शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पांढरकवडा, दारव्हा येथे तरुणांचा निर्घृण खून

By admin | Updated: February 25, 2017 00:53 IST

दारव्हा तालुक्यातील रामगाव (हरू) आणि पांढरकवडा येथे तरुणांचा निर्घृण खून करण्याची घटना घडली.

रामगावमध्ये कोयत्याने वार : पांढरकवड्यात तिघांना अटक दारव्हा/पांढरकवडा : दारव्हा तालुक्यातील रामगाव (हरू) आणि पांढरकवडा येथे तरुणांचा निर्घृण खून करण्याची घटना घडली. रामगाव येथे कोयत्याने वार करून तरुणाला ठार मारले तर पांढरकवडा येथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाचा लोखंडी पाईपने डोक्यावर प्रहार करून निर्घृण खून करण्यात आला. पांढरकवडा येथील गुंड प्रवृत्तीच्या पंकज प्रकाश मडकाम (२५) याची शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तीन युवकांनी धारदार शस्त्र व लोखंडी पाईपने प्रहार करून निर्घृण हत्या केली. एसटी आगाराच्या बाजूने असलेल्या क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर ही हत्या झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज मडकामवर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे आहेत. तो शस्त्राचा धाक दाखवून पैसे उकळायचा. दारूसाठी कुणालाही धमकी देत होता. गुरुवारपासून आरोपी मिथून उईके, कुणाल भगत रा. पांढरकवडा व शेखर देशट्टीवार रा. सोनबर्डी या तिघांना तो दारूसाठी पैसे मागत होता. पैसे दिले नाही तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकीही देत होता. या प्रकाराला कंटाळून या तिघांनी त्याला संपविण्याचा कट आखला. पंकज आपला मित्र विक्रम जेधेसह एसटी आगाराच्या बाजूला असलेल्या स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्याने शुक्रवारी सायंकाळी जात होता. त्यावेळी या तिघांनी पंकजच्या डोक्यावर लोखंडी पाईपने हल्ला केला तसेच धारदार शस्त्रानेही त्याला भोसकले. यात पंकज जागीच ठार झाला. तर विक्रम जेधे याच्याही डोक्यावर आरोपींनी वार केले. मात्र तो रक्तबंबाळ अवस्थेत जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात पळत गेला. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तेथून रक्ताने माखलेला लोखंडी पाईप जप्त करण्यात आला. खुनानंतर आॅटोरिक्षाने पळून जाणाऱ्या या तिघांचा ठाणेदार गुलाबराव वाघ व सहकाऱ्यांनी पाठलाग केला. अवघ्या दहा मिनिटात कोंघारा येथील पेट्रोल पंपाजवळ तिघांनाही अटक केली. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. दारव्हा तालुक्यातील रामगाव (हरू) येथील विजय भीमराव चव्हाण (२३) याचा गुरूवारी रात्री ८ वाजता गावाशेजारी मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी त्याच्या मानेवर कोयत्याने वार केल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता गावातीलच आरोपी विजय गोबरसिंग पवार (५०) याने त्याचा खून केल्याचे पुढे आले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली, त्यावेळी धान्याच्या पोत्यात लपवून ठेवलेला रक्ताने माखलेला कोयता जप्त करण्यात आला. तू माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने का पाहिले या कारणावरून निर्माण झालेल्या वादात हा खून झाल्याचे पुढे आले आहे. दोघेही गुरूवारी मद्यधुंद अवस्थेत होते. त्यातच वाद होऊन विजय पवारने विजय चव्हाणच्या मानेवर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याचे पुढे आले. या प्रकरणी मृताचे वडील भीमराव किसन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार अनिलसिंह गौतम, पोलीस उपनिरीक्षक दीपक काँक्रीेटवार, कैलास लोथे, रणजीत रबडे, करीत आहे. (लोकमत चमू)