शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

भाजपचे गलिच्छ राजकारण गावागावात वेशीवर टांगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

भाजपाची भाषा आणि व्यवहार अत्यंत दुटप्पीपणाचा आहे. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद भाजपा के साथ अशी टॅग लाइन घेऊन महाराष्ट्रात सत्तेसाठी प्रयत्न करणारी भाजपा कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर मात्र मूग गिळून गप्प बसते. एवढे कशाला तिथले भाजपाचे मुख्यमंत्रीही क्षुल्लक बाब असल्याचे सांगतात आणि याविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिक मराठी माणसावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. स्वाभिमान व्यक्त करणे देशद्रोह कसा, असा प्रश्नही सावंत यांनी या पत्रकार परिषदेतून व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्राने आजवर पाहिले नाही, अशा प्रकारचे अत्यंत गलिच्छ राजकारण भाजपकडून केले जात आहे. या राजकारणासाठी देशाच्या संस्था वापरल्या जात आहेत. स्वार्थ संपला की शिडीला लाथ मारायची सवय असलेल्या भाजपाला धडा शिकवू, असे सांगत शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून भाजपाचे गलिच्छ राजकारण वेशीवर टांगणार असल्याचे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.भाजपाची भाषा आणि व्यवहार अत्यंत दुटप्पीपणाचा आहे. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद भाजपा के साथ अशी टॅग लाइन घेऊन महाराष्ट्रात सत्तेसाठी प्रयत्न करणारी भाजपा कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर मात्र मूग गिळून गप्प बसते. एवढे कशाला तिथले भाजपाचे मुख्यमंत्रीही क्षुल्लक बाब असल्याचे सांगतात आणि याविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिक मराठी माणसावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. स्वाभिमान व्यक्त करणे देशद्रोह कसा, असा प्रश्नही सावंत यांनी या पत्रकार परिषदेतून व्यक्त केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मागील सात वर्षांपासून आम्ही भांडत आहोत. याच मागणीसाठी मुख्यमंत्री दिल्लीला भेटून आले. कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी घोषणा व्हावी म्हणून शिवसेना नेते सुभाष देसाई यांनीही प्रयत्न केले. मात्र, भाजपाकडून प्रतिसाद मिळत नाही. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. तरीही महाराष्ट्रातील भाजपा नेते गप्प आहेत. दुसरीकडे मराठी माणूस आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याची मोहीम राबविली जात आहे. अशा स्थितीत सत्य नेमके काय आहे, हे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही शिवसंपर्क मोहीम सुरू केल्याचे सावंत यांनी सांगितले. कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाखो लोकांचे प्राण वाचविले. आजवर झालेल्या प्रत्येक सर्व्हेत कार्यशील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. जागतिक आरोग्य संस्थेनेही मुख्यमंत्र्यांच्या कार्याचे कौतुक केलेले असताना महाराष्ट्राला कमीपणा दाखविण्याचे काम भाजपाकडून होत आहे. भाजपाचे किरीट सोमय्या यांची यादी पहा, त्यांनी आरोप केलेल्यापैकी अनेक जण आता भाजपात गेले आहेत. तिकडे गेल्यानंतर चौकशी थांबते. ही कसली भ्रष्टाचारविरोधी मोहीम, असा प्रश्न करीत भाजपा महाराष्ट्राच्या हिताविरोधात कार्यरत आहे. त्यांना येथील माणसांशी, मराठी मातीशी काहीही देणे-घेणे नाही. केवळ राजकारण आणि सत्तेसाठी त्यांची उठाठेव सुरू असल्याचा आरोपही सांवत यांनी पत्रकार परिषदेत केला.पत्रकार परिषदेला आमदार संजय राठोड, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कालिंदाताई पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

केंद्राकडे महाराष्ट्राचे ३० हजार कोटी येणेकोरोनाच्या संकटाचा आपण मोठ्या धीराने सामना केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही या उपाययोजनांकडे विशेष लक्ष होते. मात्र, केंद्रातील भाजपने महाराष्ट्राची नेहमी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. जीएसटी कायद्यानुसार महाराष्ट्राचा हिस्सा म्हणून केंद्राने ३० हजार कोटी रुपये द्यायला हवेत. मात्र, अद्याप ही रक्कम दिलेली नसल्याचे सांगत, हे एकप्रकारे जीएसटी कायद्याचे उल्लंघन असल्याचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. मात्र, अशाही स्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महत्त्वाच्या गोष्टींना निधी कमी पडणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. 

पाठीत खंजिर खुपसणारा भाजपसारखा मित्र नकोच- शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. समान किमान कार्यक्रम आखून आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहोत. पाठीत सुरा खुपसणाऱ्या भाजपपेक्षा शत्रू बरा, ही आमची भूमिका आहे. सेनेची पाळेमुळे घट्ट असल्यामुळे आगामी काळात सर्व पातळ्यांवर भाजपला पराभूत करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv Senaशिवसेना