शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या नावे चिट्ठी लिहिलेल्या शेतकऱ्याचा देह तिसऱ्या दिवशीही शवागारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:27 IST

मोदी सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशीही नातेवाईकांनी ताब्यात घेतला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी राजूरवाडी येथे महसूल राज्यमंत्र्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पोहोचले.

ठळक मुद्देचचेर्साठी राजूरवाडीला महसूल राज्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोदी सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशीही नातेवाईकांनी ताब्यात घेतला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी राजूरवाडी येथे महसूल राज्यमंत्र्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पोहोचले आहेत.घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर भाऊराव चायरे यांनी मंगळवारी गळफास आणि नंतर विष प्राशन करून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस नरेंद्र मोदी सरकार आपल्या आत्महत्येस जबाबदार आहे, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात आणला. एक कोटीची आर्थिक मदत आणि मुलीला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी करत मृतदेह घेण्यास नकार दिला होता. शुक्रवारी दुपारपर्यंत हा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारातच ठेऊन होता. दरम्यान, यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या. परिवारासोबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले, अमरावती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक राजूरवाडी येथे दाखल झाले. या प्रश्नावर आंदोलन करणारे शेतकरी न्याय हक्क समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांनाही पोलीस ठाण्यातून चचेर्साठी राजूरवाडी येथे नेण्यात आले. वृत्तलिहिस्तोवर यासंदर्भात कोणताही तोडगा निघाला नव्हता. परिणामी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारातच ठेऊन होता.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या