शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्यावतीने जिल्ह्यात आजपासून रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या ठिकाणी नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. २ व ३ जुलै रोजी लोकमत वृत्तपत्र कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ आहे.

ठळक मुद्देनातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याच, महाशिबिराची अमरावतीहून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रक्तदान म्हणजे जीवनदान. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून निर्बंध लागल्याने राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले होते. पर्यायाने शस्त्रक्रियांसह अनेक उपचारांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकमत'च्यावतीने जिल्ह्यात २ ते ११ जुलै या कालावधीत सकाळी १० ते ३ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रीत्यर्थ अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या ठिकाणी नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. २ व ३ जुलै रोजी लोकमत वृत्तपत्र कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ आहे.अमरावती परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अमरावती शहर उपविभाग क्र.१ चे अतिरक्त कार्यकारी अभियंता (महावितरण) प्रदीप अंधारे हे शिबिराचे उद्‌घाटन करतील. कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थॅलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना आपतकालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शोधणे व त्याचा रक्तगट जुळवणे हे अतिशय जिकरीचे काम आहे. या सर्वांना जीवनदान देण्यासाठी खऱ्या दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनदान अर्पण करू शकतो. शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा ठणठणाट आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करतानाही अडचणी येत आहे.कोरोना महामारी व लसीकरणामुळे अनेकांना रक्तदानाची इच्छा असूनही मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर 'लोकमत'ने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. यात सक्रिय सहभाग नोंदवून ही लोकचळवळ उभी राहावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९२७०१३१५८०

यांनी करावे रक्तदान - १८ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती.- कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते.- लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते.- दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसाने रक्तदान करता येते. 

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट