शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पांढरकवडात कंटेनरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:05 IST

दिल्लीवरून हैद्राबादकडे जाणाऱ्या कंटेनरला येथील वाय पॉर्इंटवर उभ्या असलेल्या स्थितीत आग लागून कंटेनरच्या कॅबिनसह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.

ठळक मुद्दे३५ लाखांचे नुकसान : दिल्लीवरून हैद्राबादकडे जात होता कंटेनर

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : दिल्लीवरून हैद्राबादकडे जाणाऱ्या कंटेनरला येथील वाय पॉर्इंटवर उभ्या असलेल्या स्थितीत आग लागून कंटेनरच्या कॅबिनसह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.हैद्राबाद येथील मनिष कंटेनर सर्व्हिसचा आर.जे.१०-जी.बी.२०५८ क्रमांकाचा कंटेनर दिल्ली येथील शोरूममधील चपला, बुट, दुचाकी व चारचाकी वाहनांचे टायर, आॅईलचे डब्बे, पंखे, खेळाचे साहित्य, सिडीजचे डब्बे, चपला, बुट तयार करण्याचा कच्चा माल व स्टेशनरी सामान घेऊन हैद्राबादकडे जात होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता हैद्राबाद मार्गावरील वाय पॉर्इंटवर डाव्या बाजुला कंटेनर लावून चालक व क्लिनर शहरातील जवळच असलेल्या एटीएम केंद्रात पैसे आणावयासाठी गेले. पैसे घेऊन परत कंटेनरजवळ येत नाही तोच, त्यांना कंटेनरच्या कॅबिनमधून धुराचे लोट येताना दिसले. क्षणार्धात कंटेनरच्या कॅबिनला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. हे दृष्य दिसताच, या रस्त्याने जाणाºया राजेश्वर पारीख व कुणाल राशतवार यांनी पोलीस व नगरपरिषदेला माहिती दिली. तोपर्यंत कॅबिनमध्ये असलेले साहित्य जळून खाक झाले.त्यानंतर ही आग झपाट्याने कॅबिनच्या मागे असलेल्या कंटेनरमधील साहित्याकडे गेली. आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, पांढरकवडा नगरपरिषदेचे टँकर, फायर ब्रिगेड तातडीने घटनास्थळी पोहोचले. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, कंटेनरमधील ५० टक्क्यापेक्षा जास्त साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर असलेल्या वाय पॉर्इंटवर उभ्या कंटेनरला आग लागल्याचे वृत्त वाºयासारखे पसरताच नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली होती. काही वेळ वाहतुकही ठप्प झाली होती. ठाणेदार रामकृष्ण महल्ले व सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यतासध्या उष्णतामानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक होरपळून निघत आहेत. आगी लागण्याच्या प्रमाणाताही वाढ होत आहे. कंटेनरला लागलेली ही आग अतिउष्णतेने शॉर्टसर्किट होऊन लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. कंटेनरची बॅटरी किंवा इंजिन गरम होऊन ठिणगी पडून ही आग लागली असावी, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती हैद्राबाद येथील मनिष कंटेनर सर्व्हिसच्या मालकाला देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांनी सांगितले. या आगीत ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :fireआग