शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महिलेचा खून करून मृतदेह गोठ्यात लपविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:37 IST

क्षुल्लक कारणावरून एका महिलेचा काठीने मारहाण करीत खून करण्यात आला.

पांढरकवडा (यवतमाळ) : क्षुल्लक कारणावरून एका महिलेचा काठीने मारहाण करीत खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्यादृष्टीने सदर महिलेचा मृतदेह गोठ्यात नेऊन कुटारात (जनावराचा चारा) लपवून ठेवण्यात आला. एवढेच नव्हे तर ही महिला बेपत्ता असल्याचा देखावाही निर्माण केला गेला. पांढरकवडा तालुक्यातील सखी या गावात सोमवारी रात्री ही घटना घडली.आशा चंपत मेश्राम (३०) असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात अर्जुन जयवंत मेश्राम (३५) याला अटक केली आहे. आशा व अर्जुन गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहात होते. मात्र अर्जुनला दारूचे व्यसन लागल्याने त्यातूनच तो तिला मारहाण करायचा. सोमवारी रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाला व त्याचे पर्यावसन आशाच्या खुनात झाले. अर्जुनने यावेळी शेजारी व गावक-यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध खून व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.