शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

पांढरकवडात कंटेनरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:05 IST

दिल्लीवरून हैद्राबादकडे जाणाऱ्या कंटेनरला येथील वाय पॉर्इंटवर उभ्या असलेल्या स्थितीत आग लागून कंटेनरच्या कॅबिनसह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.

ठळक मुद्दे३५ लाखांचे नुकसान : दिल्लीवरून हैद्राबादकडे जात होता कंटेनर

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : दिल्लीवरून हैद्राबादकडे जाणाऱ्या कंटेनरला येथील वाय पॉर्इंटवर उभ्या असलेल्या स्थितीत आग लागून कंटेनरच्या कॅबिनसह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.हैद्राबाद येथील मनिष कंटेनर सर्व्हिसचा आर.जे.१०-जी.बी.२०५८ क्रमांकाचा कंटेनर दिल्ली येथील शोरूममधील चपला, बुट, दुचाकी व चारचाकी वाहनांचे टायर, आॅईलचे डब्बे, पंखे, खेळाचे साहित्य, सिडीजचे डब्बे, चपला, बुट तयार करण्याचा कच्चा माल व स्टेशनरी सामान घेऊन हैद्राबादकडे जात होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता हैद्राबाद मार्गावरील वाय पॉर्इंटवर डाव्या बाजुला कंटेनर लावून चालक व क्लिनर शहरातील जवळच असलेल्या एटीएम केंद्रात पैसे आणावयासाठी गेले. पैसे घेऊन परत कंटेनरजवळ येत नाही तोच, त्यांना कंटेनरच्या कॅबिनमधून धुराचे लोट येताना दिसले. क्षणार्धात कंटेनरच्या कॅबिनला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. हे दृष्य दिसताच, या रस्त्याने जाणाºया राजेश्वर पारीख व कुणाल राशतवार यांनी पोलीस व नगरपरिषदेला माहिती दिली. तोपर्यंत कॅबिनमध्ये असलेले साहित्य जळून खाक झाले.त्यानंतर ही आग झपाट्याने कॅबिनच्या मागे असलेल्या कंटेनरमधील साहित्याकडे गेली. आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, पांढरकवडा नगरपरिषदेचे टँकर, फायर ब्रिगेड तातडीने घटनास्थळी पोहोचले. तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, कंटेनरमधील ५० टक्क्यापेक्षा जास्त साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर असलेल्या वाय पॉर्इंटवर उभ्या कंटेनरला आग लागल्याचे वृत्त वाºयासारखे पसरताच नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली होती. काही वेळ वाहतुकही ठप्प झाली होती. ठाणेदार रामकृष्ण महल्ले व सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यतासध्या उष्णतामानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक होरपळून निघत आहेत. आगी लागण्याच्या प्रमाणाताही वाढ होत आहे. कंटेनरला लागलेली ही आग अतिउष्णतेने शॉर्टसर्किट होऊन लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. कंटेनरची बॅटरी किंवा इंजिन गरम होऊन ठिणगी पडून ही आग लागली असावी, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती हैद्राबाद येथील मनिष कंटेनर सर्व्हिसच्या मालकाला देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांनी सांगितले. या आगीत ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

टॅग्स :fireआग