ती पूर्णत: थांबविली जाण्याची चिन्हे आहे. कंत्राटदार कंपन्यांना महामार्गांवर असलेला आपला गाशा गुंडाळून यंत्रे हलविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जाते.रस्ते बांधकामांची सध्यस्थितीसहा लाख कोटींचे बजेट असलेली ४० हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील ४० टक्के कामे पूर्ण झाली आहे. याशिवाय आठ लाख कोटींच्या कामाच्या निविदा प्रस्तावित आहे. मात्र आता या निविदांना मुहूर्त मिळण्याची शक्यता कमीच आहे.समृद्धी महामार्गाचे प्रत्येकी २० हजार कोटींचे पाच पॅकेज आहेत. यातील एक पॅकेज केंद्र सरकारच्या मर्जीतील देशातील बड्या कंपनीने घेतला होता. त्यांनी तो पुढे सब कंपनीला १४ हजार कोटीत विकला. या मूळ कंपनीला वरचे वर सहा हजार कोटींचा नफा झाला.

टॅग्स :highwayमहामार्ग