शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
2
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
3
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
4
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
5
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
6
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
7
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
8
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
9
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
10
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
11
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
12
'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर
13
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
14
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
15
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
16
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
17
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
18
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
19
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
20
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक

बोगस खते अन् कीटकनाशकांचा कारखाना सील, ६२ लाखांचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 23:01 IST

कीटकनाशक फवारणीबाधितांची संख्या सव्वाशेवर गेलेली असतानाच यवतमाळच्या कृषी गुणवत्ता नियंत्रण पथकाने नागपूर रोडवरील कळंब येथे मंगळवारी रात्री बोगस खते व कीटकनाशकांचा अनधिकृत कारखाना पकडला

यवतमाळ : कीटकनाशक फवारणीबाधितांची संख्या सव्वाशेवर गेलेली असतानाच यवतमाळच्या कृषी गुणवत्ता नियंत्रण पथकाने नागपूर रोडवरील कळंब येथे मंगळवारी रात्री बोगस खते व कीटकनाशकांचा अनधिकृत कारखाना पकडला. या कारखान्याला ६२ लाखांच्या साठ्यासह सील करण्यात आले. याप्रकरणी सचीन अरुण कावळे (२८) याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार चंद्रशेखर गणेश थोटे (३३) रा.कारिया ले-आऊट, कळंब हा फरार आहे. 

याप्रकरणी अटकेतील आरोपींविरुद्ध भादंवि ४२०, ४६८, ४७१ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम, कीटकनाशक कायदा, रासायनिक खत नियंत्रण, जीवनावश्यक वस्तू अधिनियममधील कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तालुका कृषी अधिकारी संजय पाठक यांनी या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. वेणी कोठा रोडवरील गुरूदेव जिनिंग मिलच्या आवारात सुरू असलेला हा कारखाना नेमका किती वर्षांपासून आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या कारखान्यात बनावट कीटकनाशके व खतांची निर्मिती तसेच विशिष्ट विक्रेत्यांमार्फत पुरवठा-विक्री होत असल्याची टीप कृषी विभागाला मिळाली. त्यावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागनाथ कोळपकर यांच्या नेतृत्वात या कारखान्यावर धाड घालण्यात आली. या धाडीमुळे बोगस कृषी साहित्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, कळंबचे ठाणेदार नरेश रणधीर आदी या पथकात सहभागी होते. या कारखान्यातून नेमका कुणाकुणाला पुरवठा झाला, पुरवठादार किती वर्षांपासून कारखान्याच्या कनेक्शनमध्ये आहेत, नेमका कुणाकुणाला हा माल विकला, याचा तपास पोलीस व कृषी विभाग करीत आहे. 

जिल्ह्यात गतवर्षी कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर साडेनऊशेवर शेतकरी-शेतमजूर बाधित झाले होते. त्याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून प्रशासनाने व्यापक उपाययोजना केल्या. मात्र, त्यानंतरही यावर्षी आतापर्यंत फवारणी विषबाधा झालेल्यांची संख्या १२८ वर पोहोचली आहे. या अनधिकृत कारखान्यातून झालेल्या कीटकनाशक पुरवठ्यातून तर विषबाधेचे रुग्ण वाढले नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. हा कारखाना अनेक वर्षांपासून सुरू असेल तर एवढे वर्ष कृषी विभागाची यंत्रणा काय करीत होती, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाYavatmalयवतमाळ